खेड्यांकडे चला, असे बापूंनी म्हटले होते म्हणून आजही स्मार्ट शहरांबरोबर खेडीही स्मार्ट केली तर संपूर्ण देशच स्मार्ट होईल. ग्रामीण जनतेला शहरासारख्या सर्व सुविधा खेड्यातच मिळू तर लागल्या. तिथला रोजगार वाढला तर त्यांचे लोंढे शहरांकडे कशाला वळतील. खेडी उद्ध्वस्त होऊ नये. या खेडयांचा मुख्य आधार जो शेती आहे ती शेती उद्ध्वस्त झालेली आहे. शेती करणे परवडत नाही. शेतीच्या उत्पादनात कुटुंबाचे भागत नाही. शेतीखेरीज ग्रामीण भागात रोजगाराचे साधन नाही. उद्योग नाही.ज्या तुरळक ठिकाणी महाराष्ट्र शासनाची उद्योग महामंडळ वसाहत आली
त्यातील उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार नाही. त्यातले निम्म्यापेक्षा अधिक उद्योग बंदच पडलेले आहेत. न परवडणारी शेती, त्या शेतीवर भागत नसल्यामुळे कुटुंबाची बिघडलेली आर्थिक स्थिती आणि जिथे शेतीला जोडधंदा नाही अशा ठिकाणी नुकसानीत चालणारी शेती यामुळे महाराष्ट्रातली खेडी पूर्ण उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीप्रमाणे स्मार्ट व्हिलेज केले तर अधिक चांगले होईल .
महात्मा गांधींची संकल्पना होती स्वयंपूर्ण खेडी म्हणजे त्या गावातून कोणत्याही कारणाकरिता बाहेर जायची वेळ येता कामा नये. उत्तम शाळा म्हणजे शिक्षण, उत्तम दवाखाने म्हणजे आरोग्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छ धान्याची दुकाने या तेव्हाच्या प्राथमिक गरजा होत्या. आज खेड्यांमध्ये रोजगाराचा आणि शेती न परवडण्याचा प्रश्न आहे तो सोडविला पाहिजे .
त्यासाठी फक्त स्मार्ट सिटी पेक्षा स्वयंपूर्ण गावे बनविली तर खऱ्या अर्थाने भारताचा विकास होईल . हिवरे बझार , राळेगणसिधी च्या धर्तीवर भारतातील खेडी स्वयंपूर्ण व्हावीत. रोजगाराचे साधन प्रत्येक गावातच उपलब्ध व्हावेत. रोजगारासाठी शेकडो मैल दूर जाण्याची गरज भासता कामा नाही. दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी शेतीपूरक उद्योग असावेत. बरेच काही करता येणे शक्य आहे. नुसते सरकारवर अवलंबून राहता प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा , आणि मुळात हे मिशन असावे .
यामुळे नकीच फरक दिसेल गावही स्मार्ट झालीच पाहिजे ते काळाची गरज बनली आहे गांधीजी सांगून गेलेत गावाकडे चला गावाकडे चला आता नेमक उलट झांलय गाव ओस पडलं आहेत आणि शहरात राहयाला जागा नाही .पैशासाठी माणुस शहराकडे धावत आहे गावाची प्रगती झालीच पाहिजे.
पाणी आणि त्याचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे.भारतातील पाणी तज्ज्ञांना बाहेरचे देश पुरस्कार देऊन गौरवत आहेत आपण त्यांच्या ज्ञानाचा फायदा कधी करून घेणार? गावोगाव शेततळ्यांचे कमी खर्चाचे प्रकल्प उभे राहायला हवेत. पाऊस कमी किंवा जास्त याने शेतीत फरक पडता कामा नये. ही हमी जेव्हा शेतकर्याला मिळेल तेव्हाच तो इतर गोष्टींचा विचार करू शकेल. अहमदनगर जिल्ह्यात हिवरे बाजार सारख्या खेड्यात पोपट पवार काय किमया करतात? राळेगणला अण्णा हजारेंच्या गावात काय जादू घडते? हे आजूबाजूच्या गावात, दुष्काळी मराठवाड्यात आपण कधी घेऊन जाणार? कोणीतरी सरकार नावाची संस्था येईल आणि आपल्याला मदत करेल ह्या भ्रमातून शेतकर्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यांचे भविष्य त्यांच्याच मेहेनतीत आणि गावाच्या एकत्रित पाणी व्यवस्थापनावर अवलंबून आहे
वीज, पाणी, रस्त्यांसह इंटरनेट आदी सुविधा खेड्यांनाही मिळायला हव्यात.महाराष्ट्र सरकारने ‘जलयुक्त शिवार’ ही दुष्काळमुक्तीची अभिनव मोहीम सुरू केली. तिला यशही मिळत आहे अशाप्रकारच्या मोहिम निश्चितच स्मार्ट खेडी बनविण्यासाठी उपयोगी पडतील .
वीज, पाणी, रस्त्यांसह इंटरनेट आदी सुविधा खेड्यांनाही मिळायला हव्यात.महाराष्ट्र सरकारने ‘जलयुक्त शिवार’ ही दुष्काळमुक्तीची अभिनव मोहीम सुरू केली. तिला यशही मिळत आहे अशाप्रकारच्या मोहिम निश्चितच स्मार्ट खेडी बनविण्यासाठी उपयोगी पडतील .
प्रत्येकाला स्वताच्या गावात वा शहरात रोजगार मिळाला तर कोण कशाला जाईल दुसरया गावात यापेक्षा प्रत्येक गावाचा व शहराचा समान विकास करणे गरजेचे आहे आज आजूनही रस्त्यासारख्या सोयीसुविधांचा आभाव असताना आधीच विकसित झालेल्या व पूर्णपणे विकासाची जेथे संधी नसलेल्या शहरांचा विकास उपयोगी नाही त्यापेक्षा अनेक छोट्या गावांचा विकास केल्यास तेथील लोकांना आपल्या कौशल्याने रोजगार मिळाल्यास शहरांकडे जाणारा लोंढा कमी होऊन सर्व देशांचा विकास समान तर होईलच पण प्रत्येकाला अभिमानाने जगता येईल .
स्मार्ट सिटी पेक्षा स्वयंपूर्ण गावे बनविली तर खऱ्या अर्थाने भारताचा विकास होयील. हिवरे बझार , राळेगणसिधी च्या धर्तीवर भारतातील खेडी स्वयंपूर्ण व्हावीत. रोजगाराचे साधन प्रत्येक गावातच उपलब्ध व्हावेत. रोजगारासाठी शेकडो मैल दूर जाण्याची गरज भासता कामा नाही. दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी शेतीपूरक उद्योग असावेत. बरेच काही करता येणे शक्य आहे. नुसते सरकारवर अवलंबून राहता प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा , आणि मुळात हे मिशन असावे .
शहरांच्या गरजा खेडी पूर्ण करतात त्यामुळे खेडीही स्मार्ट झाली पाहिजे .
खेडी स्मार्ट होण्याकरिता खालील गोष्टींची आवशकता आहे .
खेडी स्मार्ट होण्याकरिता खालील गोष्टींची आवशकता आहे .
० अनेक गावात पाण्यासाठी वणवण करण्यातच दिवस जातो. कुठे हातपंप आहेत तर पाणी नाही, वीजही नाही. पाणी शुद्धीकरण नाही या गोष्टी झाल्या पाहिजे . पाणी शुद्धीकरणासाठी यंत्रणा पाहिजे
० शौचालयांचा अभाव असल्यामुळे अस्वच्छता होणारे संसर्गजन्य रोग पसरत आहेत घर तिथे शौचालय असलेच पाहिजे .
० निर्धूर चूल, गॅस, सूर्यचूल यांची यांची केवळ माहितीच नाही तर सुरुवात गावा-गावात झाली पाहिजे
०जनजागृती करून काही जुन्या आणि अयोग्य पद्धती बंद केल्या पाहिजेत
० शासकीय आरोग्यसेवा सर्व ठिकाणी आहेत पण अनेक खेडे गावात नर्स, डॉक्टर वेळेला उपस्थित नसतात . बरेच जण शहरातून ये-जा करतात. खेडय़ात राहत नाहीत. २४ तास जिथे डॉक्टरांची गरज असते तेथे डॉक्टर नसतातच, तसेच प्राथमिक शिक्षकही गावात राहत नाही ,तीच परिस्थिती अनेक शासकीय कर्मचारी यांची आहे
याची करणे म्हणजे खेड्यात शौचालय नाही, घर नाही, इंग्लिश मीडियम शाळा नाही म्हणून तेथे राहणे टाळलेच जाते. व्यवस्थित घर शौचालयासह दिले तरी या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची तिथे राहण्याची तयारी नसते. अशी स्थिती बर्याच गावांत आहे.हि स्थिती बदलली पाहिजे त्यासाठी आवशक सोयी सुविधा खेड्यात झाल्याच पाहिजे .
शेतीसाठी पाण्याची कमतरता अनेक गावात आहे त्यामुळे शेती ओस पडत आहे त्यासाठी हि कमी पूर्ण करण्यासाठी बंधारे , तळी ,पाट या गोष्टी झाल्या पाहिजे
० शौचालयांचा अभाव असल्यामुळे अस्वच्छता होणारे संसर्गजन्य रोग पसरत आहेत घर तिथे शौचालय असलेच पाहिजे .
० निर्धूर चूल, गॅस, सूर्यचूल यांची यांची केवळ माहितीच नाही तर सुरुवात गावा-गावात झाली पाहिजे
०जनजागृती करून काही जुन्या आणि अयोग्य पद्धती बंद केल्या पाहिजेत
० शासकीय आरोग्यसेवा सर्व ठिकाणी आहेत पण अनेक खेडे गावात नर्स, डॉक्टर वेळेला उपस्थित नसतात . बरेच जण शहरातून ये-जा करतात. खेडय़ात राहत नाहीत. २४ तास जिथे डॉक्टरांची गरज असते तेथे डॉक्टर नसतातच, तसेच प्राथमिक शिक्षकही गावात राहत नाही ,तीच परिस्थिती अनेक शासकीय कर्मचारी यांची आहे
याची करणे म्हणजे खेड्यात शौचालय नाही, घर नाही, इंग्लिश मीडियम शाळा नाही म्हणून तेथे राहणे टाळलेच जाते. व्यवस्थित घर शौचालयासह दिले तरी या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची तिथे राहण्याची तयारी नसते. अशी स्थिती बर्याच गावांत आहे.हि स्थिती बदलली पाहिजे त्यासाठी आवशक सोयी सुविधा खेड्यात झाल्याच पाहिजे .
शेतीसाठी पाण्याची कमतरता अनेक गावात आहे त्यामुळे शेती ओस पडत आहे त्यासाठी हि कमी पूर्ण करण्यासाठी बंधारे , तळी ,पाट या गोष्टी झाल्या पाहिजे
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment