Saturday, 30 September 2017

इंटरनेटवर खाजगीपणाचा मुलभूत हक्क ठेवा अबाधित


हल्लीचे जग हे इंटर्नेट सॅव्ही झालेले आहे आणि बरेचसे महत्वाचे व्यवहार हे इंटरनेट वर होतात म्हणून हे व्यवहार करतांना काळजी घेतली पाहिजे
अलीकडच्या दहशतवादी घटनांमधला आधुनिक तंत्रज्ञानाचा सफाईदार वापर महत्वाचा ठरला आहे. उत्तर अमेरिकेतल्या व्हरमाँटमधल्या ‘व्हॅली न्यूज’मध्ये मॅथ्यू स्कोफील्ड यांनी पॅरिसवरच्या हल्ल्यात झालेल्या तंत्रज्ञानाच्या वापराच्या चांगल्या आणि वाईट बाजूंचा विचार केला आहे. दहशतवाद्यांनी या हल्ल्यात केलेला आॅनलाईन चॅटींग, गेमींग, सोशल मीडिया आणि जीपीएसचा केलेला वापर त्यांची योजना अंमलात आणण्यासाठी महत्वाचा ठरला होता.  जी तंत्रे त्यांच्या विरोधात लढताना उपयोगी ठरणारी आहेत ती त्यांना देखील उपलब्ध होत आहेत.
एखादी ऑन लाइन एयर इंडिया किंवा  इंडियन रेल्वे ची वेब साइट हॅक झाली .....?  सगळ्या क्रेडीट कार्ड्स ची,डेबिट कार्डचे  डीटेल्स, वैयक्तिक माहिती इत्त्यादी वर त्या सायबर दहशतवाद्याचा  चा ताबा जाइल
.
आणि जर कधी बँकिंग क्षेत्रात जर असा हल्ला झाला तर कुठल्याही देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील .
जगभरातील सायबर हल्ल्याचे/
वैयक्तिक,खाजगी  माहिती चोरीचे  काही उदाहरण 
 १ हॅकर्सनी अमेरिकेच्या सरकारी संगणकातील माहिती चोरली आहे. आताच्या व माजी अशा मिळून ४० लाख सरकारी कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती चोरण्यात आली असून आतापर्यंत अमेरिकी संगणकावर हॅकर्सनी  केलेला हा सर्वात मोठा हल्ला होता .
२ एखादा सायबर हल्ला क्षणार्धात ही गुप्तता धोक्यात आणत असल्याच्या घटनाही समोर येत असतात. अमेरिकेतील ऑफिस ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (ओपीएम)वर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये तब्बल ५६ लाख  जणांचे फिंगरप्रिन्ट्स चोरीला गेले होते .

३ काही दिवसांपूर्वी भारतात रेल्वेचं तिकीट बुक करण्यासाठी वापरण्यात येणारी इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरशन अर्थात ईकॉमर्स साईट IRCTC ची वेबसाईट हॅक करण्यात आली होती   वेबसाईट हॅक करुन 1 कोटी लोकांची वैयक्तिक माहिती चोरीला गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती
त्या  वृत्तानुसार भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट आयआरसीटीसी ज्यावरुन दिवसाला लाखो लोक व्यवहार करतात हॅक करण्यात आली होती .  या वेबसाईटवर  प्रवासी आपलीवैयक्तिक माहिती स्टोर करत  असतात. ज्यामध्ये पॅनकार्ड चा नंबर कारण  तिकीटाचं आरक्षण करायचं असेल तर ऑनलाइन अर्ज भरतेवेळी वैयक्तिक माहिती देणं बंधनकारक असतं. 'चोरी केल्या गेलेल्या माहितीवरुन बोगस कागदपत्रे तयार केली जाऊ शकतात', अशी भीती  व्यक्त करण्यात आली होती . या 'वेबसाईटवरील माहिती अत्यंत महत्वाची असते . यामाहितीवरून कंपन्यांना हवे असलेले ग्राहक मिळवता येतात त्यामुळे त्यांना हा डाटा विकला जाऊ शकतो' अशी शक्यता व्यक्त होत होती . 

        सध्या  इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे  ‘ऑनलाइन सुरक्षा’ अतिशय महत्त्वाची आहे . फेसबुकसारख्या सोशल मीडिया साइटच्या माध्यमातून तुमची माहितीविविध जाहिरात कंपन्या किंवा उत्पादन कंपन्यांकडे जमा होते. या माहितीचा गैरवापर होण्याची भीती नाकारता येत नाही इंटरनेटवर वापरकर्त्यांची माहिती चोरली जाण्याची शक्यता असते.  त्यामुळे इंटरनेटवर आपली माहिती सार्वजनिक होत सुरक्षित ठेवण्याकरिता खबरदारी घेणे आवश्यक आहे.इतरांना कुणाच्याही  खाजगी आयुष्यात नाक खुपसण्याचा काहीही अधिकार नाही. 
काही वर्षांपूर्वी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा अन्य देशांबरोबर भारतातील टेलिफोन, इंटरनेट सेवेवरही नजर ठेवत असल्याचे उघड झाले होते . सीआयए या अमेरिकन गुप्तचर यंत्रणेमध्ये तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या तरुणाने "द गार्डियन' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेची ही हेरगिरी जगासमोर उघड केलेली होती .   या संस्थेत काम करताना त्याला सरकारकडून नागरिकांवर करण्यात येत असलेल्या हेरगिरीचा सुगावा लागला होता . नागरिकांच्या फोनकॉल्सवर लक्ष ठेवणे, फोेनकॉल्स रेकॉर्ड करणे, ऑनलाइन महिती गोळा करणे असे या हेरगिरीचे स्वरूप होते. अमेरिकी गुप्तहेर यंत्रणांकडून इंटरनेटवरील महिती गोळा करताना देशांतर्गत कायद्याचे उल्लंघन होते आहे. शिवाय अंतर्गत बाबी दुसऱ्या देशाच्या गुप्तहेर यंत्रणेच्या हाती लागणे आपल्यासाठी धोकादायक आहे. तेव्हा काळजी घ्या 
इंटरनेटवरील खाजगी माहितीच्या  सुरक्षितेसाठी उपाय : 
>>ब्राऊजर्सवर ‘अ‍ॅडऑन’ किंवा ‘एक्स्टेन्शन’ आपण वापरतो. यातून तुमच्या नकळत तुमची माहिती हाताळली जाते. त्यामुळे  अशा ‘अ‍ॅडऑन’चा वापर कमी करावा किंवा टाळावाच 
>> इंटरनेटवर ब्राऊजिंग करताना तुमची ओळख अदृश्य ठेवण्याकरिता , अनेक  ब्राऊजर्सवर सुविधा असते. 
- गुगल क्रोममध्ये ‘इनकॉग्निटो’, 
- फायरफॉक्समध्ये ‘प्रायव्हेट ब्राऊजिंग मोड’ 
-  मायक्रोसॉफ्टच्या ब्राऊजरवर ‘इनप्रायव्हेट’ 
अशा  सुविधा  आहे. हे पर्याय  तुमच्या संगणकामध्ये  शिरू बघणाऱ्या हेरगिरी करणाऱ्या  कूकीजना रोखते. त्याचप्रमाणे या सुविधेमुळे तुमचे  ब्राऊजर्स अनोळख्या  संकेतस्थळांच्या  ‘कूकीज’ना ‘ब्लॉक’ करतात.
>>इंटरनेट वापरानंतर  संगणक तसेच स्मार्टफोनवरील ‘कूकीज’, ‘कॅश’, ‘टेम्पररी फाइल्स’ हटवून टाका. कारण काही ‘कूकीज’ तुमच्या माहितीचा माग काढण्याचे काम करतात. 
>> इंटरनेटच्या विविध खात्यांचे पासवर्ड सुरक्षित ठेवा .
>>इंटरनेट वापरताना  नेट बँकींग अकाऊंट क्रमांक, आपला आयडी क्रमांक, पासवर्ड, क्रेडीट किंवा डेबीट पासवर्ड क्रमांक अथवा उघड करताना सावधानता बाळगावी. ऑन लाईन खरेदी करताना सुरक्षिततेचे उपाय योजावेत.  स्पॅम मेल, फसवे मेल यावर डबल क्लिक करुन उघडण्याचा प्रयत्न करु नये. अशा मेल मधून व्हायरसची एक्झीक्युटेबल फाईल आपल्या नकळत डाऊन लोड होते. आपण जेव्हा संगणकावर काम करतो तेव्हा केलेल्या कामाची एक डुप्लीकेट फाईल तयार होऊन ती हार्ड डिक्सवर सेव्ह होते. जेव्हा आपण इंटरनेट चालू करतो तेव्हा अलगदपणे ही माहिती हॅकरला मेल व्दारे प्राप्त होते. .त्यामुळे  फसगत टाळण्यासाठी अशा प्रकारचे फसवे मेल डीलीट करावे आपली संगणक सिस्टीम ऍन्टी व्हायरस, फायर वॉलने सुरक्षित ठेवावी.
खबरदारी घ्या    

सायबर क्षेत्रात दक्षिण कोरियासारखे छोटे देशही आपल्यापेक्षा प्रगत आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. सायबरमध्ये चीनची भीती अमेरिकेला आहे. म्हणून भारताने अमेरिकेबरोबर सहकार्याची भूमिका घ्यायला हवी. भारतात तयार होणा-या संगणकतज्ज्ञांना काही वर्ष देशात राहून सेवा करायला हवी.
सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून, संगणकाचा वापर होऊन तिसरे महायुद्धही होऊ शकते हे भारताने लक्षात घेतले पाहिजे आणि तातडीने त्यावर उपाय योजना केल्या पाहिजे .
आज भारतासमोरच नाही तर जगासमोर आणि प्रत्येक माणसासमोर ‘सायबर युद्धाचे  ’चं भयावह संकट उभं आहे
तिसरं महायुद्ध हे पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवं, असं थोडंच आहे. कारण युद्धाची पद्धत  बदलली आहे . महायुद्धे आता कुठही होतात, त्याचं ठिकाण  त्याचं ठिकाण व्हर्च्युअल म्हणजे आभासी जग असतं  असू शकत आणि  हे विश्व आहे, इंटरनेटचं… 

लेखक : प्रा योगेश हांडगे  
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर Google Play Protectने फोनमधला डाटा 'डिलीट'करा !


अॅप्लिकेशन कंपन्या 'युजर एक्सपिरिअन्स'ची माहिती मिळवण्याच्या नावाखाली तुमच्या घडामोडींवर लक्ष ठेवू शकतात. अनेक अॅप्स संर्टफोनवरील घडामोडींवर लक्ष ठेवून फोनमधली काँटॅक्ट लिस्ट,व्हिडिओ, फोटो आणि इतर महत्वाची माहिती महत्त्वाची कागदपत्रं चोरून त्यांच्या कंपनीला पोहचवितात  
 त्यामूळेच गूगलने आपल्या येणाऱ्या नव्या अँड्राईड फोनमध्ये Google Play Protect नावाचा एक नवीन फीचर समाविष्ट केलाय. हा फीचर युझर्सला धोक्याची सूचना देणार आहे .तसेच जर  तुमचा फोन हरवलाच तर मोबाईलमधील महत्वाचा डाटा कुणाच्या हाती लागू नये म्हणून  फोनमधला डाटा तुम्हाला फोनमधील डाटा डिलीटही करता येऊ शकेल.
कुठल्या मोबाइलकरीता ?
याला गुगलनं I/O २०१७ डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये सादर केलंय.
हे फिचर  गूगल मोबाईल सर्विस ११ किंवा त्याच्याहून मोठ्या व्हर्जनच्या अॅन्ड्रॉईड डिव्हाइसवर काम करेल. 
या फिचरमुळे तुमचा फोन ऑटोमॅटिक स्कॅन होईल. तसंच यामुळे मालवेयर्सचीही माहिती मिळू शकेल.  
कसे कराल अनेबल 
हे फिचर  इतर अॅप प्रमाणे नाही म्हणून  प्लेस्टोअर वर उपलब्ध नाही...  याचं एक वेगळं पेज आहे, त्यावर याची सगळी माहिती उपलब्ध आहे. या पेजवर जाण्यासाठी सेटींगमध्ये जाऊन 'गूगल'वर टॅप करा. तिथे 'सिक्यूरिटी' हा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा. त्यानंतर 'व्हेरिफाय अॅप'वर क्लिक करा. मग या सर्व्हिसला तुम्ही  अनेबल किंवा डिसेबल करू शकाल.
मोबाईल हरवल्यानंतर कसा करायचा डाटा डिलीट ?
या फीचरला 'अनेबल' केल्यास पुढच्या वेळेस कुठलाही नवीन अॅप इन्स्टॉल केल्यावर  त्याला स्कॅन करून तूमचा मोबाईल सुरक्षित आहे की नाही, तसेच तुमचा मोबाईल हरवला तर तुमच्या मोबाईलचा पूर्ण डाटा डिलीट करण्याचेही ऑप्शन तुम्हाला मिळेल , त्याकरिता   गूगलवर जाऊन अँड्राईड डिव्हाइस मेसेंजरवर जावं.आणि  तिथे तुमचे जीमेल अकाउन्ट लॉग इन केल्यावर तुम्हाला तुमच्या डिव्हाइस लोकेशन माहिती मिळेल. त्यावरून तुम्हाला तुमचा फोन लॉक अथवा मोबाईल डाटा डिलीट करता येईल.
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 

(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

Friday, 29 September 2017

स्मार्ट शहरांबरोबर खेडीही स्मार्ट

खेड्यांकडे चला, असे बापूंनी  म्हटले होते म्हणून आजही स्मार्ट शहरांबरोबर खेडीही स्मार्ट केली तर संपूर्ण देशच  स्मार्ट होईल. ग्रामीण जनतेला शहरासारख्या सर्व सुविधा खेड्यातच मिळू तर लागल्या. तिथला रोजगार वाढला तर त्यांचे लोंढे शहरांकडे कशाला वळतील. खेडी उद्ध्वस्त होऊ नये. या खेडयांचा मुख्य आधार जो शेती आहे ती शेती उद्ध्वस्त झालेली आहे. शेती करणे परवडत नाही. शेतीच्या उत्पादनात कुटुंबाचे भागत नाही. शेतीखेरीज ग्रामीण भागात रोजगाराचे साधन नाही. उद्योग नाही.ज्या तुरळक ठिकाणी महाराष्ट्र शासनाची उद्योग महामंडळ वसाहत आली

त्यातील उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार नाही. त्यातले निम्म्यापेक्षा अधिक उद्योग बंदच पडलेले आहेत. न परवडणारी शेती, त्या शेतीवर भागत नसल्यामुळे कुटुंबाची बिघडलेली आर्थिक स्थिती आणि जिथे शेतीला जोडधंदा नाही अशा ठिकाणी नुकसानीत चालणारी शेती यामुळे महाराष्ट्रातली खेडी पूर्ण उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीप्रमाणे स्मार्ट व्हिलेज केले तर अधिक चांगले होईल .
महात्मा गांधींची संकल्पना होती स्वयंपूर्ण खेडी म्हणजे त्या गावातून कोणत्याही कारणाकरिता बाहेर जायची वेळ येता कामा नये. उत्तम शाळा म्हणजे शिक्षण, उत्तम दवाखाने म्हणजे आरोग्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छ धान्याची दुकाने या तेव्हाच्या  प्राथमिक गरजा होत्या. आज खेड्यांमध्ये  रोजगाराचा आणि शेती न परवडण्याचा प्रश्न आहे तो सोडविला पाहिजे .
त्यासाठी फक्त स्मार्ट सिटी पेक्षा स्वयंपूर्ण गावे बनविली तर खऱ्या अर्थाने भारताचा विकास होईल . हिवरे बझार , राळेगणसिधी च्या धर्तीवर भारतातील खेडी स्वयंपूर्ण व्हावीत. रोजगाराचे साधन प्रत्येक गावातच उपलब्ध व्हावेत. रोजगारासाठी शेकडो मैल दूर जाण्याची गरज भासता कामा नाही. दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी शेतीपूरक उद्योग असावेत. बरेच काही करता येणे शक्य आहे. नुसते सरकारवर अवलंबून राहता प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा , आणि मुळात हे मिशन असावे .
यामुळे नकीच फरक दिसेल गावही स्मार्ट झालीच पाहिजे ते काळाची गरज बनली आहे गांधीजी सांगून गेलेत गावाकडे चला गावाकडे चला आता नेमक उलट झांलय गाव ओस पडलं आहेत आणि शहरात राहयाला जागा नाही .पैशासाठी माणुस शहराकडे धावत आहे गावाची प्रगती झालीच पाहिजे.
पाणी आणि त्याचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे.भारतातील पाणी तज्ज्ञांना बाहेरचे देश पुरस्कार देऊन गौरवत आहेत आपण त्यांच्या ज्ञानाचा फायदा कधी करून घेणार? गावोगाव शेततळ्यांचे कमी खर्चाचे प्रकल्प उभे राहायला हवेत. पाऊस कमी किंवा जास्त याने शेतीत फरक पडता कामा नये. ही हमी जेव्हा शेतकर्याला मिळेल तेव्हाच तो इतर गोष्टींचा विचार  करू शकेल. अहमदनगर जिल्ह्यात हिवरे बाजार सारख्या खेड्यात पोपट पवार काय किमया करतात? राळेगणला अण्णा हजारेंच्या गावात काय जादू घडते? हे आजूबाजूच्या गावात, दुष्काळी मराठवाड्यात आपण कधी घेऊन जाणार? कोणीतरी सरकार नावाची संस्था येईल आणि आपल्याला मदत करेल ह्या भ्रमातून शेतकर्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यांचे भविष्य त्यांच्याच मेहेनतीत आणि गावाच्या एकत्रित पाणी व्यवस्थापनावर अवलंबून आहे
वीज, पाणी, रस्त्यांसह इंटरनेट आदी सुविधा खेड्यांनाही मिळायला हव्यात.महाराष्ट्र सरकारने ‘जलयुक्त शिवार’ ही दुष्काळमुक्तीची अभिनव मोहीम सुरू केली. तिला यशही मिळत आहे अशाप्रकारच्या मोहिम निश्चितच स्मार्ट खेडी बनविण्यासाठी उपयोगी पडतील .
प्रत्येकाला स्वताच्या गावात वा शहरात रोजगार मिळाला तर कोण कशाला जाईल दुसरया गावात यापेक्षा प्रत्येक गावाचा व शहराचा समान विकास करणे गरजेचे आहे आज आजूनही रस्त्यासारख्या सोयीसुविधांचा आभाव असताना आधीच विकसित झालेल्या व पूर्णपणे विकासाची जेथे संधी नसलेल्या शहरांचा विकास उपयोगी नाही त्यापेक्षा अनेक छोट्या गावांचा विकास केल्यास तेथील लोकांना आपल्या कौशल्याने रोजगार मिळाल्यास शहरांकडे जाणारा लोंढा कमी होऊन सर्व देशांचा विकास समान तर होईलच पण प्रत्येकाला अभिमानाने जगता येईल .
स्मार्ट सिटी पेक्षा स्वयंपूर्ण गावे बनविली तर खऱ्या अर्थाने भारताचा विकास होयील. हिवरे बझार , राळेगणसिधी च्या धर्तीवर भारतातील खेडी स्वयंपूर्ण व्हावीत. रोजगाराचे साधन प्रत्येक गावातच उपलब्ध व्हावेत. रोजगारासाठी शेकडो मैल दूर जाण्याची गरज भासता कामा नाही. दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी शेतीपूरक उद्योग असावेत. बरेच काही करता येणे शक्य आहे. नुसते सरकारवर अवलंबून राहता प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा , आणि मुळात हे मिशन असावे .
शहरांच्या गरजा खेडी पूर्ण करतात त्यामुळे खेडीही  स्मार्ट  झाली पाहिजे .

खेडी  स्मार्ट होण्याकरिता खालील गोष्टींची आवशकता आहे .
० अनेक गावात पाण्यासाठी वणवण करण्यातच  दिवस जातो. कुठे हातपंप आहेत तर पाणी नाही, वीजही नाही. पाणी शुद्धीकरण नाही या गोष्टी झाल्या पाहिजे . पाणी शुद्धीकरणासाठी यंत्रणा पाहिजे
० शौचालयांचा अभाव असल्यामुळे अस्वच्छता होणारे संसर्गजन्य रोग पसरत आहेत घर तिथे शौचालय असलेच पाहिजे .
० निर्धूर चूल, गॅस, सूर्यचूल यांची यांची  केवळ माहितीच नाही तर सुरुवात गावा-गावात झाली पाहिजे
०जनजागृती करून काही जुन्या आणि अयोग्य पद्धती बंद केल्या पाहिजेत
० शासकीय आरोग्यसेवा सर्व ठिकाणी आहेत पण अनेक खेडे गावात नर्स, डॉक्टर वेळेला उपस्थित नसतात . बरेच जण शहरातून ये-जा करतात. खेडय़ात राहत नाहीत. २४ तास जिथे डॉक्टरांची गरज असते तेथे डॉक्टर नसतातच, तसेच प्राथमिक शिक्षकही  गावात राहत नाही ,तीच परिस्थिती अनेक शासकीय कर्मचारी यांची आहे
याची करणे म्हणजे खेड्यात शौचालय नाही, घर नाही, इंग्लिश मीडियम शाळा नाही म्हणून तेथे राहणे टाळलेच जाते. व्यवस्थित घर शौचालयासह दिले तरी या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची तिथे राहण्याची तयारी नसते. अशी स्थिती बर्याच  गावांत आहे.हि स्थिती बदलली पाहिजे त्यासाठी आवशक सोयी सुविधा खेड्यात झाल्याच पाहिजे .
शेतीसाठी पाण्याची कमतरता अनेक गावात आहे त्यामुळे शेती ओस पडत आहे त्यासाठी हि कमी पूर्ण करण्यासाठी बंधारे , तळी ,पाट या गोष्टी झाल्या पाहिजे

लेखक : प्रा योगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

बेसिक ते अडव्हांस संगणकीय ज्ञानासाठी महत्वाचा ब्लॉग


पुणे: चांगल्या माहितीच्या देवाण - घेवानसाठी  सध्याच्या युगात ब्लॉगचा वापर वाढलेला आहे .  अनेक लोक स्वताचा ब्लॉग तयार करून त्यावर खेळ,  मनोरंजन, साहित्य, तंत्रज्ञान यावर माहिती देत असतात 
आपल्या  देशातील आय आय  एस्सी (IISc.Bangalore )चे विद्यार्थी असलेले आणि सध्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले  प्रा.पराग  जांभुळकर  यांचा ब्लॉग माहिती तंत्रज्ञान युगातील तरुणाईत अत्यंत आवडीचा झालेला आहे . राज्यातील अनेक महाविद्यालयातील कम्पस कट्ट्यावर याविषयी चर्चा असते 
जांभुळकर यांचा www.comrevo.com या ब्लॉगवर CUDA,data structure, cloud computing,parallel computing, web designing,OpenMP याविषयी माहिती मिळते 
अगदी शाळेतील विद्यार्थ्यांपासून आबालवृद्धांसाठी हा ब्लॉग उपयुक्त आहे 
संगणकाच्या अगदी बेसिक ज्ञानापासून ते संगणकाच्या संशोधन विषयांपर्यंत मार्गदर्शन येथे आपल्याला मिळेल 
या ब्लॉगवर दिलेल्या काही महत्वाच्या वेबसाईट 
१) डॉकमेण्ट फॉरमॅट मधून इतर उदाहरणार्थ e.g. word to pdf, pdf to ppt या  फॉरमॅट मध्ये कन्व्हर्ट करण्याकरिता महत्वाची वेबसाईट 
२) Audio, Video, Image, Document, Ebook, Archive या प्रकारच्या फाईल एकप्रकारच्या  फॉरमॅट मधून इतर फॉरमॅट मध्ये कन्व्हर्ट करण्याकरिता महत्वाची वेबसाईट 
३) फोटोच्या प्रॉपर्टीज बदलण्याकरिता महत्वाच्या  वेबसाईट 
४) युटूबवरचे व्हिडिओज डाउनलोड करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
५) फाईल ऑनलाईन अनझिप,एक्सट्रॅक्ट  करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
६ ) फाईल ऑनलाईन झिप करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
७) पीडीफ फाईलची विभाजन करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
८) अनेक  पीडीफ फाईलचे एकत्रित करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
९) पीडीफ फाईल कॉम्प्रेस करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
१०) वेबसाईटच्या खरेदी विक्रीच्यावेळी तुमच्या वेबसाईटची किंमत ठरविण्यासाठी महत्वाची वेबसाईट
११)तुमच्या वेबसाईटची पेज रँक माहित करण्याकरिता महत्वाची वेबसाईट
१२)व्हिडीओ फाईल मधून ठराविक सीन कट  करण्यासाठी महत्वाची वेबसाईट
१३) फोटोपासून व्हिडीओ बनविण्याकरिता महत्वाची वेबसाईट
१४)फोटोचा ऑनलाईन अल्बम करण्यासाठी महत्वाची वेबसाईट

संकलन : 
लेखक :  प्रा योगेश  हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)