करिअरच्या अनेक वाटा :
आपल्या आवडीचे करिअर निवडून घ्या गगनभरारी !
विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना फार गोंधळून जाऊ नये . पालकांवरही विनाकारण दबाव आणू नये .
आपली आवड आणि कल कशात आहे ते प्रथम ठरवावे. कल ओळखूनच करिअर निवडावे.
1०
वी झाल्यानंतर मॅथ्स घ्यायचे की बायोलॉजी हे ठरवावे. कोणत्या विषयाचा पुढे
फायदा होणार आहे याची माहिती घेऊन त्याची निवड करावी . करिअरबाबत जे ठरवले आहे
त्यात यश संपादित करण्यासाठी अधिक परिश्रम करण्याची तयारी ठेवावी. पारंपारिक
शिक्षणापेक्षा वेगळं शिक्षण घेण्याचा विचार करावा . आयटीआयमध्येही चांगले
करिअर घडू शकते त्यातही भरपूर प्रकारचे कोर्स आहेत.
विद्यार्थ्यांचे करिअर घडवताना पालकांनी .
-- मुलाची आवड,
-- त्याची क्षमता,
--- आणि त्याची पात्रता या तीन गोष्टींचा विचार करून करिअर निवडले पाहिजे.
करिअरच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी फार चोखंदळ बनू नये आवडीचे करिअर तयार करण्यासाठी
प्रयत्न करा. परंतु दुर्दैवाने आवडीचे करिअर मिळाले नाही तर निराश होऊ नये.
करिअर: बरेच विद्यार्थी 10 वीनंतरच करिअरचा विचार करतात. अभ्यास करून पुढे
कोण होणार याचा विचार तर करायलाच हवा. मोठे झाल्यावर उदर निर्वाहासाठी
नोकरी अथवा व्यवसाय करणे याला करिअर म्हणतात. करिअरच्या दृष्टीने त्या
त्या क्षेत्रातले विशिष्ट शिक्षण घ्यावे लागते. आणि त्याचे नियोजन आधीच
करावे लागते
आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्त्वाचे मानले
जाते. चांगल्या करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवावी. ज्या प्रमाणे कोणत्याही
गोष्टीचे नियोजन केल्याने ती गोष्ट जरी कमी असली तरी पुरते हा आपल्या
रोजच्या जीवनातील अनुभव असतो, तसेच करीयरचे नियोजन केल्याने सामान्य
बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात
10 वीनंतर
कला, विज्ञान, वाणिज्य याबरोबरच इतरही शाखांतून प्रवेश घेऊन करिअर घडवता
येते. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात फारसा रस नाही किंवा घरच्या
बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे लवकर पायावर उभे राहायचे आहे
त्यांच्यासाठी 10 वी -12 वीनंतर विविध रोजगाराभिमुख कोर्सेस आहेत. विज्ञान
शाखेत वेगवेगळे वैद्यकीय शाखेतील शिक्षण घेता येतात . तसेच
अभियांत्रिकीच्या अनेक शाखांचे शिक्षण १२ वी नंतर किंवा १० वी नंतर घेता
येते .
तसेच कला ,वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवीनंतरसुद्धा करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत .
तसेच कला ,वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवीनंतरसुद्धा करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत .
१० वी नंतर कुठल्या शाखेला प्रवेश ?
१०
वी नंतर कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा याकरिता पालकांनी व
विद्यार्थ्यांनी दोन्हीनीही विचार केला पाहिजे. दहावीनंतर विविध अभ्यास
शाखा उपलब्ध आहेत . परंतु कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचाया गोंधळात
विद्यार्थी आणि त्यांचे पालक पडतात
>> विद्यार्थ्याचा स्वतःचा कल जाणून घेतला पाहिजे .
>>त्याचप्रमाणे विद्यार्थ्यानी कुठल्या विषयात/क्षेत्रात करीयर करायचे ह्याचा विचार केला पाहिजे आणि .
>> त्या क्षेत्रात नोकरीच्या किती संधी उपलब्ध आहेत याचा आढावा घेऊन त्यात मन रमेल काय याचाही विचार करावा
>> पालकवर्गाने आणि विद्यार्थ्यांनी त्यांनी निवडलेल्या विषयातली अभिरूची, योग्यता व क्षमता तपासून पहिली पाहिजे .
काहीवेळा
पालकवर्ग विद्यार्थ्यांच्या मनाविरूध्द इतर शाखेत त्याला टाकतात . तो
विषय मुळातच विद्यार्थ्यांच्या आवडीचा नसतो त्यामुळे त्यांना त्यात विशेष
प्राविण्य मिळवता येत नाही आणि मग त्याच्यात त्याच्यात वैफल्य निर्माण
होते
योग्य करियर निवडण्याकरिता बुद्ध्यांक मोजून घ्या !
योग्य करियर निवडण्याकरिता विविध चाचण्याद्वारे बुद्ध्यांक मोजून घ्यावा मानसोपचार तज्ज्ञ या प्रकारच्या चाचण्या करतात.
हुशारी
दोन तऱ्हेची असते. एक खट ( बुध्यांक ) ( विज्ञान-गणित अशा विषयातील
हुशारी ) चांगला असतो वा एट (भावनांक)
(कला-क्रीडा-उद्योजकता-चित्र-नृ त्य-नाट्य-शिल्प वगैरेत) चांगला असतो.
सुधारत: ८ वीतच मानसोपचारतज्ञांकडे जाऊन विद्यार्थ्यांनी खट आणि एट तपासून घेऊन ते
कुठल्या क्षेत्रात हुशार आहोत हे लक्षात ठेवून त्या क्षेत्रात करिअर
करण्याचे नियोजन करावे .
बऱ्याच जणांना भीमसेनजी, लता दीदी तसेच सुरेश वाडकर यांच्याप्रमाणे गायक
व्हायचे असते.तर कोणाला किरण बेदींप्रमाणे अधिकारी व्हायचे असते. तर
एखाद्याला सायन्टिस्ट व्हायचे असते; तसेच कोणाला सिद्धार्थ जाधव , सुबोध भावे यांच्याप्रमाणे अभिनयात रस असतो
परंतु विद्यार्थ्यांना कशात रस आहे हे आपल्यालाच लवकरात लवकर म्हणजे साधारणतः: ८वीतच
समजले पाहिजे. आणि त्यात करिअर करण्यासाठी विचार करून त्याची सविस्तर
माहिती मिळविली पाहिजे .
उदा. ज्यांना डॉक्टर
व्हायचे आहे त्यांनी तर मेडिकलच्या विविध कोर्सेसची माहिती मिळविली पाहिजे .
त्यासाठी ओळखीच्या डॉक्टरांशी चर्चा करून इंटरनेटवरून माहिती मिळवून घ्यावी
.
नोकरीसाठी विविध शाखांचा विचार करायला हवा. तसेच जवळपास
करिअरशी संबंधित कोणती महाविद्यालये आहेत, याची माहिती घेतली पाहिजे. ,
वृत्तपत्रांच्या करिअर पुरवण्या तसेचएखादे करिअर
मार्गदर्शक पुस्तक इत्यादी वाचून माहिती घेतली पाहिजे .
चांगल्या करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवावी.करीयरचे नियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात.
अभ्यासक्रमाची
कोणतीही शाखा "चांगली' किंवा "वाईट' नसते. विद्यार्थ्यांनी त्यांची आवड,
बलस्थाने ,कुवत ओळखून योग्य प्रशिक्षणाच्या साह्याने कौशल्ये विकसित केली
तर ते यशस्वी करिअर घडवू शकतात
१० वी नंतरच्या संधी
१. व्यावसायिक शिक्षण: हे शिक्षण किमान कौशल्यावर आधारित आहे
कालावधी: १ ते ३ वर्ष
संधी : स्वयंरोजगार : शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना व्यवसाय सुरु करता येतो,
औद्योगिक क्षेत्रात कुशल कारागीर म्हणून संधी
२) पदवी /डिप्लोमा : दहावीनंतर ३ ते ४ वर्षांचे हे अभ्यासक्रम असतात.
कौशल्य आवश्यक गुण : विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान ह्या विषयाची आवड असावी
३) उच्च माध्यमिक शिक्षण: कला, वाणिज्य व विज्ञान या १० वी नंतरची उच्च माध्यमिक शिक्षणाच्या तीन मुख्य शाखा आहेत.
संधी:
-खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीची संधी -
- उच्च क्षिक्षणाची संधी: विविध क्षेत्रातील उच्च शिक्षण घेता येते.
१२ वी नंतरच्या संधी
१२ वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी विद्यापीठातील पदवी शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास पात्र ठरतात .
.१२ वी परीक्षा मुख्यतः कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन शाखांमध्ये विभागली गेली आहे.
१२ वी नंतर करियर्सची संधी :
- पदवी शिक्षणाची संधी
- विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे पदवी शिक्षणाची संधी उपलब्ध आहे
- इतर अभ्यासक्रम
पदवी नंतरच्या संधी
- उच्च शिक्षणाच्या ,पदवीत्तर शिक्षणाच्या संधी
- सरकारी आणि खाजगी नोकरीच्या आणि रोजगाराच्या विविध संधी
No comments:
Post a Comment