Monday, 30 July 2018

‘रेडिएशन हझार्ड्स ऑफ सेल फोन’ : सावधान ! स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूच्या कॅन्सरचा धोका

रेडिएशन हझार्ड्स ऑफ सेल फोन’ :
सावधान ! स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूच्या  कॅन्सरचा धोका
                    

माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संवादाची प्रभावी माध्यमं  स्मार्टफोन उपयोगी पडतोय . सगळ्याच गोष्टी आता  स्मार्टफोनवर 'अपलोड' होऊ लागल्याय परंतु स्मार्टफोन तंत्रज्ञानाचा अतिवापर आरोग्याला मारक तर ठरत आहे . नवीनतम तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या बदलांपासून व्यक्तींना दूर ठेवणे शक्य नाही; परंतु हे समाजासाठी अतिशय घातक आहे. त्याबद्दल मोठय़ा प्रमाणावर जागरूकता होणे आवश्यक आहे 
पूर्वी इंटरनेटचा वापर सायबर कॅफे, ऑफिसपर्यंत मर्यादित होता पंरतु आज स्मार्टफोन, आयपॅड, टॅबलेट स्मार्ट  टीव्ही यावर इंटरनेट द्वारे  वाट्टेल तिथे ,वाट्टेल तेव्हा,  कनेक्ट होता येतंय आणि  सतत संवाद साधणे शक्य झालाय परंतु हे आरोग्यासाठी मारक ठरत आहे मोबाइलवर  अधिकाधिक गुंतून  राहन्याची सवय  शारिरिक, मानसिक आरोग्यावर आता घाला घालू लागली आहे.
स्मार्टफोनमुळे मुलांच्या आरोग्यावर किती भयंकर परिणाम होतात याबाबत ऊहापोह.........
मुंबई आयआयटीचे इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी  केंद्र सरकारला दिलेल्या अहवालात स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका वाढलाय असे म्हटले आहे आणि तरूणांना याचा सर्वाधिक धोका असल्याचंही यात म्हटलंय. 
प्राध्यापक गिरीश कुमार म्हणतात कि , “सतत चार वर्ष दरदिवशी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फोनवर बोलल्याने श्रवण शक्ती क्षीण होते. तसंच दृष्टीवरही परिणाम होतो. याशिवाय 30 ते 35 वर्ष वय असलेल्यांमध्ये मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता वाढते. यामध्ये अल्झायमर आणि पार्किन्सन यांसारख्या आजारांचा समावेश आहे.”
. पुढे प्राध्यापक गिरीश कुमार  यांनी स्पष्ट केले  कि . स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे किरणोत्सर्गाचं आणि प्रकृतीला धोका असलेल्या लहरींचं प्रमाण ४०० टक्क्यांनी वाढले ल आहे . त्यामुळे मोबाईलचा अति वापर करणाऱ्यांना कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही,लहान मुलं आणि तरुणांवर किरणोत्सर्गाचा प्रभाव लवकर होतो. तसंच यामुळे पुरुषत्वावरही परिणाम होतो,
“मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गाने चिमण्या, मधमाशा आणि फुलपाखरुसह इतर सजीव आणि झाडांची हानीकारक परिणाम होत आहे,
स्मार्ट फोनच्या अतिवापराचे  दुष्परिणाम:
स्मार्टफोनच्या अतिवापराने पुरुष प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांच्या आरोग्यास स्मार्टफोनमुळे गंभीर धोका निर्माण झाला असून, मुलांच्या डोक्याची कवटी अतिशय पातळ असते आणि त्यामधून किरणे सहजपणे जातात. स्मार्टफोनमधून निघणारी घातक किरणे प्राणी आणि वनस्पतींवर गंभीर प्रभाव करण्यास कारणीभूत ठरतात, असे गिरीश कुमार यांनी म्हटले आहे
तसेच संशोधनादवारे अजून काही स्मार्ट फोनच्या अतिवापराने दुष्परिणाम समोर आलेले आहे ते खालील प्रमाणे 
-- इअरफोन कानामध्ये घालून ४० मिनिटांहून अधिक वेळ गाणी ऐकणं बहिरेपणाला आमंत्रण देण्याचं लक्षण आहे
----  जास्तीतजास्त वेळ इंटरनेट सर्फिंग आणि गेम खेळण्यात घालवणारी किशोरवयीन मुलं उच्च रक्तदाबाच्या किंवा स्थूलतेला बळी पडत आहेत. उशाला मोबाइल ठेवून झोपणाऱ्यांमध्ये निद्रानाशाचं प्रमाण वाढतंय, 
-- मुला-मुलींमध्ये व्यसनाधीनता, उदासीनता, स्थूलता, एकलकोंडेपणा असे शारीरिक आणि मानसिक पातळीवरचे आजार निर्माण होतात 
--  चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांच्या आजारात वाढ झालीय , मोतीबिंदूसारखे आजार होताहेत. 
--  सतत मोबाइल खिशात घेऊन फिरणाऱ्या पुरुषांमध्ये वंधत्वाच्या तक्रारी येत आहेत 
-- मोबाइलवर अधिक प्रमाणात गेम खेळणाऱ्या मुलांना  अल्झायमरसारख्या आजारांनाही सामोरं जावं लागतं.
संर्टफोनचा वापर नियंत्रित करा :
--लहान मुलांच्या हाती स्मार्ट फोन अजिबात देऊ नये. शाळा कॉलेजांमधून मुलांना स्मार्ट फोनपासून परावृत्त करावं. 
-- पालकांनी आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधी स्वतः स्मार्ट फोनचा वापर टाळावा. 
--रोज वाचन करावे तसेच थोडा व्यायामही करावा 
मोबाईल हॅण्डसेट आणि टॉवरमधून प्रसारित होणारा किरणोत्सर्ग कमी करण्यासाठी:
मोबाईल हॅण्डसेट आणि टॉवरमधून प्रसारित होणारा किरणोत्सर्ग कमी करण्यासाठी सरकारने काही  सूचना लागू केल्या आहेत.
--  मोबाईलवर कमीत कमी बोलावे 
--    लहान मुलांपासून मोबाईल दूर ठेवावे 
--शक्य असल्यास मोबाईलऐवजी लॅण्डलाईनचा वापर करा
--   शक्य असल्यास बोलण्यापेक्षा एसएमएसचा वापर करा
--  बोलताना मोबाईल फोन कानापासून शक्य तेवढा दूर ठेवावा
--  बोलण्यासाठी शक्यतो हेडफोन किंवा ब्लूटूथचा वापर करावा
--   मोबाईलवरील स्पीकर सुविधेचा जास्तीत जास्त वापर करा
-- रेंज मिळत नसल्यास बोलणे टाळा, कारण रेंज नसलेल्या ठिकणी मोबाईल जास्त ताकदीने कार्यरत होतो, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम शरिरावर होतो
--बोलताना मोबाईलचा कानावर दबाव पडणार नाही याची काळजी घ्या. खांदा आणि कान यामध्ये मोबाईल ठेवून बोलणे टाळा. बाईकवरून चालवताना किंवा बाईकवरून जाताना मोबाईल वापरू नका
--कृत्रिम अवयव प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांनी मोबाईल दूर ठेवा
--   बोलताना मोबाईलचा कानावर दबाव पडणार नाही याची काळजी घ्या. खांदा आणि कान यामध्ये मोबाईल ठेवून बोलणे टाळा. बाईकवरून चालवताना किंवा बाईकवरून जाताना मोबाईल वापरू नका
--हेलमेट असताना किंवा केस ओले असताना अथवा आंघोळ केल्या केल्या मोबाईलवर बोलणे टाळा. तसंच मेटल फोनचा चष्मा असलेल्यांनी मोबाईलवर बोलू नये. मेटल आणि पाणी हे रेडिओ लहरींचा सुवाहक आहे
--    फोन कनेक्ट झाल्यावरच तो कानाला लावा. कारण मोबाईल, कॉल कनेक्ट करण्यासाठी हाय पॉवर घेतो.
सरकारने केलेल्या  उपाय योजना :
--मोबाईलमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गची मर्यादा, २ वॅटवरून १.६ वॅट करण्यात आली आहे. त्यामुळेही मोबाईल आता पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षित मानण्यात येत आहे. तसंच त्यामुळे आरोग्यावर होणारा दुष्परिणाम कमी होईल, 
-- मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गाच्या प्रमाणातही सरकारने एक दशांशने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मोबाईल टॉवर उभारण्यासाठीही नव्याने निर्देश दिले आहेत.
-- मोबाईल कंपन्यांवरही काही बंधन घालण्यात आली आहेत. यामध्ये त्यांना मोबाईलची एसएआर मूल्याची माहिती देणं, तसंच हॅण्टसेटसोबत एक बुकलेट देणं बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे.
मोबाईल फोनच्या हँडसेटचे प्रत्येक मॉडेल कमी-अधिक रेडिएशन उत्सजिर्त करीत असते. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल फोन कंपन्यांनी, तो उत्सजिर्त करीत असलेल्या रेडिएशनचे प्रमाण फोनच्या पॅकिंगवर छापणे बंधनकारक करावे, असे मोबाईल फोनच्या धोक्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 'स्पेसिफिक अॅब्सॉर्प्शन रेट'नुसार (एसएआर) या धोक्याचे प्रमाण ठरवले जाते. 'एसएआर' म्हणजे मेंदूतील चेतापेशी फोनचे रेडिएशन शोषून घेतात ते प्रमाण. एका विशिष्ट प्रमाणापर्यंत हे उत्सर्जन होत असल्यास त्यापासून धोका नसतो

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
mobile: 9423077963

व्हॉट्सअॅपवरील फेक मेसेजमुळे "मॉब लिंचिंग"सारखे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना फेक न्यूजना, अफवांना नियंत्रणात आणण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि पोलिसमामा पुढे सरसावले ...व्हॉट्सअॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!

व्हॉट्सअॅपवरील  फेक मेसेजमुळे "मॉब लिंचिंग"सारखे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना
फेक न्यूजना, अफवांना  नियंत्रणात आणण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि पोलिसमामा पुढे  सरसावले ...व्हॉट्सअॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!


व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागल्याच्या घटना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रासह देशभर पाहायला मिळाल्या आहेत. अफवांमुळे जमावाकडून हत्या होण्याचं लोण आता देशभर पसरलं आहे. देशातील 10 राज्यांत एकूण 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्हात अलिकडेच मुलं पळवल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांचा बळी घेतला होता.

त्यामुळे अशा फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी सरकारही पुढे सरसावलं आहे.फेक न्यूजवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपाय योजना करण्याच्या सूचना  केंद्र सरकारने फेसबूक, व्हॉट्सअॅप, यूट्युब, ट्विटर या कंपन्यांना केल्या आहेत . केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोटीस पाठवल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने अफवा रोखण्यासाठी नवं फीचर आणण्याचं आश्वासन दिलं आहे. व्हॉट्सअॅपने आयटी विभाग आणि गृह विभागासोबत विश्वासात राहून अशा अफवा रोखण्यासाठी काम करावे, असं आवाहनही रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअपला केले.
व्हॉट्सअॅपद्वारे खोटी माहिती पसरवून लोकांना चुकीच्या सूचना दिल्या जात आहेत. यामुळेच केंद्र सरकाने व्हॉट्सअॅपला हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा आदेश दिला होता
 फेक न्यूजना नियंत्रणात आणण्यासाठी व्हॉट्सअॅप सरसावले आहे 
भारतीय युझर्स व्हॉट्सअॅपवर एकावेळी पाचपेक्षा जास्त जणांना मेसेज फॉरवर्ड करू शकणार नाही ...
जगभरात व्हॉट्सअॅपचे 100 कोटी युझर्स आहेत, त्यापैकी 20 कोटी एकट्या भारतात आहेत.दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारतातील लोक मेसेज, व्हिडीओ किंवा फोटो जास्त फॉरवर्ड करतात. मागील काही दिवसात फेक न्यूजचा वेगाने प्रसार झाल्याने देशात हत्येसह हिंसेची,मॉब लिंचिंगच्या अनेकघटना घडल्या होत्या . व्हॉट्सअॅपवरील  फेक न्यूज प्रकरणी भारत सरकारनेही कंपनीला नोटीस पाठवलेली आहे . सरकारने व्हॉट्सअॅपला  नोटीस पाठवून बनावट आणि चुकीच्या मेसेजचा प्रसार रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यास सांगितलं होतं. अफवांच्या प्रसारात माध्यमही दोषी समजलं जाईल आणि यावर उपाय केला नाही तर तुम्हालाही कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, असा इशाराही सरकारने दिला आहे.
बॅड एलिमेंट्सद्वारे देशात दंगली घडविण्यासाठी ,शांतता भंग करण्याकरिता फेक न्यूज  पसरवल्या जातात तेव्हा माध्यमही जबाबदार असतं असं माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटलं होतं. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत व्हॉट्सअॅपला योग्य उपाय करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार व्हॉट्सअॅपनेही नियमावली जारी केली आहे ' त्यामुळे 
भारतात राहणाऱ्या युझर्ससाठी  व्हॉट्सअॅपने काही बदल केलेले आहेत त्यानुसार 
 युझर्ससाठी मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार व्हॉट्सअॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!. 
 म्हणजे युझर्स व्हॉट्सअॅपवर एकावेळी पाचपेक्षा जास्त जणांना मेसेज आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करू शकणार नाही 
 मीडिया मेसेजसाठी असलेलय क्विक फॉरवर्ड बटणचाही वापर युझर्स आता करु शकत नाहीत, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.  बनावट युझरचा प्रसार रोखण्यासाठी कंपनीने हे पावले उचलले आहे 

'सस्पिशिअस लिंक डिटेक्शन'
wabetainfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार फेक न्यूज नियंत्रणात आणण्यासाठी 'सस्पिशिअस लिंक डिटेक्शन' नावाचं फिचर व्हॉट्सअॅप देणार . या नव्या फीचरने  युजरला व्हॉट्सअॅपवरील मेसेज फेक आहे की नाही याची पडताळणी करता येईल
या  नवीन फीचर बद्दल !
'सस्पिशिअस लिंक डिटेक्शन' फीचरद्वारे  युजरला एखादी लिंक आल्यास त्यां लिंकमध्ये काही संशयास्पद कंटेंट आहे का? ती फेक आहे का?  याची खातरजमा व्हॉट्सअपकडून केली जाणार आहे.आणि जर  लिंक संशयास्पद किंवा धोकादायक असेल तर  लिंकवर लाल रंगाचा धोक्याचा इशारा देण्यात येईल . या धोक्याकडे  दुर्लक्ष करत युजरने ही लिंक ओपन केल्यास युजर सर्वस्वी त्याला जबाबदार असणार आहे.
व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनच्या अधिकारात वाढ होणार 

सेटिंगमध्ये अॅडमिनला ‘सेंड मेसेजेस’ असा ऑप्शन मिळेल, ज्याच्या मदतीने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणते मेसेजेस पाठवले जाणार, हे आता अॅडमिन ठरवणार आहे . 
व्हॉट्सअपच्या  नव्या फीचरमुळे यापुढे अॅडमिनच्या परवानगीशिवाय मेम्बर्स ग्रुपमध्ये मेसेजेस पाठवू शकत नाहीत.
कुठल्या मोबाईलमध्ये आहे हे नवीन फिचर 
हे नवं फीचर सध्या अँड्रॉईड बीटा 2.18.201 व्हर्जन आणि आयफोनच्या 2.18.70 या व्हर्जनमध्ये देण्यात आलं आहे.
 आयवोएसच्या स्टेबल व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. लवकरच हे फीचर अँड्रॉईड आणि विन्डोजमध्ये उपलब्ध होणार आहे.
कसे आहे फिचर ?
ग्रुप सेटिंगमध्ये अॅडमिनला हे फीचर उपलब्ध असेल. सेटिंगमध्ये अॅडमिनला ‘सेंड मेसेजेस’ असा ऑप्शन मिळेल, ज्याच्या मदतीने अॅडमिनला    ग्रुपमध्ये पाठवल्या  जाणाऱ्या  मेसेजेसवर कंट्रोल ठेवता येणार  आहे.
कारण ग्रुपमध्ये अनेकदा वादग्रस्त मेसेजेस पाठवले जातात. काही मेसेजेसमुळे अशांतता पसरण्याचीही शक्यता असते. यावरच उपाय म्हणून व्हॉट्सअपने हे फीचर आणलं आहे.
या फीचरच्या माध्यमातून ग्रुप चॅटिंग अधिक चांगली व्हावी, असा व्हॉट्सअपचा हेतू आहे. 

व्हॉट्सॅप ग्रुप अॅडमिनसाठी खास 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' फीचर येणार 
व्हॉट्सअॅपवरील  ग्रुपमधील कुणीतरी सदस्य काहीतरी वादग्रस्त पोस्ट शेअर करतो आणि त्याचा परिणाम ग्रुप अॅडमिनला भोगाव्य लागल्याच्या अनेक घटना घडलेल्या  आहेत 
आता व्हॉट्सअॅपने 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' हे फीचर आणणार  आहे . सध्या प्रयोगिक अवस्थेतील  हे फीचर लवकरच अँड्रॉईड आणि आयओएस या  दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.

  ग्रुपमधील कुणीतरी सदस्य काहीतरी उपद्व्याप करतो , वादग्रस्त पोस्ट शेअर करतो   त्याचा परिणाम ग्रुप अॅडमिनलाही भोगावा लागतो. त्यामुळे अनेकजण ग्रुप तयार करणे टाळतात. तसेच अनेक ग्रुपमध्ये वादग्रस्त काही शेअर होत नसले, तरी देखील काही ना काही फालतू  खऱ्या खोट्या  बातम्या ,पोस्ट, फोटो, व्हिडीओ काही सदस्य  शेअर करत असतात. या साऱ्या गोष्टींना कंटाळूनच अनेकजण ग्रुपला राम राम करतात ,ग्रुप सोडतात . हे टाळण्याकरिता व्हॉट्सअॅपने , त्यासंबंधित नवे फीचर आणले आहे.

 'रिस्ट्रिक्ट ग्रुप'

व्हॉट्सअॅपच्या 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' फीचरमुळे ग्रुप अॅडमिनला काही विशेष अधिकार मिळणार आहेत. 
- या फीचरमुळे ग्रुपमध्ये वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या सदस्याला 'रिस्ट्रिक्ट' करता येईल. असे केल्याने संबंधित सदस्य ग्रुपमधील इतर सदस्यांच्या पोस्ट वाचू शकतो, पाहू शकतो, मात्र स्वत: काही पोस्ट शेअर करु शकत नाही.
- हे फीचर  ग्रुपच्या सेटिंगमध्ये जाऊन ते वापरता येईल.
- दरम्यान, ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या किंवा खोऱ्याने पोस्ट टाकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरणार आहे.
'रिस्ट्रिक्ट ग्रुप' हे फीचर ज्यावेळी प्रत्यक्षात येईल, तेव्हा ग्रुप अॅडमिन खऱ्या अर्थाने ग्रुप चालवताना सुटकेचा श्वास घेईल. 
व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोलिसमामांची  करडी नजर 
महाराष्ट्रातल्या सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना जास्तीतजास्त व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जगभरात व्हॉट्सॅप यूजर्सची संख्या 150 कोटींच्या घरात आहे. त्यातले तब्बल 20 कोटी ग्राहक हे भारतातले आहेत... 
  देशात व्हॉट्सअॅप  वापरणाऱ्या व्यक्तींची टक्केवारी सर्वाधिक आहे प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅपवर असंख्य  ग्रुप असतात. शाळेचे, कॉलेजचे, कार्यालयातले, मित्रांचे असे प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप. आता तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आणखी एक जण अॅड होणार आहे. तो आहे पोलिसमामा.
व्हॉट्सअॅपवरुन अविचारी फॉरवर्ड्स. कोणतीही शहानिशा न करता मेसेज  सेकंदात फॉरवर्ड होनारे मेसेजस यामुळे महाराष्ट्रात अफवांचं पीक गाजर गवतासारखं पसरलं आहे  म्हणूनच 

महाराष्ट्रातल्या सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना जास्तीतजास्त व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आता पोलिसमामाच आपल्या ग्रुपमध्ये असल्यावर ग्रुपवर   जो अफवा पसरवेल... त्याची खैर नाही.
@  प्रा योगेश अशोक हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)