Wednesday, 29 August 2018

बँकांवरील सायबर दरोडा कसा रोखावा



बँकांवरील सायबर दरोडा कसा  रोखावा    
नुकताच घडलेला "कॉसमॉस' सायबर दरोडा हा आंतरराष्ट्रीय दरोडा आहे. पुण्यातील कॉसमॉस बँकेवर पडलेल्या सायबर दरोड्यात फ्ट ट्रान्जॅक्‍शनव्दारे कॉसमॉस बॅंकेतील 13 कोटी 92 लाख रुपये हॉंगकॉंग येथील हॅनसंग बॅंकेत वेगळ्याच  खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले. यामुळे देशातील बँकिंग विश्वात  मोठी खळबळ उडाली आहे.
FBIने इशाऱ्यात म्हटले होते  की, जागतिक सायबरचोर   सायबर हल्ला करून ATMमधून पैसे काढण्याच्या प्रयत्नात आहेत. तरी बँकांनी खबरदारी घ्यावी 
 आणि त्याप्रमाणेच FBI या अमेरिकन तपाय यंत्रणेनं जागतिक स्तरावर दिलेल्या सुरक्षा इशाऱ्यानंतर काही दिवसांतच हा दरोडा पडला .
त्यात बँकेच्या सर्व्हरवर मालवेअरचा हल्ला करून तसंच व्हिसा आणि रुपेची नकली डेबिट कार्ड वापरून तसेच  ऑनलाईन व्यवहार करून पैसे  ट्रान्सफर झाले होते .
प्रामुख्याने हाँगकाँग, कॅनडा, भारत या देशांत  हे व्यवहार झाले होते . 
कसा पडला होता सायबर दरोडा 
-सायबर दरोडेखोरांनी  यात बँकेच्या कार्डधारकांचा डाटा चोरुन डार्क नेटच्या माध्यमातून त्याची विक्री करण्यात आली. संबंधित डाटा खरेदी केलेल्यांना पैसे काढण्याची वेळ देखील देण्यात आली  होती. त्यानंतर संबंधितांनी क्लोन केलेल्या कार्डच्या माध्यमातून हे पैसे काढल्याचे तपासात समजले .
- बँकेतील स्विफ्ट सर्व्हर वर मालवेअर अटॅक करून व्यवहारांद्वारे आॅनलाइन रक्कम इतर देशात वळविण्यात आली . 
--दरोडा बँकेशी संबंधित माहिती-तंत्रज्ञानातील सुरक्षेतील त्रूटींमुळे झाला आहे.
पैशांच्या सुरक्षेकरिता सर्वच जण एटीएम कार्ड वापरतात आणि ते तितकं सोपही आहे. पण, आता चोरट्यांनी  एटीएम कार्डवरच वक्रदृष्टी टाकली आहे. 

बँकेच्या एटीएममधील अनेक खातेदारांचे पासवर्ड आणि सिक्युरिटी सिस्टीमसह एटीएमचा संपूर्ण डाटा चोरला जाऊ शकतो   .  आणि  या माहितीच्या आधारे चोरटे  संगणकाच्या मदतीने एटीम कार्डचे क्लोनिंग करून फसवणूक  करत आहेत असे उघड आहे .

अनेक  शहरात खातेदारांना त्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढल्याचे मोबाईलवर संदेश प्राप्त झाले. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे समजलं. या तक्रारदारांनी तत्काळ  पोलीस ठाण्यात तक्रार केली. तेव्हा हा एटीएम क्लोनिंग चा प्रकार असल्याचे त्यांना समजले .
आज अनेक शहरात अनेक ठिकाणी एटीएम मशीन रामभरोसे आहे. सुरक्षा रक्षक नसणे,सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे,या सर्व गोष्टीमुळे चोरांट्यानां  चोरी करण्यासाठी मोकळे रान मिळत असल्याचं दिसून येतेय. हे प्रकार अनेक ठिकाणी  घडतं असल्याचं समोर आलंय.

 कसे आहेत कार्ड क्लोनिंग 
 अनेक  दुकान  आणि शोरूम मध्ये एटीएम किंवा क्रेडिट कार्ड पैसे भरणा करण्याकरिता स्वॅपिंग मशीन आहे. 
जिथे कार्ड टाकलं जातं तिथं ‘स्क्रीमर मशीन’ लावली जाते
आणि कार्ड मुख्य मशीनमध्ये जाताना कार्डामागील मॅग्नेटिक स्ट्रीप स्क्रीमर मशीनमध्ये स्कॅन होते.
व आपण ट्रान्सफर करण्याकरिता पिन टाइप करीत असतो नेमका पिन नंबरच्या ठिकाणावर छुपा कॅमेरा असतो.
म्हणजे  स्क्रीमर मशीनमध्ये स्ट्रीप स्कॅन होते आणि त्याचवेळी पिन नंबर कॅमेऱ्यात  दिसतो.मॅग्नेटीक स्ट्रीपची नक्कल करून डुप्लीकेट कार्ड बनवली  जातात 
नंतर कोणत्याही मशीनमध्ये हे कार्ड आणि छुप्या कॅमेऱ्यात मिळविलेला  पिन क्रमांक टाकल्यास पैसे काढता येतात.
एटीएम कार्डचे क्लोनिंग करून अनेक शहरांमध्ये लाखो  रुपये लांबवल्याचे उघडकीस आले आहे. 
एटीएम कार्डचे क्लोनिंग करून पैसे काढणा-या टोळीला अनेक ठिकाणी  पोलिसांनी गजाआड केले आहे. विशेष म्हणजे  विद्यार्थ्यांचाही या टोळीत समावेश आहे.
अनेक भामट्यांनी  एटीम कार्डचे क्लोनिंग करण्याचे  मशीन चीन वरून विकत घेतलेले आहे . अनेक  दुकान  आणि शोरूम मध्ये व पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर काही ग्राहक कार्डद्वारे पैसे देतात. यावेळी एटीम कार्डचे क्लोनिंग मशीन मधून देखील कार्ड स्वाईप करीत असे. ज्यामुळे कार्ड मधील पिनकोड व  सर्व माहीती मशीन मध्ये नोंद होत असते . ही माहिती वापरून हे भामटे   डुप्लीकेट एटीएम कार्ड बनवून विमानाने  दुसऱ्या राज्यात  जाउन मध्यरात्री एटीएम  पैसे काढत असतात 
ऑनलाईन ट्रान्सफरमधली असुरक्षितता लक्षात येते न येते तोच आता २४ तास काम करणारी एटीएमही असुरक्षित असल्याचं उघड झालंय. अनेक ठिकाणी एटीएम मशीनमधून एटीएम-डेबिट कार्डचे क्लोनिंग करून लाखो रुपयांची  रक्कम काढण्यात आलीय. 
उपाय काय ?
ज्याप्रमाणे ऑनलाईन बँकिंग मध्ये OTP  चा उपयोग होतो.  बँक हा OTP  खातेदाराच्या रजिस्टर मोबाईल वर पाठवत असते आणि तो OTP  वापरूनच  खातेदारांनां आर्थिक ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार पूर्ण करता येतात .त्या प्रकारची OTP  ची प्रणाली /व्यवस्था एटीएम /क्रेडिट कार्ड  वरून आर्थिक व्यवहार  करतांना असावी म्हणजे बऱ्यापैकी एटीएम /क्रेडिट कार्ड च्या गैरप्रकारांना लगाम बसेल असे मत सायबर तज्ञ  व्यक्त करतात 
सायबर दरोड्यांपासून कसा बचाव करावा 
--सुरक्षा यंत्रणेचा महत्त्वाचा भाग म्हणून निदान वर्षातून एकदा सर्व्हर आणि स्विच प्रणालीचं सिस्टिम ऑडिट किंवा पाहणीही पाहणी झाली पाहिजे
-यासाठी  बँकांनी  संगणकीय व्यवस्था, स्विचेस, नेटवर्क्स आणि सर्व्हर्स या उपकरणांसाठी   सुरक्षा व्यवस्था राबवून  ती सतत अद्ययावत ठेवाली तर बचाव करता येतो 
तसेच बँकांमधील सुरक्षेच्या पातळ्या अद्ययावत  ठेवलयास सायबर दरोड्यांपासून कसा बचाव करता येतो 
बँकांमधील  सुरक्षेच्या पातळ्या  खालीलप्रमाणे 
 १)भौतिक सुरक्षा :बँकेचे संगणक, सर्व्हर्स इआणि इतर उपकरणं बाहेरील व्यक्ती पासून सुरक्षित ठेवण्यासाठी या पातळीचा महत्वाचा वाट असतो 
२)सॉफ्टवेअर सुरक्षा प्रणाली :-  यात बँकेचेसंगणक, सर्व्हर्स वर anti virus softwares , firewalls आदी अद्ययावत करून त्यांचे सतत ऑडिट करणे हि कामे असतात 
३) बँकेच्या प्रक्रिया व व्यवहारांतली सुरक्षा  : यात बँकेच्या   कर्मचाऱयांना सायबर सुरक्षेची विविध  प्रशिक्षण देऊन बँकेच्या  सुरक्षा व्यवस्थांचे नियमितपणे ऑडिट करणे हि कामे असतात 
नुकसान कुणाचे आणि किती ?
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार एका दिवसाच्या आत बनावट व्यवहाराची तक्रार केली तर ठेवीदारांना संरक्षण मिळतं.त्यामुळे याप्रकरणात 
 ग्राहकांचं कुठलंही नुकसान होणार नाही, 
शिवाय ''जे बँक गैर व्यवहार झालेले आहेत  त्यात खातेदारांचं कार्ड वापरलं गेलेलं नव्हतं . त्यामुळे खातेदारांची  कुठलंही नुकसान होणार नाही. असे असले तरी 
या हल्ल्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती ढासळणार आहे. आणि त्यामुळे खातेदारांना  ठेवींवर मिळणार  डिव्हिडंड मिळणार नाही अशी शक्यता नाकारता येत नाही येणाऱ्या काळात बँक याबाबत सविस्तर खुलासा करेल 
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

सावध व्हा! पुन्हा ऑनलाईन भीतीचं सावट पसरलंय... ब्लू व्हेल सारखा खुनी खेळ 'मोमो गेम' आलाय


सावध व्हा! पुन्हा ऑनलाईन  भीतीचं सावट पसरलंय... ब्लू व्हेल सारखा खुनी खेळ 'मोमो गेम'  आलाय 
                                                     ......गेमच्या व्यसनापायी तासनतास एकाच जागी स्वमग्न बसणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवाखूप मोठा वर्ग  मोबाईल किंवा व्हिडिओ गेम्सच्या आहारी गेलेला आहे. तरूणाईला गेम्सचे  व्यसन लागलेले असून  गेम्सच्या आहारी जाऊन अनेक शारीरिक आणि मानसिक विकार त्यांना जडले आहेत. विरंगुळा म्हणून खेळले जाणारे हे खेळ आता तरूणाईच्या जीवाशी खेळू लागले आहे
मागील अनेक दिवसांपासून ‘किकी डू यू लव्ह मी’.  हे  इंटरनेटवरील गणं  कीकी चॅलेंजमुळे तरुणाईमध्ये अतिशय लोकप्रिय झालेलं दिसून आलेलं आहे . आणि यातील धोके बघून  जगभरातील अनेक शहरांमध्ये या चॅलेंजवर बंदी घालण्यात आलेली आहे  
 ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर या कीकी चॅलेंजने धुमाकूळ घातलेला आहे . 
जगप्रसिद्ध कॅनेडियन रॅपर डर्क नावाच्या  एक प्रसिद्ध गायकाचे  इन माय फिलिंग हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालंय... त्या गाण्यावर नाचायचा हा खेळ आहे. या खेळात चॅलेंज स्वीकारणाऱ्या इसमाने चालू गाडीमधून खाली उतरून हळूहळू चालणाऱ्या गाडीच्या दराजवळ नाचायचे आणि काही अंतर गेल्यावर पुन्हा चालू गाडीत येऊन बसायचे. हे सगळं करताना गाडी चालविणारी व्यक्ती  नाचणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शूट करतो . काही देशांमध्ये हा खेळ इन माय फिलींग्स चॅलेंज नावाने देखील ओळखले जातो  
आणि खेळात शूट केलेल्या धोकादायक डान्सचे व्हिडीओ #InMyFeelingsChallenge हा हॅशटॅग वापरून शेअर केले जातात तसेच काही तरुण 
 #KiKiChallenge हा हॅशटॅग वापरून या चॅलेंजचे व्हिडीओ शेअर करतात 
कीकी चॅलेंज हे नाव कसे ?
 इन माय फिलिंग या गाण्यातील पहिल्या कडव्यातील बोल किकी डू यू लव्ह मी असे आहे त्यामुळे  या खेळाला  कीकी चॅलेंज असे नाव पडलेले आहे 
  . अनेकांनी केले आहेत. तसेच हे चॅलेंज 
खेळास बंदी 
'हे चॅलेंज अर्थात खेळामुळे तो खेळणाऱ्याच्या जीवाला धोका तर आहेच शिवाय  इतरांच्या जीवालाही धोका पोहचू शकतो
त्यामुळे मुंबई पोलिसांनी या खेळावर बंदी आणलेली आहे . नागरीकांना  अशा प्रकारच्या चॅलेंजच्या माध्यमातून त्रास द्यायचं थांबविले नाहीतर हा खेळ खेळणाऱ्यांवर कारवाई होईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिलेला आहे 
मोमो गेम
दोन वर्षांपूर्वी आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल नावाच्या भयानक  गेमने जगात  दहशत पसरवली होती. 
एकट्या भारतातच अनेक मुलांनी आत्महत्या केल्या होत्या .  देखील डिझाइन केलेले आहेत.
कमकुवत मनाच्या व्यक्तींना जगायचा अधिकार नाही या विचित्र मानसिकतेतून  ब्ल्यू व्हेलची निर्मिती झाली हाती आणि आता त्याचीच पुढील आवृत्ती म्हणून मोमो गेम दाखल झालेला आहे तेव्हा सावधान 

आता त्यापेक्षाही भयंकर असा 'मोमो' हा नवीन गेम सोशल मीडियावर धुमाकूळ घालीत आहे . लोकांना घाबरविण्यासाठी बनविलेला हा गेम  आत्महत्येला प्रवृत्त करतो  आहे. 
या खेळाबद्दल 
'मोमो व्हॉटस्ऍप' एक क्रमांक आहे. जो व्हॉटस्ऍपवर शेअर केला जातोय. हा क्रमाक सर्वप्रथम फेसबुकवर आढळला . मोमो गेमचा क्रमांक जपानशी संबंधित असल्याची माहिती आहे. 
आत्महत्या करण्यासाठी हळूहळू उत्तेजित करतात. 
 सुरुवातीला एक भयानक फोटो पाठविला जातो. यानंतर अशाच प्रकारचे बरेच भयानक फोटो व व्हिडीओ क्लीपही पाठवले जातात. 
मोमो चॅलेंजमध्ये, अज्ञात नंबर वापरकर्त्यांना दिला जातो, तो सेव्ह केल्यावर  मग त्या अज्ञात क्रमांकाशी बोलन्याचे  आव्हान दिले जाते. पुढे या अज्ञात कॉन्टॅक्ट नंबरवरून आपल्याला वेगवेगळे टास्क दिले जातात.सुरुवातीला सोपे वाटणारे हे टास्क पुढे हिंसक होत जातात.टास्क पूर्ण न केल्यास यूजरला धमकी देतात. धमकीला घाबरून युजर मानसिक संतूलन गमावतात आणि आत्महत्येस प्रवृत्त होतात . गुन्हेगार युसर्सची 
वैयक्तिक माहिती चोरून ती उघड करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणीदेखील वसूल करतात 
या खेळापासून कसे दूर राहावे ?
-- मोबाईलच्या आहारी गेलेल्या लहान मुलांवर लक्ष ठेवा त्यांच्या वागण्या-बोलण्यात बदल दिसला तर त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधून त्यांच्या वागण्याबद्दल अधिक माहिती मिळवा .
--  तुम्हाला जर अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअपवर  किंवा एसएमएस वर   विचित्र  मेसेज आला तर तो  लगेच  डिलीट करा आणि त्याचा  कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करू नका. 
-- चुकून सेव्ह झालेल्या नंबरवरून जर कुठलाही विचित्र  गेम खेळण्यासाठी  उकसवण्यात आलं तर त्याकडे दुर्लक्ष केलेले केव्हाही हिताचेच असेल  

लेखक :  प्रा योगेश  हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)

Sunday, 12 August 2018

फेक न्यूजना, अफवांना नियंत्रणात आणण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि पोलिसमामा पुढे सरसावले


फेक न्यूजना, अफवांना  नियंत्रणात आणण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि पोलिसमामा पुढे  सरसावले 

व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागल्याच्या घटना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रासह देशभर पाहायला मिळाल्या आहेत. अफवांमुळे जमावाकडून हत्या होण्याचं लोण आता देशभर पसरलं आहे. देशातील 10 राज्यांत एकूण 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्हात अलिकडेच मुलं पळवल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांचा बळी घेतला होता.

त्यामुळे अशा फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी सरकारही पुढे सरसावलं आहे.फेक न्यूजवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपाय योजना करण्याच्या सूचना  केंद्र सरकारने फेसबूक, व्हॉट्सअॅप, यूट्युब, ट्विटर या कंपन्यांना केल्या आहेत . केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोटीस पाठवल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने अफवा रोखण्यासाठी नवं फीचर आणण्याचं आश्वासन दिलं आहे. व्हॉट्सअॅपने आयटी विभाग आणि गृह विभागासोबत विश्वासात राहून अशा अफवा रोखण्यासाठी काम करावे, असं आवाहनही रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअपला केले.
व्हॉट्सअॅपद्वारे खोटी माहिती पसरवून लोकांना चुकीच्या सूचना दिल्या जात आहेत. यामुळेच केंद्र सरकाने व्हॉट्सअॅपला हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा आदेश दिला होता
 फेक न्यूजना नियंत्रणात आणण्यासाठी व्हॉट्सअॅप सरसावले आहे 
'सस्पिशिअस लिंक डिटेक्शन'
wabetainfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार फेक न्यूज नियंत्रणात आणण्यासाठी 'सस्पिशिअस लिंक डिटेक्शन' नावाचं फिचर व्हॉट्सअॅप देणार . या नव्या फीचरने  युजरला व्हॉट्सअॅपवरील मेसेज फेक आहे की नाही याची पडताळणी करता येईल
या  नवीन फीचर बद्दल !
'सस्पिशिअस लिंक डिटेक्शन' फीचरद्वारे  युजरला एखादी लिंक आल्यास त्यां लिंकमध्ये काही संशयास्पद कंटेंट आहे का? ती फेक आहे का?  याची खातरजमा व्हॉट्सअपकडून केली जाणार आहे.आणि जर  लिंक संशयास्पद किंवा धोकादायक असेल तर  लिंकवर लाल रंगाचा धोक्याचा इशारा देण्यात येईल . या धोक्याकडे  दुर्लक्ष करत युजरने ही लिंक ओपन केल्यास युजर सर्वस्वी त्याला जबाबदार असणार आहे.
व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनच्या अधिकारात वाढ होणार 

सेटिंगमध्ये अॅडमिनला ‘सेंड मेसेजेस’ असा ऑप्शन मिळेल, ज्याच्या मदतीने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणते मेसेजेस पाठवले जाणार, हे आता अॅडमिन ठरवणार आहे . 
व्हॉट्सअपच्या  नव्या फीचरमुळे यापुढे अॅडमिनच्या परवानगीशिवाय मेम्बर्स ग्रुपमध्ये मेसेजेस पाठवू शकत नाहीत.
कुठल्या मोबाईलमध्ये आहे हे नवीन फिचर 
हे नवं फीचर सध्या अँड्रॉईड बीटा 2.18.201 व्हर्जन आणि आयफोनच्या 2.18.70 या व्हर्जनमध्ये देण्यात आलं आहे.
 आयवोएसच्या स्टेबल व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. लवकरच हे फीचर अँड्रॉईड आणि विन्डोजमध्ये उपलब्ध होणार आहे.
कसे आहे फिचर ?
ग्रुप सेटिंगमध्ये अॅडमिनला हे फीचर उपलब्ध असेल. सेटिंगमध्ये अॅडमिनला ‘सेंड मेसेजेस’ असा ऑप्शन मिळेल, ज्याच्या मदतीने अॅडमिनला    ग्रुपमध्ये पाठवल्या  जाणाऱ्या  मेसेजेसवर कंट्रोल ठेवता येणार  आहे.
कारण ग्रुपमध्ये अनेकदा वादग्रस्त मेसेजेस पाठवले जातात. काही मेसेजेसमुळे अशांतता पसरण्याचीही शक्यता असते. यावरच उपाय म्हणून व्हॉट्सअपने हे फीचर आणलं आहे.
या फीचरच्या माध्यमातून ग्रुप चॅटिंग अधिक चांगली व्हावी, असा व्हॉट्सअपचा हेतू आहे. 

व्हॉट्सॅप ग्रुप अॅडमिनसाठी खास 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' फीचर येणार 
व्हॉट्सअॅपवरील  ग्रुपमधील कुणीतरी सदस्य काहीतरी वादग्रस्त पोस्ट शेअर करतो आणि त्याचा परिणाम ग्रुप अॅडमिनला भोगाव्य लागल्याच्या अनेक घटना घडलेल्या  आहेत 
आता व्हॉट्सअॅपने 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' हे फीचर आणणार  आहे . सध्या प्रयोगिक अवस्थेतील  हे फीचर लवकरच अँड्रॉईड आणि आयओएस या  दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.

  ग्रुपमधील कुणीतरी सदस्य काहीतरी उपद्व्याप करतो , वादग्रस्त पोस्ट शेअर करतो   त्याचा परिणाम ग्रुप अॅडमिनलाही भोगावा लागतो. त्यामुळे अनेकजण ग्रुप तयार करणे टाळतात. तसेच अनेक ग्रुपमध्ये वादग्रस्त काही शेअर होत नसले, तरी देखील काही ना काही फालतू  खऱ्या खोट्या  बातम्या ,पोस्ट, फोटो, व्हिडीओ काही सदस्य  शेअर करत असतात. या साऱ्या गोष्टींना कंटाळूनच अनेकजण ग्रुपला राम राम करतात ,ग्रुप सोडतात . हे टाळण्याकरिता व्हॉट्सअॅपने , त्यासंबंधित नवे फीचर आणले आहे.

 'रिस्ट्रिक्ट ग्रुप'

व्हॉट्सअॅपच्या 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' फीचरमुळे ग्रुप अॅडमिनला काही विशेष अधिकार मिळणार आहेत. 
- या फीचरमुळे ग्रुपमध्ये वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या सदस्याला 'रिस्ट्रिक्ट' करता येईल. असे केल्याने संबंधित सदस्य ग्रुपमधील इतर सदस्यांच्या पोस्ट वाचू शकतो, पाहू शकतो, मात्र स्वत: काही पोस्ट शेअर करु शकत नाही.
- हे फीचर  ग्रुपच्या सेटिंगमध्ये जाऊन ते वापरता येईल.
- दरम्यान, ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या किंवा खोऱ्याने पोस्ट टाकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरणार आहे.
'रिस्ट्रिक्ट ग्रुप' हे फीचर ज्यावेळी प्रत्यक्षात येईल, तेव्हा ग्रुप अॅडमिन खऱ्या अर्थाने ग्रुप चालवताना सुटकेचा श्वास घेईल. 
व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोलिसमामांची  करडी नजर 
महाराष्ट्रातल्या सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना जास्तीतजास्त व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जगभरात व्हॉट्सॅप यूजर्सची संख्या 150 कोटींच्या घरात आहे. त्यातले तब्बल 20 कोटी ग्राहक हे भारतातले आहेत... 
  देशात व्हॉट्सअॅप  वापरणाऱ्या व्यक्तींची टक्केवारी सर्वाधिक आहे प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅपवर असंख्य  ग्रुप असतात. शाळेचे, कॉलेजचे, कार्यालयातले, मित्रांचे असे प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप. आता तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आणखी एक जण अॅड होणार आहे. तो आहे पोलिसमामा.
व्हॉट्सअॅपवरुन अविचारी फॉरवर्ड्स. कोणतीही शहानिशा न करता मेसेज  सेकंदात फॉरवर्ड होनारे मेसेजस यामुळे महाराष्ट्रात अफवांचं पीक गाजर गवतासारखं पसरलं आहे  म्हणूनच 

महाराष्ट्रातल्या सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना जास्तीतजास्त व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आता पोलिसमामाच आपल्या ग्रुपमध्ये असल्यावर ग्रुपवर   जो अफवा पसरवेल... त्याची खैर नाही.
@  प्रा योगेश अशोक हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)

Monday, 30 July 2018

‘रेडिएशन हझार्ड्स ऑफ सेल फोन’ : सावधान ! स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूच्या कॅन्सरचा धोका

रेडिएशन हझार्ड्स ऑफ सेल फोन’ :
सावधान ! स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूच्या  कॅन्सरचा धोका
                    

माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संवादाची प्रभावी माध्यमं  स्मार्टफोन उपयोगी पडतोय . सगळ्याच गोष्टी आता  स्मार्टफोनवर 'अपलोड' होऊ लागल्याय परंतु स्मार्टफोन तंत्रज्ञानाचा अतिवापर आरोग्याला मारक तर ठरत आहे . नवीनतम तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या बदलांपासून व्यक्तींना दूर ठेवणे शक्य नाही; परंतु हे समाजासाठी अतिशय घातक आहे. त्याबद्दल मोठय़ा प्रमाणावर जागरूकता होणे आवश्यक आहे 
पूर्वी इंटरनेटचा वापर सायबर कॅफे, ऑफिसपर्यंत मर्यादित होता पंरतु आज स्मार्टफोन, आयपॅड, टॅबलेट स्मार्ट  टीव्ही यावर इंटरनेट द्वारे  वाट्टेल तिथे ,वाट्टेल तेव्हा,  कनेक्ट होता येतंय आणि  सतत संवाद साधणे शक्य झालाय परंतु हे आरोग्यासाठी मारक ठरत आहे मोबाइलवर  अधिकाधिक गुंतून  राहन्याची सवय  शारिरिक, मानसिक आरोग्यावर आता घाला घालू लागली आहे.
स्मार्टफोनमुळे मुलांच्या आरोग्यावर किती भयंकर परिणाम होतात याबाबत ऊहापोह.........
मुंबई आयआयटीचे इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी  केंद्र सरकारला दिलेल्या अहवालात स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका वाढलाय असे म्हटले आहे आणि तरूणांना याचा सर्वाधिक धोका असल्याचंही यात म्हटलंय. 
प्राध्यापक गिरीश कुमार म्हणतात कि , “सतत चार वर्ष दरदिवशी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फोनवर बोलल्याने श्रवण शक्ती क्षीण होते. तसंच दृष्टीवरही परिणाम होतो. याशिवाय 30 ते 35 वर्ष वय असलेल्यांमध्ये मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता वाढते. यामध्ये अल्झायमर आणि पार्किन्सन यांसारख्या आजारांचा समावेश आहे.”
. पुढे प्राध्यापक गिरीश कुमार  यांनी स्पष्ट केले  कि . स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे किरणोत्सर्गाचं आणि प्रकृतीला धोका असलेल्या लहरींचं प्रमाण ४०० टक्क्यांनी वाढले ल आहे . त्यामुळे मोबाईलचा अति वापर करणाऱ्यांना कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही,लहान मुलं आणि तरुणांवर किरणोत्सर्गाचा प्रभाव लवकर होतो. तसंच यामुळे पुरुषत्वावरही परिणाम होतो,
“मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गाने चिमण्या, मधमाशा आणि फुलपाखरुसह इतर सजीव आणि झाडांची हानीकारक परिणाम होत आहे,
स्मार्ट फोनच्या अतिवापराचे  दुष्परिणाम:
स्मार्टफोनच्या अतिवापराने पुरुष प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांच्या आरोग्यास स्मार्टफोनमुळे गंभीर धोका निर्माण झाला असून, मुलांच्या डोक्याची कवटी अतिशय पातळ असते आणि त्यामधून किरणे सहजपणे जातात. स्मार्टफोनमधून निघणारी घातक किरणे प्राणी आणि वनस्पतींवर गंभीर प्रभाव करण्यास कारणीभूत ठरतात, असे गिरीश कुमार यांनी म्हटले आहे
तसेच संशोधनादवारे अजून काही स्मार्ट फोनच्या अतिवापराने दुष्परिणाम समोर आलेले आहे ते खालील प्रमाणे 
-- इअरफोन कानामध्ये घालून ४० मिनिटांहून अधिक वेळ गाणी ऐकणं बहिरेपणाला आमंत्रण देण्याचं लक्षण आहे
----  जास्तीतजास्त वेळ इंटरनेट सर्फिंग आणि गेम खेळण्यात घालवणारी किशोरवयीन मुलं उच्च रक्तदाबाच्या किंवा स्थूलतेला बळी पडत आहेत. उशाला मोबाइल ठेवून झोपणाऱ्यांमध्ये निद्रानाशाचं प्रमाण वाढतंय, 
-- मुला-मुलींमध्ये व्यसनाधीनता, उदासीनता, स्थूलता, एकलकोंडेपणा असे शारीरिक आणि मानसिक पातळीवरचे आजार निर्माण होतात 
--  चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांच्या आजारात वाढ झालीय , मोतीबिंदूसारखे आजार होताहेत. 
--  सतत मोबाइल खिशात घेऊन फिरणाऱ्या पुरुषांमध्ये वंधत्वाच्या तक्रारी येत आहेत 
-- मोबाइलवर अधिक प्रमाणात गेम खेळणाऱ्या मुलांना  अल्झायमरसारख्या आजारांनाही सामोरं जावं लागतं.
संर्टफोनचा वापर नियंत्रित करा :
--लहान मुलांच्या हाती स्मार्ट फोन अजिबात देऊ नये. शाळा कॉलेजांमधून मुलांना स्मार्ट फोनपासून परावृत्त करावं. 
-- पालकांनी आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधी स्वतः स्मार्ट फोनचा वापर टाळावा. 
--रोज वाचन करावे तसेच थोडा व्यायामही करावा 
मोबाईल हॅण्डसेट आणि टॉवरमधून प्रसारित होणारा किरणोत्सर्ग कमी करण्यासाठी:
मोबाईल हॅण्डसेट आणि टॉवरमधून प्रसारित होणारा किरणोत्सर्ग कमी करण्यासाठी सरकारने काही  सूचना लागू केल्या आहेत.
--  मोबाईलवर कमीत कमी बोलावे 
--    लहान मुलांपासून मोबाईल दूर ठेवावे 
--शक्य असल्यास मोबाईलऐवजी लॅण्डलाईनचा वापर करा
--   शक्य असल्यास बोलण्यापेक्षा एसएमएसचा वापर करा
--  बोलताना मोबाईल फोन कानापासून शक्य तेवढा दूर ठेवावा
--  बोलण्यासाठी शक्यतो हेडफोन किंवा ब्लूटूथचा वापर करावा
--   मोबाईलवरील स्पीकर सुविधेचा जास्तीत जास्त वापर करा
-- रेंज मिळत नसल्यास बोलणे टाळा, कारण रेंज नसलेल्या ठिकणी मोबाईल जास्त ताकदीने कार्यरत होतो, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम शरिरावर होतो
--बोलताना मोबाईलचा कानावर दबाव पडणार नाही याची काळजी घ्या. खांदा आणि कान यामध्ये मोबाईल ठेवून बोलणे टाळा. बाईकवरून चालवताना किंवा बाईकवरून जाताना मोबाईल वापरू नका
--कृत्रिम अवयव प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांनी मोबाईल दूर ठेवा
--   बोलताना मोबाईलचा कानावर दबाव पडणार नाही याची काळजी घ्या. खांदा आणि कान यामध्ये मोबाईल ठेवून बोलणे टाळा. बाईकवरून चालवताना किंवा बाईकवरून जाताना मोबाईल वापरू नका
--हेलमेट असताना किंवा केस ओले असताना अथवा आंघोळ केल्या केल्या मोबाईलवर बोलणे टाळा. तसंच मेटल फोनचा चष्मा असलेल्यांनी मोबाईलवर बोलू नये. मेटल आणि पाणी हे रेडिओ लहरींचा सुवाहक आहे
--    फोन कनेक्ट झाल्यावरच तो कानाला लावा. कारण मोबाईल, कॉल कनेक्ट करण्यासाठी हाय पॉवर घेतो.
सरकारने केलेल्या  उपाय योजना :
--मोबाईलमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गची मर्यादा, २ वॅटवरून १.६ वॅट करण्यात आली आहे. त्यामुळेही मोबाईल आता पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षित मानण्यात येत आहे. तसंच त्यामुळे आरोग्यावर होणारा दुष्परिणाम कमी होईल, 
-- मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गाच्या प्रमाणातही सरकारने एक दशांशने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मोबाईल टॉवर उभारण्यासाठीही नव्याने निर्देश दिले आहेत.
-- मोबाईल कंपन्यांवरही काही बंधन घालण्यात आली आहेत. यामध्ये त्यांना मोबाईलची एसएआर मूल्याची माहिती देणं, तसंच हॅण्टसेटसोबत एक बुकलेट देणं बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे.
मोबाईल फोनच्या हँडसेटचे प्रत्येक मॉडेल कमी-अधिक रेडिएशन उत्सजिर्त करीत असते. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल फोन कंपन्यांनी, तो उत्सजिर्त करीत असलेल्या रेडिएशनचे प्रमाण फोनच्या पॅकिंगवर छापणे बंधनकारक करावे, असे मोबाईल फोनच्या धोक्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 'स्पेसिफिक अॅब्सॉर्प्शन रेट'नुसार (एसएआर) या धोक्याचे प्रमाण ठरवले जाते. 'एसएआर' म्हणजे मेंदूतील चेतापेशी फोनचे रेडिएशन शोषून घेतात ते प्रमाण. एका विशिष्ट प्रमाणापर्यंत हे उत्सर्जन होत असल्यास त्यापासून धोका नसतो

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
mobile: 9423077963

व्हॉट्सअॅपवरील फेक मेसेजमुळे "मॉब लिंचिंग"सारखे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना फेक न्यूजना, अफवांना नियंत्रणात आणण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि पोलिसमामा पुढे सरसावले ...व्हॉट्सअॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!

व्हॉट्सअॅपवरील  फेक मेसेजमुळे "मॉब लिंचिंग"सारखे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना
फेक न्यूजना, अफवांना  नियंत्रणात आणण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि पोलिसमामा पुढे  सरसावले ...व्हॉट्सअॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!


व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागल्याच्या घटना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रासह देशभर पाहायला मिळाल्या आहेत. अफवांमुळे जमावाकडून हत्या होण्याचं लोण आता देशभर पसरलं आहे. देशातील 10 राज्यांत एकूण 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्हात अलिकडेच मुलं पळवल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांचा बळी घेतला होता.

त्यामुळे अशा फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी सरकारही पुढे सरसावलं आहे.फेक न्यूजवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपाय योजना करण्याच्या सूचना  केंद्र सरकारने फेसबूक, व्हॉट्सअॅप, यूट्युब, ट्विटर या कंपन्यांना केल्या आहेत . केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोटीस पाठवल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने अफवा रोखण्यासाठी नवं फीचर आणण्याचं आश्वासन दिलं आहे. व्हॉट्सअॅपने आयटी विभाग आणि गृह विभागासोबत विश्वासात राहून अशा अफवा रोखण्यासाठी काम करावे, असं आवाहनही रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअपला केले.
व्हॉट्सअॅपद्वारे खोटी माहिती पसरवून लोकांना चुकीच्या सूचना दिल्या जात आहेत. यामुळेच केंद्र सरकाने व्हॉट्सअॅपला हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा आदेश दिला होता
 फेक न्यूजना नियंत्रणात आणण्यासाठी व्हॉट्सअॅप सरसावले आहे 
भारतीय युझर्स व्हॉट्सअॅपवर एकावेळी पाचपेक्षा जास्त जणांना मेसेज फॉरवर्ड करू शकणार नाही ...
जगभरात व्हॉट्सअॅपचे 100 कोटी युझर्स आहेत, त्यापैकी 20 कोटी एकट्या भारतात आहेत.दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारतातील लोक मेसेज, व्हिडीओ किंवा फोटो जास्त फॉरवर्ड करतात. मागील काही दिवसात फेक न्यूजचा वेगाने प्रसार झाल्याने देशात हत्येसह हिंसेची,मॉब लिंचिंगच्या अनेकघटना घडल्या होत्या . व्हॉट्सअॅपवरील  फेक न्यूज प्रकरणी भारत सरकारनेही कंपनीला नोटीस पाठवलेली आहे . सरकारने व्हॉट्सअॅपला  नोटीस पाठवून बनावट आणि चुकीच्या मेसेजचा प्रसार रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यास सांगितलं होतं. अफवांच्या प्रसारात माध्यमही दोषी समजलं जाईल आणि यावर उपाय केला नाही तर तुम्हालाही कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, असा इशाराही सरकारने दिला आहे.
बॅड एलिमेंट्सद्वारे देशात दंगली घडविण्यासाठी ,शांतता भंग करण्याकरिता फेक न्यूज  पसरवल्या जातात तेव्हा माध्यमही जबाबदार असतं असं माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटलं होतं. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत व्हॉट्सअॅपला योग्य उपाय करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार व्हॉट्सअॅपनेही नियमावली जारी केली आहे ' त्यामुळे 
भारतात राहणाऱ्या युझर्ससाठी  व्हॉट्सअॅपने काही बदल केलेले आहेत त्यानुसार 
 युझर्ससाठी मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार व्हॉट्सअॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!. 
 म्हणजे युझर्स व्हॉट्सअॅपवर एकावेळी पाचपेक्षा जास्त जणांना मेसेज आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करू शकणार नाही 
 मीडिया मेसेजसाठी असलेलय क्विक फॉरवर्ड बटणचाही वापर युझर्स आता करु शकत नाहीत, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.  बनावट युझरचा प्रसार रोखण्यासाठी कंपनीने हे पावले उचलले आहे 

'सस्पिशिअस लिंक डिटेक्शन'
wabetainfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार फेक न्यूज नियंत्रणात आणण्यासाठी 'सस्पिशिअस लिंक डिटेक्शन' नावाचं फिचर व्हॉट्सअॅप देणार . या नव्या फीचरने  युजरला व्हॉट्सअॅपवरील मेसेज फेक आहे की नाही याची पडताळणी करता येईल
या  नवीन फीचर बद्दल !
'सस्पिशिअस लिंक डिटेक्शन' फीचरद्वारे  युजरला एखादी लिंक आल्यास त्यां लिंकमध्ये काही संशयास्पद कंटेंट आहे का? ती फेक आहे का?  याची खातरजमा व्हॉट्सअपकडून केली जाणार आहे.आणि जर  लिंक संशयास्पद किंवा धोकादायक असेल तर  लिंकवर लाल रंगाचा धोक्याचा इशारा देण्यात येईल . या धोक्याकडे  दुर्लक्ष करत युजरने ही लिंक ओपन केल्यास युजर सर्वस्वी त्याला जबाबदार असणार आहे.
व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनच्या अधिकारात वाढ होणार 

सेटिंगमध्ये अॅडमिनला ‘सेंड मेसेजेस’ असा ऑप्शन मिळेल, ज्याच्या मदतीने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणते मेसेजेस पाठवले जाणार, हे आता अॅडमिन ठरवणार आहे . 
व्हॉट्सअपच्या  नव्या फीचरमुळे यापुढे अॅडमिनच्या परवानगीशिवाय मेम्बर्स ग्रुपमध्ये मेसेजेस पाठवू शकत नाहीत.
कुठल्या मोबाईलमध्ये आहे हे नवीन फिचर 
हे नवं फीचर सध्या अँड्रॉईड बीटा 2.18.201 व्हर्जन आणि आयफोनच्या 2.18.70 या व्हर्जनमध्ये देण्यात आलं आहे.
 आयवोएसच्या स्टेबल व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. लवकरच हे फीचर अँड्रॉईड आणि विन्डोजमध्ये उपलब्ध होणार आहे.
कसे आहे फिचर ?
ग्रुप सेटिंगमध्ये अॅडमिनला हे फीचर उपलब्ध असेल. सेटिंगमध्ये अॅडमिनला ‘सेंड मेसेजेस’ असा ऑप्शन मिळेल, ज्याच्या मदतीने अॅडमिनला    ग्रुपमध्ये पाठवल्या  जाणाऱ्या  मेसेजेसवर कंट्रोल ठेवता येणार  आहे.
कारण ग्रुपमध्ये अनेकदा वादग्रस्त मेसेजेस पाठवले जातात. काही मेसेजेसमुळे अशांतता पसरण्याचीही शक्यता असते. यावरच उपाय म्हणून व्हॉट्सअपने हे फीचर आणलं आहे.
या फीचरच्या माध्यमातून ग्रुप चॅटिंग अधिक चांगली व्हावी, असा व्हॉट्सअपचा हेतू आहे. 

व्हॉट्सॅप ग्रुप अॅडमिनसाठी खास 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' फीचर येणार 
व्हॉट्सअॅपवरील  ग्रुपमधील कुणीतरी सदस्य काहीतरी वादग्रस्त पोस्ट शेअर करतो आणि त्याचा परिणाम ग्रुप अॅडमिनला भोगाव्य लागल्याच्या अनेक घटना घडलेल्या  आहेत 
आता व्हॉट्सअॅपने 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' हे फीचर आणणार  आहे . सध्या प्रयोगिक अवस्थेतील  हे फीचर लवकरच अँड्रॉईड आणि आयओएस या  दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.

  ग्रुपमधील कुणीतरी सदस्य काहीतरी उपद्व्याप करतो , वादग्रस्त पोस्ट शेअर करतो   त्याचा परिणाम ग्रुप अॅडमिनलाही भोगावा लागतो. त्यामुळे अनेकजण ग्रुप तयार करणे टाळतात. तसेच अनेक ग्रुपमध्ये वादग्रस्त काही शेअर होत नसले, तरी देखील काही ना काही फालतू  खऱ्या खोट्या  बातम्या ,पोस्ट, फोटो, व्हिडीओ काही सदस्य  शेअर करत असतात. या साऱ्या गोष्टींना कंटाळूनच अनेकजण ग्रुपला राम राम करतात ,ग्रुप सोडतात . हे टाळण्याकरिता व्हॉट्सअॅपने , त्यासंबंधित नवे फीचर आणले आहे.

 'रिस्ट्रिक्ट ग्रुप'

व्हॉट्सअॅपच्या 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' फीचरमुळे ग्रुप अॅडमिनला काही विशेष अधिकार मिळणार आहेत. 
- या फीचरमुळे ग्रुपमध्ये वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या सदस्याला 'रिस्ट्रिक्ट' करता येईल. असे केल्याने संबंधित सदस्य ग्रुपमधील इतर सदस्यांच्या पोस्ट वाचू शकतो, पाहू शकतो, मात्र स्वत: काही पोस्ट शेअर करु शकत नाही.
- हे फीचर  ग्रुपच्या सेटिंगमध्ये जाऊन ते वापरता येईल.
- दरम्यान, ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या किंवा खोऱ्याने पोस्ट टाकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरणार आहे.
'रिस्ट्रिक्ट ग्रुप' हे फीचर ज्यावेळी प्रत्यक्षात येईल, तेव्हा ग्रुप अॅडमिन खऱ्या अर्थाने ग्रुप चालवताना सुटकेचा श्वास घेईल. 
व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोलिसमामांची  करडी नजर 
महाराष्ट्रातल्या सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना जास्तीतजास्त व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जगभरात व्हॉट्सॅप यूजर्सची संख्या 150 कोटींच्या घरात आहे. त्यातले तब्बल 20 कोटी ग्राहक हे भारतातले आहेत... 
  देशात व्हॉट्सअॅप  वापरणाऱ्या व्यक्तींची टक्केवारी सर्वाधिक आहे प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅपवर असंख्य  ग्रुप असतात. शाळेचे, कॉलेजचे, कार्यालयातले, मित्रांचे असे प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप. आता तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आणखी एक जण अॅड होणार आहे. तो आहे पोलिसमामा.
व्हॉट्सअॅपवरुन अविचारी फॉरवर्ड्स. कोणतीही शहानिशा न करता मेसेज  सेकंदात फॉरवर्ड होनारे मेसेजस यामुळे महाराष्ट्रात अफवांचं पीक गाजर गवतासारखं पसरलं आहे  म्हणूनच 

महाराष्ट्रातल्या सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना जास्तीतजास्त व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आता पोलिसमामाच आपल्या ग्रुपमध्ये असल्यावर ग्रुपवर   जो अफवा पसरवेल... त्याची खैर नाही.
@  प्रा योगेश अशोक हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)

Wednesday, 7 March 2018

उपयुक्त मोबाईल ॲप

उपयुक्त मोबाईल ॲप

सध्या विविध शासकीय सेवांचे आणि खाजगी सेवांचे विविध मोबाईल  अॅप्स
शासनाच्या विविध विभागांनी  तसेच खाजगी समूहाने विकसित केलेले आहे 
विविध कॅटॅगिरीधील सर्वात जास्त उपयोगी  मोबाईल  अॅप्सचा  उहापोह करू या !

महावितरणचे मोबाईल ॲप
महावितरणचे दर महिन्याच्या वीजबिलावरील क्‍यूआर कोडच्या साह्याने अवघ्या एका क्‍लिकवरून महावितरणचे ॲप डाऊनलोड करण्याची सोय महावितरणने केली आहे. 
हे ॲप ॲन्ड्रॉईड, विन्डोज आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या मोबाईल ग्राहकांना क्‍यूआर कोडच्या साह्यानेडाऊनलोड करणे शक्‍य होणार आहे, 
 नव्या स्वरूपातील वीजबिल ग्राहकांना वितरित करण्यात येत असून सद्यस्थितीत बारकोडपेक्षाही अधिक वापर असलेल्या क्‍यूआर कोड या वीजबिलावर आहे. याद्वारे महावितरणचे मोबाईल ॲप थेट डाऊनलोड करता येत आहे. मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाऊनलोड करून घेतलेल्या क्‍यूआर कोड रीडरच्या माध्यमातून महावितरणच्या वीजबिलावरील क्‍यूआर कोड स्कॅन केला की थेट महावितरण मोबाईल ॲपची लिंक मिळत आहे.
उपलब्ध सुविधा  :या ॲपमधून उच्च व लघुदाब (एलटी व एचटी) नवीन वीजजोडणीची मागणी करता येणे शक्‍य झाले आहे. चालू व मागील बिल पाहणे आणि त्याचा भरणा करण्यासाठी नेटबॅंकिंग, क्रेडिट / डेबिट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्डसचा पर्याय आहे; तर भरलेल्या पावतीचा तपशीलही देण्यात येत आहे. ॲपमधील टोल फ्री क्रमांकावरून कॉल सेंटरमध्ये संपर्काची व तक्रारी नोंदवण्याची सोय आहे, 
महावितरणने विविध ग्राहक सेवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून एका क्‍लिकवर उपलब्ध करून दिल्याने त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात १२ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी महावितरण मोबाईल ॲप डाऊनलोड केले आहे.
अत्यावश्यक वैद्यकीय सेवेच्या मोबाईल ॲप
गोल्डन अवर सिस्टीम्स या कंपनीने बनविलेले ‘Ambulance.run’ हे आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबधित ॲप आहे. 
या ॲपद्वारे वापरकर्ता आपत्कालीन स्थितीमध्ये स्मार्ट फोनच्या मदतीने ॲम्ब्युलन्स बुक करू शकतात. काही क्लिकद्वारे आपल्या जवळील ॲम्ब्युलन्स शोधण्यासाठी, बुक करण्यासाठी आणि सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी हे ॲप वापरकर्त्याला उपयोगी पडेल .
या  ॲपद्वारे वापरकर्त्याची सद्यस्थिती हेच त्याचे आपत्कालीन किंवा पिक अप लोकेशन गृहीत धरली जाईल .  हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात सहाय्यक ठरेल . ‘Ambulance.run’ सद्यस्थितीला २५०हून अधिक रूग्णवाहिका ऑपरेटर त्याचबरोबर ३६० हून अधिक ॲम्ब्युलन्सबरोबर कार्यन्वित आहे. 
हे ॲप Google plystore वर उपलब्ध आहे. आणि आपण www.ambulance.run हया संकेतस्थळावर ॲम्ब्युलन्स बुक करु शकता.

पर्यटन स्थळांच्या माहितीचे  टूरीझम मोबाईल ॲप(एम.टी.डी.सी.मोबाईल ॲप)
 महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून टूरीझम मोबाईल ॲप ची  सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे राज्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होते 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मोबाईल ॲपमध्ये पर्यटकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना सबंधीत पर्यटन स्थळाजवळील हॉटेल्स, रिसॉर्ट, हॉलीडे पॅकेजची माहिती, निसर्गरम्य स्थळे, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती, ई गाईडची सुविधा, तसेच नकाशा पाहून पर्यटनाच्या दृष्टीने नियोजन करता येणे सोपे होणार आहे.

पोस्टमन मोबाईल ॲप
 टपाल विभागाच्या वतीने “पोस्टमॅन मोबाईल ॲप” सुरु करण्यात आले आहे या द्वारे स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, टपाल आदींच्या वितरणाची योग्य वेळेवर खातरजमा करुन घेता येते . टपाल विभागात कार्यरत असणाऱ्या काही  पोस्टमनना स्मार्ट फोन देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये पोस्टमॅन ॲप चा समावेश करण्यात आलेला आहे. टपाल वस्तू प्राप्त करणे, ई-हस्तांक्षर घेणे, त्याच ठिकाणी सेंट्रल सर्व्हर मध्ये संबंधित माहिती अपलोड करणे आदी या ॲप्लिकेशनची वैशिष्ट्ये आहेत
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )