व्यवसायावर सायबर हल्ला झाला तर त्याचा प्रतिकूल परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. म्हणूनच प्रत्येक आर्थिक संस्थेने अशा अडचणींवर मात करण्यासाठी सुसज्ज अशी सायबर यंत्रणा तयार ठेवून लगेचच कार्यवाही करावी. देशात सार्वजनिक आणि खासगी पायाभूत सुविधांचे सायबर हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय सायबर सुरक्षितता धोरण आहे.
राज्यात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एक हजार मजबूत सायबर फोर्स तयार करण्याकरीता तसेच प्रत्येक जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचा तत्काळ तपास करण्यासाठी नॅसकॉमच्या सहाय्याने सायबर प्रयोगशाळाही तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे परंतु सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व लोकांमध्ये जागृकता निर्माण करणे जास्त गरजेचे आहे
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे ट्विटर अकॉउंट हॅक झाले होते तसेच मागे काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका महाविद्यालयाची वेबसाईट हॅकरनी काही दिवसांपूर्वी हॅक केली होती ..............
राज्यात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एक हजार मजबूत सायबर फोर्स तयार करण्याकरीता तसेच प्रत्येक जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचा तत्काळ तपास करण्यासाठी नॅसकॉमच्या सहाय्याने सायबर प्रयोगशाळाही तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे परंतु सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व लोकांमध्ये जागृकता निर्माण करणे जास्त गरजेचे आहे
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे ट्विटर अकॉउंट हॅक झाले होते तसेच मागे काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका महाविद्यालयाची वेबसाईट हॅकरनी काही दिवसांपूर्वी हॅक केली होती ..............
सावधान ! जग उभे आहे तिसरया महायुद्धाच्या उंबरठ्यावर ......
विचार करा जर ,एखादी ऑन लाइन एयर इंडिया किंवा इंडियन रेल्वे ची वेब साइट हॅक झाली .....? सगळ्या क्रेडीट कार्ड्स ची,डेबिट कार्डचे डीटेल्स, वैयक्तिक माहिती इत्त्यादी वर त्या सायबरदहशतवाद्याचा चा ताबा जाइल.
आणि जर कधी बँकिंग क्षेत्रात जर असा हल्ला झाला तर कुठल्याही देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील
हल्लीचे जग हे इंटर्नेट सॅव्ही झालेले आहे आणि बरेचसे महत्वाचे व्यवहार हे इंटरनेट वर होतात म्हणून हे व्यवहार करतांना काळजी घेतली पाहिजे
अलीकडच्या दहशतवादी घटनांमधला आधुनिक तंत्रज्ञानाचा सफाईदार वापर महत्वाचा ठरला आहे. उत्तर अमेरिकेतल्या व्हरमाँटमधल्या ‘व्हॅली न्यूज’मध्ये मॅथ्यू स्कोफील्ड यांनी पॅरिसवरच्या हल्ल्यात झालेल्या तंत्रज्ञानाच्या वापराच्या चांगल्या आणि वाईट बाजूंचा विचार केला आहे. दहशतवाद्यांनी या हल्ल्यात केलेला आॅनलाईन चॅटींग, गेमींग, सोशल मीडिया आणि जीपीएसचा केलेला वापर त्यांची योजना अंमलात आणण्यासाठी महत्वाचा ठरला होता. जी तंत्रे त्यांच्या विरोधात लढताना उपयोगी ठरणारी आहेत ती त्यांना देखील उपलब्ध होत आहेत.
रक्तपात न करता गुन्हेगारी वाढली आहे. अनेक अतिरेक्यांकडून संगणकाचा खुबीने वापर केला जात आहे. त्यामुळे तिसरे महायुद्ध सायबरमधून लढले जाईल.
सायबर क्षेत्रात दक्षिण कोरियासारखे छोटे देशही आपल्यापेक्षा प्रगत आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. सायबरमध्ये चीनची भीती अमेरिकेला आहे. म्हणून भारताने अमेरिकेबरोबर सहकार्याची भूमिका घ्यायला हवी. भारतात तयार होणा-या संगणकतज्ज्ञांना काही वर्ष देशात राहून सेवा करायला हवी.
सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून, संगणकाचा वापर होऊन तिसरे महायुद्धही होऊ शकते हे भारताने लक्षात घेतले पाहिजे आणि तातडीने त्यावर उपाय योजना केल्या पाहिजे .
आज भारतासमोरच नाही तर जगासमोर आणि प्रत्येक माणसासमोर ‘सायबर युद्धाचे ’चं भयावह संकट उभं आहे
तिसरं महायुद्ध हे पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवं, असं थोडंच आहे. कारण युद्धाची पद्धत बदलली आहे . महायुद्धे आता कुठही होतात, त्याचं ठिकाण त्याचं ठिकाण व्हर्च्युअल म्हणजे आभासी जग असतं असू शकत आणि हे विश्व आहे, इंटरनेटचं…
सायबर हल्ल्याचे काही उदाहरण
१ हॅकर्सनी अमेरिकेच्या सरकारी संगणकातील माहिती चोरली आहे. आताच्या व माजी अशा मिळून ४० लाख सरकारी कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती चोरण्यात आली होती . आतापर्यंत अमेरिकी संगणकावर हॅकर्सनी केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.
२ एखादा सायबर हल्ला क्षणार्धात ही गुप्तता धोक्यात आणत असल्याच्या घटनाही समोर येत असतात. अमेरिकेतील ऑफिस ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (ओपीएम)वर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये तब्बल ५६ लाख जणांचे फिंगरप्रिन्ट्स चोरीला गेले होते .
३.पुण्यातील एका महाविद्यालयाची वेबसाईट काही दिवसांपूर्वी हॅकरनी हॅक केली होती .
४. चीन मधील प्रसिद्ध विद्यापीठाचीही वेबसाईट डॉन टू" या हॅकरनीच हॅक केली होती .सायबर गुन्हेगारी:सोशल नेटवर्किंग साइटवर सायबरील गुन्हे
तिसरे महायुद्ध असु शकते ........सायबर महायुध्दविचार करा जर ,एखादी ऑन लाइन एयर इंडिया किंवा इंडियन रेल्वे ची वेब साइट हॅक झाली .....? सगळ्या क्रेडीट कार्ड्स ची,डेबिट कार्डचे डीटेल्स, वैयक्तिक माहिती इत्त्यादी वर त्या सायबरदहशतवाद्याचा चा ताबा जाइल.
आणि जर कधी बँकिंग क्षेत्रात जर असा हल्ला झाला तर कुठल्याही देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील
हल्लीचे जग हे इंटर्नेट सॅव्ही झालेले आहे आणि बरेचसे महत्वाचे व्यवहार हे इंटरनेट वर होतात म्हणून हे व्यवहार करतांना काळजी घेतली पाहिजे
अलीकडच्या दहशतवादी घटनांमधला आधुनिक तंत्रज्ञानाचा सफाईदार वापर महत्वाचा ठरला आहे. उत्तर अमेरिकेतल्या व्हरमाँटमधल्या ‘व्हॅली न्यूज’मध्ये मॅथ्यू स्कोफील्ड यांनी पॅरिसवरच्या हल्ल्यात झालेल्या तंत्रज्ञानाच्या वापराच्या चांगल्या आणि वाईट बाजूंचा विचार केला आहे. दहशतवाद्यांनी या हल्ल्यात केलेला आॅनलाईन चॅटींग, गेमींग, सोशल मीडिया आणि जीपीएसचा केलेला वापर त्यांची योजना अंमलात आणण्यासाठी महत्वाचा ठरला होता. जी तंत्रे त्यांच्या विरोधात लढताना उपयोगी ठरणारी आहेत ती त्यांना देखील उपलब्ध होत आहेत.
रक्तपात न करता गुन्हेगारी वाढली आहे. अनेक अतिरेक्यांकडून संगणकाचा खुबीने वापर केला जात आहे. त्यामुळे तिसरे महायुद्ध सायबरमधून लढले जाईल.
सायबर क्षेत्रात दक्षिण कोरियासारखे छोटे देशही आपल्यापेक्षा प्रगत आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. सायबरमध्ये चीनची भीती अमेरिकेला आहे. म्हणून भारताने अमेरिकेबरोबर सहकार्याची भूमिका घ्यायला हवी. भारतात तयार होणा-या संगणकतज्ज्ञांना काही वर्ष देशात राहून सेवा करायला हवी.
सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून, संगणकाचा वापर होऊन तिसरे महायुद्धही होऊ शकते हे भारताने लक्षात घेतले पाहिजे आणि तातडीने त्यावर उपाय योजना केल्या पाहिजे .
आज भारतासमोरच नाही तर जगासमोर आणि प्रत्येक माणसासमोर ‘सायबर युद्धाचे ’चं भयावह संकट उभं आहे
तिसरं महायुद्ध हे पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवं, असं थोडंच आहे. कारण युद्धाची पद्धत बदलली आहे . महायुद्धे आता कुठही होतात, त्याचं ठिकाण त्याचं ठिकाण व्हर्च्युअल म्हणजे आभासी जग असतं असू शकत आणि हे विश्व आहे, इंटरनेटचं…
सायबर हल्ल्याचे काही उदाहरण
१ हॅकर्सनी अमेरिकेच्या सरकारी संगणकातील माहिती चोरली आहे. आताच्या व माजी अशा मिळून ४० लाख सरकारी कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती चोरण्यात आली होती . आतापर्यंत अमेरिकी संगणकावर हॅकर्सनी केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.
२ एखादा सायबर हल्ला क्षणार्धात ही गुप्तता धोक्यात आणत असल्याच्या घटनाही समोर येत असतात. अमेरिकेतील ऑफिस ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (ओपीएम)वर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये तब्बल ५६ लाख जणांचे फिंगरप्रिन्ट्स चोरीला गेले होते .
३.पुण्यातील एका महाविद्यालयाची वेबसाईट काही दिवसांपूर्वी हॅकरनी हॅक केली होती .
५.आयसिस हि दहशदवादी संघटना या सायबर महायुद्धात भारताला लक्ष करत आहे असे दिसते कारण,नुकतेच भारतातून आयसिसचे हस्तक ताब्यात घेण्यात आलेत तेव्हा त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली कि ,हि संघटना हॅकर्सना हॅक करण्यासाठी नोकरीस ठेवत आहे आणि त्यांना १० हजार डॉलर म्हणजे तब्बल ६ लाख ६० हजार रुपये प्रत्येक कामाकरिता देत आहे , सरकारी वेबसाईट हॅक करून माहिती गोळा करण्याचे काम या हॅकर्सना आहे .सोशल मेडियाचा उपयोग आयसिस संगणक अभियंत्यांना गळाला अडकाविण्याकरिता करीत आहे
६ मागे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे ट्विटर अकॉउंट हॅक झाले होते .
कालच्या गुरुवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे.अज्ञात व्यक्तीने हॅक करुन त्यावर आक्षेपार्ह्य पोस्ट केल्या होत्या .
राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक कसे झाले
- हॅकर्सने राहुल गांधी यांचे छायाचित्र काढून टाकले होते .आणि त्यांच्या ट्विटर हँडलवर व्हेरिफाइड साइनच्या जवळ
हॅकर्सने अतिशय हिन पातळीची भाषा वापरून ट्विट केलेले होते .
इंटरनेट वापरताना नेट बँकींग अकाऊंट क्रमांक, आपला आयडी क्रमांक, पासवर्ड, क्रेडीट किंवा डेबीट पासवर्ड क्रमांक अथवा उघड करताना सावधानता बाळगावी. ऑन लाईन खरेदी करताना सुरक्षिततेचे उपाय योजावेत. स्पॅम मेल, फसवे मेल यावर डबल क्लिक करुन उघडण्याचा प्रयत्न करु नये. अशा मेल मधून व्हायरसची एक्झीक्युटेबल फाईल आपल्या नकळत डाऊन लोड होते. आपण जेव्हा संगणकावर काम करतो तेव्हा केलेल्या कामाची एक डुप्लीकेट फाईल तयार होऊन ती हार्ड डिक्सवर सेव्ह होते. जेव्हा आपण इंटरनेट चालू करतो तेव्हा अलगदपणे ही माहिती हॅकरला मेल व्दारे प्राप्त होते. .त्यामुळे फसगत टाळण्यासाठी अशा प्रकारचे फसवे मेल डीलीट करावे आपली संगणक सिस्टीम ऍन्टी व्हायरस, फायर वॉलने सुरक्षित ठेवावी.
सायबर युद्धातील गुन्हेगार कसे शेधावे
सायबर गुन्हे व गुन्हेगार शोधणे सोपं आहे. फ्रॉड मेल, धमकी देणारे मेल, किडनॉपिंग, फिशिंग, पोर्नोग्राफी आदींचे गुन्हे उघड करणे अतिशय सोपे आहे. यासाठी वापरात आलेल्या संगणक किंवा मेलवरुन गुन्हेगाराचा आयपी ऍड्रेस (इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस) शोधला जातो. असा मेल कोणत्या सर्व्हरवरुन आला हे शोधले जाते. आयपी ऍड्रेसवरुन वापरण्यात आलेल संगणक, त्याचा प्रकार, इंटरनेट स्पीड, सर्व्हरचे लोकेशन व सदरचा मेल कोठून आला हे उघड करुन गुन्हेगाराला शोधता येते.
कोणताही सायबर ऍटॅक आयपी ऍड्रेसद्वारे शोधणे शक्य आहे. सुरक्षितता,सावधगिरी बाळगून इंटरनेटचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
एथीकल हॉकिंग
तज्ञांच्या निष्कर्षानुसार आज डेटा थेप्ट, सायबर स्टॉकिंग, हॉकिंग, व्हायरस ऍटॅक, पोर्नोग्राफी ही महत्वाची सायबर आव्हाने आहेत
एथीकल हॉकिंग भविष्यातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी चांगल्या संधी आहेत. वाय फाय कनेक्शनबाबत देखील सुरक्षित वापर महत्वाचा आहे.सायबर . सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांकडे निर्भयपणे तक्रारी नोंदवणे आवश्यक आहे.सायबर सुरक्षिते साठी बना एथिकल हॅकर :एथिकल हॅकिंग
एथिकल हॅकिंग
सायबर सुरक्षेमधील एक भाग म्हणजे एथिकल हॅकिंग. एखाद्या कंपनीने "आयएसओ 270001'ने प्रमाणित केल्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्था साधली. ही व्यवस्था साधली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी एथिकल हॅकिंगचा वापर केला जातो. मी चोरी करण्याच्या उद्देशाने आलो, तर मला संगणक व्यवस्थेमध्ये प्रवेश मिळवता येतोय की नाही हे पाहण्यासाठी एथिकल हॅकिंग केले जाते. सायबर सुरक्षेची चाचणी यामुळे आपल्याला घेता येते .
नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड असे आपले आर्थिक व्यवहार ज्या संगणकावरून करतो , ते व्यवहार सुरक्षित होताहेत किंवा नाही हे तपासायला हवे. अन्यथा आर्थिक सायबर गुन्हे वाढू शकतात ,
दुर्दैवाने भारतात काही एथिकल हॅकर्स इतरांच्या संगणकामध्ये काय चाललेय हे चवीने पाहतात. लोकांच्या या चवीवर पैसे मिळवण्याऱ्या संस्थांहि तयार झाल्या आहे. यात सगळ्यांचे फावत असले तरी एथिकल हॅकिंगचा मूळ उद्देश नष्ट होतो आहे. यातून हे तथाकथित एथिकल हॅकर्सच गुन्हेगारीकरणाला साथ देत आहेत.
एथिकल हॅकिंग ही चमत्कृतीजन्य किंवा वलयांकित, करिअर नाही. सायबर सुरक्षेचे गांभीर्य लक्षात ठेवून, , या क्षेत्रात "खरोखरीच्या' तज्ज्ञ मंडळींची मोठी गरज आहे. 14-15 अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक होणाऱ्या भारतातील आर्थिक सायबर गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी हुशार, अनुभवी हॅकर्सची साथ हवी आहे.
संगणकात ‘डिजिटल’ फॉर्ममध्ये महत्वाची माहिती साठवून ठेवला जातो .
या कागदपत्रांच्या सुरक्षितेकरिता :
कॉम्प्युटर किंवा इंटरनेटवर टाकलेली ही माहिती सुरक्षित नाही . सायबर भामटे इंटरनेट च्या माध्यमातून या माहितीची आणि कागदपत्रांचीही चोरी करू लागलेत , आनि हि चोरी जगाच्या कुठल्या तरी कानाकोपर्यात राहून इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना शक्य झाले आहे महत्वाची माहिती नष्ट झाली तर कुणालाही चिंता होणारच . त्यामुळे आज एथिकल हॅकरची गरज भासतेय
‘एथिकल’ म्हणजे ‘नैतिक’
‘एथिकल हॅकर’चं काम:
कोणी जर कायद्याचं उल्लंघन करीत असेल तर त्याला आळा घालणं आणि संभाव्य धोके ओळखून अगोदरच खबरदारीचे उपाय योजणं. - ही कामं संगणकात ‘एथिकल हॅकर’ करतो.
‘एथिकल हॅकर’ हा संगणक क्षेत्रात रखवालदार ’च असतो. सायबर भामटे काय आणि कसे करू शकतात, हे त्याला माहित असते आणि ते त्यांनी करू नयेत म्हणून सुरक्षेचे उपाय योजून संगणकप्रणाली या सायबर भामट्यांपासून सुरक्षित ठेवणं, त्यांनी केलेला बिघाड दुरुस्त करण या गोष्टी ‘एथिकल हॅकर’ करतो.
संगणकीय यंत्रणेची ,त्या वरील माहितीची सुरक्षा यासाठी ‘एथिकल हॅकर’ आवशकता आहे. --
इंटरनेट वापरकरत्यांनो सावधान !... सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे .
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेल्या जगातील अव्वल पाच देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
भारतात व्हायरसच्या सॉफ्टवेअरमधून डेटा चोरी किंवा पैशांसाठी धमकी देण्याचे आणि व्यक्तीची माहिती चोरणे व फिशिंगचे प्रकार वाढल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सायबर गुन्ह्यांना बळी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्यांचा वापर करून अधिकाधिक पैशांची लूट करीत असल्याचे सर्वेक्षणात आढळले. सध्या भारतीयांचे इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाच्या कामांसाठी 66 टक्के भारतीय मोबाईल वापरतात. त्यामुळे सायबर हल्ल्यांचा धोका अधिकाधिक वाढत आहे. काही महिन्यांमध्ये बऱ्याच इंटरनेट मोबाईल युजर्सना सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागले.
भारतीय इंटरनेटचा वापर कशासाठी करतात?
सोशल नेटवर्किंग साईट्स- 63 टक्के
ऑनलाईन शॉपिंग- 42 टक्के
बॅंक अकाऊंट- 44 टक्के
पासवर्ड शेअर करणारे- 15 टक्के
लॉग आऊट न करणारे- 20 टक्के
अनोळखी लोकांशी कनेक्ट होणारे- 19 टक्के
इंटरनेटचा वापर ही भारतासारख्या देशात आजही ख-या अर्थाने शहरीभागात अधिक केला जातो. हे माध्यम देशातील छोट्या आणि ग्रामीण भागात तितकेच खोलवर पोहचले आहे. मात्र त्याच्या वापरासंदर्भातील एक भयानक वास्तव आकडेवारीतून समोर आले आहे. हॅकिंग करणे आणि समाजात तेढ निर्माण करणारी माहिती प्रसिद्ध करणे असे प्रकार मोठ्या शहरांपेक्षा लहान शहरे आणि ग्रामीण भागातून अधिक होत असल्याचे समोर आले आहे.
देशात झालेल्या एकूण हॅकिंगच्या घटनांपैकी ५५ टक्के हॅकिंग हे छोट्या शहरातून आणि ग्रामीण भागातून झाले आहे. तसेच समाज तेढ निर्माण करणारी माहिती प्रसिद्ध करण्यासंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण ग्रामीण भागात ६० टक्के इतके असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
आर्थिक फायदा हा हेतू सायबर गुन्ह्यांमागे आहे. हॅकिंगच्या सर्वाधिक घटना कर्नाटक राज्यात झाल्या आहेत. तर त्यानंतर आंध्र प्रदेशचा क्रामांक लागतो.
हॅकिंगच्या गुन्ह्यांमध्ये कर्नाटक आंध्र प्रदेशनंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा क्रमांक लागतो. तर बदनामी अथवा अश्लील गोष्टी वेबसाइट अथवा सोशल मिडियावर टाकण्यामध्ये आंध्र प्रदेश, केरळ नंतर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि आसाम या राज्यांचा क्रमांक लागतो.
सायबर गुन्ह्यांमुळे चिंता
अलिकडेच मोठमोठ्या शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून खातेदारांच्या खात्यावरून परस्पर पैसे काढण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये हे प्रमाण चिंताजनक आहे़ मोठमोठ्या ठिकाणी होत असलेल्या गुन्ह्यांचा प्रसार गावांमध्येही होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. मोबाईलवरून खोटे नाव सांगणे, बँकेच्या अधिकाऱ्याचे नाव सांगून एटीएमचा नंबर मिळवणे, त्याद्वारे परस्पर पैसे काढले जातात. काही महिन्यात अशा प्रकारच्या घटना सलग घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे ग्राहकांकडून वेळोवेळी पालन होत नाही. तसेच पोलिसांकडूनही सावधगिरीचे उपाय सुचवण्यात येतात़ त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. .
सोशल मिडियाचा सायबर गुन्हेगारीसाठी वापर
संगणकाचा वापर करून प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा अगदी जवळच्या आणि सातासमुद्र पार असणाऱ्या आपल्या मित्राशी, मैत्रिणीशी, नातेवाईकांशी, सहकाऱ्यांशी सामाजिक माध्यमांच्या मदतीने बोलता येते
फेसबुक, ट्वीटर, ऑर्कुट अथवा स्वतःचा ब्लॉग या सामाजिक माध्यमांचा वापर करून आज जगातील करोडो लोक एकमेकांच्या संपर्कात आहेत. अत्याधुनिक तंत्राज्ञानाच्या सहायाने भ्रमणध्वनीद्वारे (मोबाईल) देखील सामाजिक माध्यमांच्या मदतीने आपण समाजाच्या संपर्कात राहू शकतो.
नाण्याला जशा दोन बाजू असतात तसे या माध्यमांचे तोटे देखील आहेत. माणूस-माणसापासून तोडला जाणे (प्रत्यक्ष भेटी पेक्षा या माध्यमातून संपर्कात राहणे), फेसबुक अथवा ऑर्कुट वरील आपल्या प्रोफेलचा गैरवापर किंव्हा हेक होणे (विशेषतः मुलींचे) यांसारखे धोके पत्करण्याची तयारी या माध्यमांचा वापर करताना आपल्याला ठेवावी लागते. आधुनिक युगाच्या बरोबरीने जायचे असेल तर सामाजिक मध्यामंचा वापर करावाच लागेल, परंतु आपल्या वैयक्तिक गोष्टी समाजासमोर किती मांडायचा याचा देखील विचार करणे आवश्यक आहे.
इंटरनेट वापरतांना महत्वाच्या सूचना
सायबर कॅफेमधून किंवा ऑफिसमध्ये असताना इंटरनेटवर आपली वैयक्तिक माहिती, पत्ता, फोन नंबर देऊ नका, चॅट विंडोवर अशी माहिती टाकू नका, पासवर्ड बदलत रहा, तुमच्या किंवा तुमच्या नवऱ्याचा/ बायकोचा /मुलाचा/टोपणनावाचा पासवर्ड ठेवू नका, सर्व अकाऊंट्ससाठी एकच पासवर्ड ठेवू नका.
.काही सायबर गुन्ह्यांचे प्रकार
केडिट कार्ड-डेबिट कार्डचा पासवर्ड हॅक करून पैसे लुटणे, बक्षिसांच्या बनावट मेल्स पाठवून लुबाडणे अशा आथिर्क गुन्ह्यांपासून सोशल नेटवकिर्ंग साइटच्या माध्यमातून बनावट अश्लील प्रोफाइल्स तयार करणे, अश्लील एमएमएस पाठवणे अशा अनेक गुन्ह्यांचा सुळसुळाट झाला आहे.
क्रेडिट कार्ड विषयक माहिती काढून घेणं, अनेक बँकांतील पैसे स्वत:च्या खात्यात वळवून घेणं. काहीवेळा चोरलेल्या माहितीचा ब्लॅकमेल करण्यासाठीही हॅकर्स गैरवापर करतात
एखाद्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळवणे, त्या माहितीच्या आधारे त्याचा ऑनलाईन बॅंकिंगचा पासवर्ड हॅक करून त्याच्या अकाऊंटमधून पैसे लुबाडणे, सरकारी/ खाजगी संकेतस्थळावर सायबर हल्ला करून महत्त्वाचा डेटा मिळवणे आणि त्या माहितीचा उपयोग देशविघातक कृत्ये करण्यासाठी करणे.
क्रेडिट कार्ड, अश्लिल संदेश, हॅकिंग आणि लॉटरी गैरप्रकार या गुन्ह्यांचासुद्धा समावेश आहे.
सायबर गुन्हेगारी:सोशल नेटवर्किंग साइटवर सायबर गुन्हे कसे होतात आणि त्यांचे धोके
सोशल नेटवर्किंग साइटचा सर्वच स्तरातील लोकांकडून होणारा वापर स्वागतार्ह आहे. मात्र, "डेटा थेफ्ट‘च्या वाढत्या घटनांमुळे योग्य काळजी घेण्याची गरज आहे. मुळात इंटरनेटला सीमा नसल्याने अशा घटना वाढल्या आहेत.
सोशल मीडियाचा वापर
संवाद वाढविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अवश्य केला पाहिजे. मात्र, त्यावर फोटो किंवा अन्य खासगी माहिती ठेवणे पूर्णपणे योग्य राहणार नाही. विशेषत: फोटो अपलोड करताना हात जरा आखडता घेतला पाहिजे. तसे न झाल्यास झळकण्याची हौस भविष्यात अडचणीत आणण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियाचा वापर करताना सुरक्षिततेसाठी काळजी
सोशल मीडिया त्यात फेसबुकवरील काही अकाऊंट बनावट असतात. अशा बनावट अकाऊंटच्या माध्यमातून इतरांचे फोटो आणि अन्य काही माहिती उचलली जाण्याची भीती असते. त्यामुळे फोटो शेअर करताना सोशल मीडियावरील पर्यायांचा आधी विचार करावा. विश्वासार्हता असलेल्या लोकांशी ते शेअर करावेत. आपले फोटो सर्वांसाठी उपलब्ध होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्यासाठी योग्य पर्यायाची निवड करावी.
फोटो आणि अन्य माहितीचा सोशल नेटवर्किंग साइटवर गैरवापर
घरातील मुला-मुलींची माहिती सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड करण्याची बाब सर्वत्र दिसून येते. ही बाब घातक आहे. या साइटच्या माध्यमातून माहिती उपलब्ध झाल्याने अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांचे, पिकनिक, हॉटेलिंग आणि शॉपिंगचे फोटो शेअर करू नयेत.
सायबर गुन्हे कसे होतात आणि त्यांचे धोके काय आहेत
क्रेडिट कार्डचा "पिन‘ क्रमांक 'सोशल मीडिया साइट किंवा ई-मेलचे पासवर्ड. अशा प्रकारची "वैयक्तिक संवेदनशील माहिती‘ चोरी करून किंवा त्याचा परस्पर गैरवापर करून बहुतांश सायबर गुन्हे घडतात. अशा प्रकरणांमध्ये लॉटरी लागल्याचे एसएमएस, ई-मेल किंवा नोकरी मिळाल्याचे फसवे ई-मेल व्यक्तींना पाठविण्यात येतात आणि त्याद्वारे संबंधित व्यक्तीची महत्त्वाची माहिती चोरी केली जाते.
सायबर गुन्हे म्हणजे काय?
संगणक, मोबाईल किंवा इंटरनेटसह इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन नेटवर्क्सचा गैरवापर करून एखाद्या व्यक्ती किंवा समूहाला शारीरिक, मानसिक हानी पोचविण्यासाठी किंवा त्यांची बदनामी करण्यासाठी गुन्हेगारी उद्देशाने केलेले कृत्य म्हणजे सायबर गुन्हा. अशा गुन्ह्यांमध्ये प्रामुख्याने संगणकाचा साधन म्हणून गैरवापर होतो.
सायबर गुन्ह्यांचे प्रकार
वैयक्तिक स्वरूपातील संवेदनशील माहितीची चोरी किंवा परस्पर देवाण-घेवाण, आर्थिक फसवणूक (फिशिंग, स्पूफिंग), हॅकिंग (डिनायल ऑफ सर्व्हिस),अश्लील मजकूर म्हणजे सायबर गुन्हेगारीच्या भाषेत "पोर्नोग्राफी", कॉपीराइट व बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन,, असे सायबर गुन्ह्यांचे प्रकार आहेत.
सायबर गुन्हेगारी टाळण्याचे प्रतिबंधक उपाय: सुरक्षित ब्राउझिंगसाठी महत्वाचे नियम
>> मोबाईलच्या "स्क्रीन लॉक‘चा वापर करा.
>> मोबाईल बँकिंगचा वापर करताना स्क्रिन अनलॉकचे ऑप्शन वापरा.
>>सर्वात महत्वाचे म्हणचे आपल्या बँक खात्यासंदर्भातील कोणतीही माहिती मोबाईल डिव्हाइसमध्ये स्टोअर करू नका. जसे खाते क्रमांक, डेबिट आणि क्रेडीट कार्ड पीन आपल्या फोनमध्ये स्टोअर करू नका
>>सोशल मीडियाच वापर करताना सावधान ------------ सोशल मीडियाचा वापरत करतानाही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मालवेअर अटॅकसाठी सर्वात घातक प्लॅटफॉर्म सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामध्ये बरेच युजर अशा काही माहिती शेअर करतात त्यामुळे मालवेअर अटॅक होण्याची शक्यता आहे
>> मोबाईलच्या "स्क्रीन लॉक‘चा वापर करा.
>> मोबाईल बँकिंगचा वापर करताना स्क्रिन अनलॉकचे ऑप्शन वापरा.
>>सर्वात महत्वाचे म्हणचे आपल्या बँक खात्यासंदर्भातील कोणतीही माहिती मोबाईल डिव्हाइसमध्ये स्टोअर करू नका. जसे खाते क्रमांक, डेबिट आणि क्रेडीट कार्ड पीन आपल्या फोनमध्ये स्टोअर करू नका
>>सोशल मीडियाच वापर करताना सावधान ------------ सोशल मीडियाचा वापरत करतानाही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मालवेअर अटॅकसाठी सर्वात घातक प्लॅटफॉर्म सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामध्ये बरेच युजर अशा काही माहिती शेअर करतात त्यामुळे मालवेअर अटॅक होण्याची शक्यता आहे
>>तुमच्या कुटुंबीयांच्या नावाने किंवा सहज ओळखता येईल, अशा नावाचा पासवर्ड ठेवू नका तसेच अक्षरांबरोबर आकड्यांचाही वापर पासवर्डमध्ये करा.
>>लॉग-इन करताना "रिमेम्बर पासवर्ड‘ हे ऑप्शन अनचेक करा.
>>सार्वजनिक ठिकाणी किंवा कॉमन कॉम्प्युटरवरून तुमचे ई-मेल किंवा अन्य संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर "ब्राउझिंग हिस्ट्री‘ आणि कुकीज डिलीट करण्यास विसरू नका.
>> विंडोज इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊझर वापरत असल्यास "इनप्रायव्हेट ब्राउझिंग‘सारख्या सुविधेचा वापर करा.
>> सध्या स्पाय वेयरचा प्रसार प्रचंड वाढलाय काही ई-मेल उघडल्यावर लगेचच तुमच्या कंप्यूटर मध्ये स्पाय वेयर शिरू शकते. तसेच काही गेम्स व प्रोग्रॅम्स् डाउनलोड करताना पण स्पाय वेयर शिरू शकते. अश्या विविध प्रकारांनी स्पाय वेअर तुमच्या नकळत तुमच्या कंप्यूटर मध्ये शिरतात आणि तुम्ही कंप्यूटर वर काय करता याची पूर्ण खबरबात ठेवतात. तुमची खाजगी माहिती, काय पासवर्ड टाइप केले, कुठले प्रोग्रॅम वापरले, कुठल्या वेब साईट ना भेटी दिल्या ही माहिती स्पाय वेअरच्या साह्यानी हॅकर्सच्या हाती लागू शकते.
>>चॅट करताना कुठलीही महत्वाची माहिती टाइप करू नका. वेब कॅमेरा काम झाल्यावर बंद करा किंवा झाकून ठेवा.
>>दर 2 ते ३ आठवड्यानी तुमचे पासवर्ड बदला. पासवर्ड असे ठेवा की जे सहज ओळखायला कठीण राहतील. पासवर्ड मध्ये तुमचा , फोन नंबर, जन्म तारीख, घरातल्या लोकांची नावे यांचा वापर टाळा.
>> 2 किंवा 3 दिवसांनी कंप्यूटर च्या वापरामुळे जमा झालेली तात्पुरती डाउनलोडेड माहिती व जुनी वेब पेजेस कायमस्वरूपी काढून टाकत चला.
. कंप्यूटर आणि इंटरनेट चे फायदे पाहता कंप्यूटर न वापरणे हा पर्याय नसून आपण कंप्यूटर वापरताना थोडी काळजी घेतली तर ह्या हॅकर्सवर मात करणे अजिबात अवघड नाही.
>> सध्या स्पाय वेयरचा प्रसार प्रचंड वाढलाय काही ई-मेल उघडल्यावर लगेचच तुमच्या कंप्यूटर मध्ये स्पाय वेयर शिरू शकते. तसेच काही गेम्स व प्रोग्रॅम्स् डाउनलोड करताना पण स्पाय वेयर शिरू शकते. अश्या विविध प्रकारांनी स्पाय वेअर तुमच्या नकळत तुमच्या कंप्यूटर मध्ये शिरतात आणि तुम्ही कंप्यूटर वर काय करता याची पूर्ण खबरबात ठेवतात. तुमची खाजगी माहिती, काय पासवर्ड टाइप केले, कुठले प्रोग्रॅम वापरले, कुठल्या वेब साईट ना भेटी दिल्या ही माहिती स्पाय वेअरच्या साह्यानी हॅकर्सच्या हाती लागू शकते.
>>चॅट करताना कुठलीही महत्वाची माहिती टाइप करू नका. वेब कॅमेरा काम झाल्यावर बंद करा किंवा झाकून ठेवा.
>>दर 2 ते ३ आठवड्यानी तुमचे पासवर्ड बदला. पासवर्ड असे ठेवा की जे सहज ओळखायला कठीण राहतील. पासवर्ड मध्ये तुमचा , फोन नंबर, जन्म तारीख, घरातल्या लोकांची नावे यांचा वापर टाळा.
>> 2 किंवा 3 दिवसांनी कंप्यूटर च्या वापरामुळे जमा झालेली तात्पुरती डाउनलोडेड माहिती व जुनी वेब पेजेस कायमस्वरूपी काढून टाकत चला.
. कंप्यूटर आणि इंटरनेट चे फायदे पाहता कंप्यूटर न वापरणे हा पर्याय नसून आपण कंप्यूटर वापरताना थोडी काळजी घेतली तर ह्या हॅकर्सवर मात करणे अजिबात अवघड नाही.
आक्षेपार्ह ई-मेल येत असल्यास...
आक्षेपार्ह ई-मेल तुमच्या इनबॉक्समधून डिलीट न करता
त्या ई-मेलचे "एक्स्टेंडेड हेडर‘ची माहिती काढून ठेवा आणि मग त्याची कॉपी पोलिसांना द्या
हेडरची माहिती काढण्यासाठी
www.cybercellmumbai.gov.in या संकेतस्थळा ला भेट देवून "एफएक्यू‘तील सूचना वाचा
सायबर कायदा काय
अश्लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल भारतीय दंडविधानाच्या 292 कलमान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. त्या अंतर्गत दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. माहिती तंत्रज्ञानाचे कलम 66 हे संगणकाशी संबंधित गुन्ह्यांसाठी वापरले जाते. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल 66 (ए) कलमान्वये तीन वर्ष तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. "आयडेंटीटी थेफ्ट‘ म्हणजे "वैयक्तिक संवेदनशील माहिती‘ची चोरी व गैरवापर केल्याबद्दल 66(सी) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडापर्यंतची शिक्षा होऊ शकते.
"प्रायव्हसी‘च्या उल्लंघनाबद्दल 66(इ) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित, प्रकाशित केल्याबद्दल 67(ए) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा वर्षे दंडाची शिक्षा होऊ शकते. अल्पवयीन मुलांचे आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित केल्याबद्दल 67 (बी) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे
No comments:
Post a Comment