माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संवादाची प्रभावी माध्यमं स्मार्टफोन उपयोगी पडतोय . सगळ्याच गोष्टी आता स्मार्टफोनवर 'अपलोड' होऊ लागल्याय परंतु स्मार्टफोन तंत्रज्ञानाचा अतिवापर आरोग्याला मारक तर ठरत आहे . नवीनतम तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या बदलांपासून व्यक्तींना दूर ठेवणे शक्य नाही; परंतु हे समाजासाठी अतिशय घातक आहे. त्याबद्दल मोठय़ा प्रमाणावर जागरूकता होणे आवश्यक आहे
पूर्वी इंटरनेटचा वापर सायबर कॅफे, ऑफिसपर्यंत मर्यादित होता पंरतु आज स्मार्टफोन, आयपॅड, टॅबलेट स्मार्ट टीव्ही यावर इंटरनेट द्वारे वाट्टेल तिथे ,वाट्टेल तेव्हा, कनेक्ट होता येतंय आणि सतत संवाद साधणे शक्य झालाय परंतु हे आरोग्यासाठी मारक ठरत आहे मोबाइलवर अधिकाधिक गुंतून राहन्याची सवय शारिरिक, मानसिक आरोग्यावर आता घाला घालू लागली आहे.
स्मार्टफोनमुळे मुलांच्या आरोग्यावर किती भयंकर परिणाम होतात याबाबत ऊहापोह.........
मुंबई आयआयटीचे इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी केंद्र सरकारला दिलेल्या अहवालात स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका वाढलाय असे म्हटले आहे आणि तरूणांना याचा सर्वाधिक धोका असल्याचंही यात म्हटलंय.
प्राध्यापक गिरीश कुमार म्हणतात कि , “सतत चार वर्ष दरदिवशी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फोनवर बोलल्याने श्रवण शक्ती क्षीण होते. तसंच दृष्टीवरही परिणाम होतो. याशिवाय 30 ते 35 वर्ष वय असलेल्यांमध्ये मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता वाढते. यामध्ये अल्झायमर आणि पार्किन्सन यांसारख्या आजारांचा समावेश आहे.”
. पुढे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी स्पष्ट केले कि . स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे किरणोत्सर्गाचं आणि प्रकृतीला धोका असलेल्या लहरींचं प्रमाण ४०० टक्क्यांनी वाढले ल आहे . त्यामुळे मोबाईलचा अति वापर करणाऱ्यांना कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही,लहान मुलं आणि तरुणांवर किरणोत्सर्गाचा प्रभाव लवकर होतो. तसंच यामुळे पुरुषत्वावरही परिणाम होतो,
“मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गाने चिमण्या, मधमाशा आणि फुलपाखरुसह इतर सजीव आणि झाडांची हानीकारक परिणाम होत आहे,
स्मार्ट फोनच्या अतिवापराचे दुष्परिणाम:
स्मार्टफोनच्या अतिवापराने पुरुष प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांच्या आरोग्यास स्मार्टफोनमुळे गंभीर धोका निर्माण झाला असून, मुलांच्या डोक्याची कवटी अतिशय पातळ असते आणि त्यामधून किरणे सहजपणे जातात. स्मार्टफोनमधून निघणारी घातक किरणे प्राणी आणि वनस्पतींवर गंभीर प्रभाव करण्यास कारणीभूत ठरतात, असे गिरीश कुमार यांनी म्हटले आहे
तसेच संशोधनादवारे अजून काही स्मार्ट फोनच्या अतिवापराने दुष्परिणाम समोर आलेले आहे ते खालील प्रमाणे
-- इअरफोन कानामध्ये घालून ४० मिनिटांहून अधिक वेळ गाणी ऐकणं बहिरेपणाला आमंत्रण देण्याचं लक्षण आहे
---- जास्तीतजास्त वेळ इंटरनेट सर्फिंग आणि गेम खेळण्यात घालवणारी किशोरवयीन मुलं उच्च रक्तदाबाच्या किंवा स्थूलतेला बळी पडत आहेत. उशाला मोबाइल ठेवून झोपणाऱ्यांमध्ये निद्रानाशाचं प्रमाण वाढतंय,
-- मुला-मुलींमध्ये व्यसनाधीनता, उदासीनता, स्थूलता, एकलकोंडेपणा असे शारीरिक आणि मानसिक पातळीवरचे आजार निर्माण होतात
-- चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांच्या आजारात वाढ झालीय , मोतीबिंदूसारखे आजार होताहेत.
-- सतत मोबाइल खिशात घेऊन फिरणाऱ्या पुरुषांमध्ये वंधत्वाच्या तक्रारी येत आहेत
-- मोबाइलवर अधिक प्रमाणात गेम खेळणाऱ्या मुलांना अल्झायमरसारख्या आजारांनाही सामोरं जावं लागतं.
संर्टफोनचा वापर नियंत्रित करा :
--लहान मुलांच्या हाती स्मार्ट फोन अजिबात देऊ नये. शाळा कॉलेजांमधून मुलांना स्मार्ट फोनपासून परावृत्त करावं.
-- पालकांनी आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधी स्वतः स्मार्ट फोनचा वापर टाळावा.
--रोज वाचन करावे तसेच थोडा व्यायामही करावा
मोबाईल हॅण्डसेट आणि टॉवरमधून प्रसारित होणारा किरणोत्सर्ग कमी करण्यासाठी:
मोबाईल हॅण्डसेट आणि टॉवरमधून प्रसारित होणारा किरणोत्सर्ग कमी करण्यासाठी सरकारने काही सूचना लागू केल्या आहेत.
-- मोबाईलवर कमीत कमी बोलावे
-- लहान मुलांपासून मोबाईल दूर ठेवावे
--शक्य असल्यास मोबाईलऐवजी लॅण्डलाईनचा वापर करा
-- शक्य असल्यास बोलण्यापेक्षा एसएमएसचा वापर करा
-- बोलताना मोबाईल फोन कानापासून शक्य तेवढा दूर ठेवावा
-- बोलण्यासाठी शक्यतो हेडफोन किंवा ब्लूटूथचा वापर करावा
-- मोबाईलवरील स्पीकर सुविधेचा जास्तीत जास्त वापर करा
-- रेंज मिळत नसल्यास बोलणे टाळा, कारण रेंज नसलेल्या ठिकणी मोबाईल जास्त ताकदीने कार्यरत होतो, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम शरिरावर होतो
--बोलताना मोबाईलचा कानावर दबाव पडणार नाही याची काळजी घ्या. खांदा आणि कान यामध्ये मोबाईल ठेवून बोलणे टाळा. बाईकवरून चालवताना किंवा बाईकवरून जाताना मोबाईल वापरू नका
--कृत्रिम अवयव प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांनी मोबाईल दूर ठेवा
-- बोलताना मोबाईलचा कानावर दबाव पडणार नाही याची काळजी घ्या. खांदा आणि कान यामध्ये मोबाईल ठेवून बोलणे टाळा. बाईकवरून चालवताना किंवा बाईकवरून जाताना मोबाईल वापरू नका
--हेलमेट असताना किंवा केस ओले असताना अथवा आंघोळ केल्या केल्या मोबाईलवर बोलणे टाळा. तसंच मेटल फोनचा चष्मा असलेल्यांनी मोबाईलवर बोलू नये. मेटल आणि पाणी हे रेडिओ लहरींचा सुवाहक आहे
-- फोन कनेक्ट झाल्यावरच तो कानाला लावा. कारण मोबाईल, कॉल कनेक्ट करण्यासाठी हाय पॉवर घेतो.
सरकारने केलेल्या उपाय योजना :
--मोबाईलमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गची मर्यादा, २ वॅटवरून १.६ वॅट करण्यात आली आहे. त्यामुळेही मोबाईल आता पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षित मानण्यात येत आहे. तसंच त्यामुळे आरोग्यावर होणारा दुष्परिणाम कमी होईल,
-- मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गाच्या प्रमाणातही सरकारने एक दशांशने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मोबाईल टॉवर उभारण्यासाठीही नव्याने निर्देश दिले आहेत.
-- मोबाईल कंपन्यांवरही काही बंधन घालण्यात आली आहेत. यामध्ये त्यांना मोबाईलची एसएआर मूल्याची माहिती देणं, तसंच हॅण्टसेटसोबत एक बुकलेट देणं बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे.
मोबाईल फोनच्या हँडसेटचे प्रत्येक मॉडेल कमी-अधिक रेडिएशन उत्सजिर्त करीत असते. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल फोन कंपन्यांनी, तो उत्सजिर्त करीत असलेल्या रेडिएशनचे प्रमाण फोनच्या पॅकिंगवर छापणे बंधनकारक करावे, असे मोबाईल फोनच्या धोक्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 'स्पेसिफिक अॅब्सॉर्प्शन रेट'नुसार (एसएआर) या धोक्याचे प्रमाण ठरवले जाते. 'एसएआर' म्हणजे मेंदूतील चेतापेशी फोनचे रेडिएशन शोषून घेतात ते प्रमाण. एका विशिष्ट प्रमाणापर्यंत हे उत्सर्जन होत असल्यास त्यापासून धोका नसतो
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
mobile: 9423077963