Tuesday, 3 October 2017

तंत्रज्ञान काल आज आणि उद्या

तंत्रज्ञान काल आज आणि उद्या


बदलत्या तंत्रज्ञानाचे बरेचशे फायदे आपल्याला आजच्या आधुनिक युगात अनुभवाला येत आहे आणि यापुढेही बदलत्या तंत्रज्ञानामुले आपले जनजीवन आणखीनच सुख सोयीचे होणार आहे 
तंत्रज्ञानाचे कालचे आणि आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदललेल्या जीवनाचे काही उदाहरणे 
१ .आजच्या अत्याधुनिक युगात टेलिग्राम, ही सर्वात जुनी आणि उपयुक्त सेवा बंद पडल्यानंतर जुनी  मनीऑर्डर सेवाही बंद करण्यात आली आहे. यामुळे च पोस्टमन आपल्या दारात आता कधीच मनीऑर्डर घेऊन येणार नाही.
पूर्वी आपले दूरचे नातेवाईक किंवा मित्रांना पैसे पाठविण्यासाठी मनीऑर्डर हे माध्यम होते. पण, तंत्रज्ञानाचा विकास होत गेला आणि हातात मोबाईल आले. आता तर या मोबाईलमधून क्षणात जगाच्या पाठीवर कुठेही पैसे पाठविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तंत्रज्ञानाच्या  विकासामुळे आधी कमी शब्दात संदेश पाठविणारी टेलिग्राम सेवा बंद पडली आहे आणि  त्याची जागा मोबाईल किंवा व्हॉटस् ऍपवरील एसएमएसने घेतली आणि आता मनीऑर्डरची जागा इंटरनेट व मोबाईल बँकिंगने घेतली.  फटका या प्राचीन टपाल सेवांना बसला आणि त्या कायमच्याच इतिहासजमा झाल्या.
१८८० पासून भारतीय टपाल खाते मनीऑर्डरची सेवा घरोघरी पुरवत होती.  देशाच्या कानाकोपर्‍यातील लोकांना मनीऑर्डरच्या माध्यमातून घरबसल्या पैसे पाठविले जात असत. पण, .
ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून पैसे पाठविल्यानंतर क्षणात ते प्राप्त होतात. हे पैसे काढण्यासाठी बँकेतही जाण्याची गरज उरली नाही. घराजवळच असलेल्या एटीएममधून हा पैसा काढता येतो. या ऑनलाईन बँकिंगमुळे मनीऑर्डर सेवा ठप्पच पडली आहे . टपाल खात्याने मनीऑर्डर सेवा बंद करून   नवी इलेक्ट्रॉनिक मनीऑर्डर आणि इन्स्टंट मनीऑर्डर या दोन जलद सेवा सुरू केलेल्या आहेत. यातील इन्स्टंट मनीऑर्डर सेवेत एक हजार रुपयांपासून ५० हजार रुपये पाठविण्याची सुविधा राहणार आहे. इन्स्टंट सेवा असलेल्या टपाल कोषागारातून कोणत्याही एका ओळखपत्राच्या आधारे एक इलेक्ट्रॉनिक फॉर्म भरून पैसे पाठवले जाऊ शकतात. तर इलेक्ट्रॉनिक मनीऑर्डर सेवेतून एक रुपया ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम घरबसल्या प्राप्त करता येणार आहे
  पूर्वीप्रमाणे घरातून बाहेर जावून , बँकेच्या वेळेतच बँकेत जावून , रांगेत उभे राहून आणि स्लिप भरून व्यवहार करण्याचा हा सारा त्रासदायक प्रवासाचा जमाना तंत्रज्ञानामुळे इतिहासजमा झाला असून 
बँकिंग क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचा वापर वाढल्याने अधिकाधिक लोकांना विविध प्रकारच्या सेवा देणे  बँकांना शक्य झाले आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे बँकिंग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे.
नेट बँकिंग, एसएमएस बँकिंग, मोबाईल बँकिंगमुळे बँकिंग सेवेमुळे . घरात बसून आता आपण बँकेचे व्यवहार करू शकतो.  टेक्नॉलॉजीमुळे  एटीएम, कोअर बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि आरटीजीएस सेवेमुळे बँकिंग क्षेत्राचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. 
एम पेसा
मोबाईल तंत्रज्ञानाच्या  वापरातून ग्रामीण तसेच  दुर्गम भागातील नागरिकांना जलद, सुलभ व सुरक्षित पद्धतीने पैसे हस्तांतर करण्याची "एम-पेसा‘ ही आधुनिक सेवा काही मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी देशात सुरु केली आहे .
महाराष्ट्रात "व्होडाफोन'ची  "एम-पेसा' योजना सुरू झाली आहे . मोबाइलच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने पैशांचे हस्तांतरण करू शकणारी एम-पेसा ही वैशिष्ट्यपूर्ण सेवा व्होडाफोनच्या वतीने येथे सादर करण्यात आली. या योजनेसाठी व्होडाफोन इंडियाने आयसीआयसीआय बँकेशी सहकार्य करार केला आहे.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाबरोबरोबर भागीदारीमध्ये रिलायन्स उद्योग, एअरटेल एम कॉमर्स सर्व्हिसेस, आदित्य बिर्ला नुवो, वोडाफोन एम पेसा, टेक महिंद्रा आणि पोस्ट विभागाला रिझर्व बॅंकेने बॅंकिंग व्यवहार सुरू करण्यास तत्त्वतः परवानगी दिली आहे.
फायदे आणि उपयोग 
 बॅंकेच्या सहकार्याने सुरू करण्यात असलेल्या या सेवेमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठविणे , मोबाईल रिचार्ज खरेदी करणे, डीटीएच सेवेचे रिचार्ज,  अशा निरनिराळ्या मोबाईल पेमेंट सुविधेचा लाभ घेता येतो .
"एम-पेसा‘ ही सेवा बॅंकिंग सेवा नसलेल्या व बॅंकिंग सेवा अपुऱ्या असलेल्या लोकसंख्येला मोबाईल फोनमार्फत वित्तीय सेवा उपलब्ध करून देते.
रोजगारासाठी घरातील कमावती व्यक्ती बाहेरगावी राहत असताना, आपल्या कुटुंबीयांना घरी पैसे पाठवण्यासाठी ही सेवा अतिशय उत्तम ठरणारी आहे. आर्थिक सर्वसमावेशकता हा देशातील प्राधान्यक्रमाचा विषय आहे आणि तो साध्य करण्यासाठी "एम-पेसा‘ हे आदर्श साधन आहे.
आपण कोणत्याही मोबाइल फोनवर पैसे पाठवू शकता. आपण कोणत्याही बँक खात्यात पैसे पाठवू शकता. मोबाईल रिचार्ज, बिले भरा आणि डीटीएच सेवा सदस्यता अदा करू शकता. आपण एकाच स्टोअरमध्ये खरेदी निवडू शकता.एम-पेसा एक अद्वितीय पैसे हस्तांतरण आणि पेमेंट सेवा आहे.
3 विविध बाजार पेठ आणि ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय  आल्याने नामांकित ब्रँडस् एका क्लिकसरशी ग्राहकांना घरपोच मिळू लागला आहेतऑनलाइन म्हणजेच इंटरनेट शॉपिंग करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो. घरबसल्या खरेदी असल्यामुळे बाजारातली गर्दी, वेळ आणि इंधनाची बचत होते
मोबाईल कॉमर्स
ऑनलाईन खरेदीने मोठा वेग घेतला आहे.  यामध्ये मोबाईल ऍपचा मोठय़ा प्रमाणावर वापर वाढला आहे. त्यामुळे ये मोबाईल कॉमर्स ई-कॉमर्स क्षेत्राला मागे टाकेल असे दिसतेय मोबाईल ऍप डाऊनलोड करणार्यांच्या संखेत दिवसेंदिवस  वाढ होत आहे.
ई-कॉमर्स कंपन्या आपल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी मोबाइल ऍप्लिकेशन्सवर जास्त लक्ष केंद्रीत करीत आहेत. मोबाइल कॉमर्स बाजारावर  पकड मजबूत करण्यासाठी फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, स्नॅपडील आणि क्वीकर यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्या देशातील लहान ‘स्टार्ट अप्स’ची खरेदी करताना  दिसत आहेत. तसेच  मोबाइल तंत्रज्ञानावरही मोठी गुंतवणूक केली जात आहे. कारण  येणाऱया काळात मोबाइल शॉपिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग बनणार आहे. कारण सर्वात जास्त ऑर्डर मोबाइलद्वारे येत आहेत.
मोबाईल फोनवर इंटरनेट वापरणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत  आहे. मोबाईल फोनच्या किमतीमध्ये सतत घसरण होत आहे. तसेच इंटरनेट वापरण्यासाठी अतिशय कमी पैसे मोजावे लागत असल्याने मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येतही  मोठी वाढ झालेली आहे आणि या पुढेही  होणार  आहे.
या पुढे  व्हर्चुअल रियालीटी या तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन शॉपिंगची वस्तू वास्तवात कशी असेल हे अनुभवता येणार आहे

४  पूर्वी लग्नासाठी मुलगी अथवा मुलगा शेधाण्याकरिता अनेक अडचणी यायच्या परंतु आजच्या काळात  मॅट्रिमॉनिअल (ऑनलाईन) किंवा ऑर्कुट् / फेसबुकवर फ्रेन्ड्स रिक्वेस्ट टाकून लग्नासाठी जोडीदार शोधतांना अनेक मुले-मुली आढळतात   तंत्रज्ञानामुळे आता सध्या आणि या पुढे विडीयो कॉन्फेरेंस द्वारे मुला-मुलींना प्रत्यक्षात भेटल्याचा अनुभव मिळणार आहे . 

५ सोशल नेटवर्कमुळे  सर्वाना एकमेकांच्या संपर्कात राहणं शक्य 
कॉलेज ग्रुप एकत्र नसेल तरी कोण काय करतंय ते कळण्यासाठी फेसबुक, व्व्हॉट्सअ‍ॅप सारखी साधनं आहे . सोशल मीडियाचा फायदा घेण्यात तरुणाई सर्वात पुढे आहे या सोशल नेटवर्कमुळे  सर्वाना एकमेकांच्या संपर्कात राहणं शक्य असत मात्र त्याचा  गैरवापर  होतांना दिसते . सोशल मीडिया हा आपल्या विचारांना बिनधास्तपणे अभिव्यक्त करण्याचे व्यासपीठ आहे. या मीडियाचा उपयोग एकात्मता आणि बंधुभाव वाढविण्यासाठी व्हायला हवा. 
जाहिरात करणं, महत्त्वाची माहिती किंवा बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो.
संपूर्ण जगभरातल्या महत्त्वाच्या माहिती, घडामोडी हे सगळं अगदी कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं, त्यामुळे माहिती बातम्या पोहोचवण्यासाठी  याचा जास्तीत जास्त वापर होतो .
विशेष म्हणजे एका कॉलसाठी जितके पैसे खर्च करावे लागतात, त्यापेक्षा अगदी कमी पैशात एकमेकांशी जोडल्याचा आनंद यामुळे मिळतो


लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:

Post a Comment