नोकरीच्या ऑनलाईन फसव्या ऑफर्सपासून सावध रहा !
जगातील आणि भारतातील विख्यात सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगसमूहात विविध पदे तातडीने भरायची आहेत. त्यासाठी ऑनलाइन पाहणीतून तुम्ही शॉर्टलिस्ट झाला आहात. तुमची मुलाखत हैद्राबाद येथे होणार असून, त्यासाठी येण्या-जाण्याचे विमानभाडे कंपनी तुम्हाला देणार आहे. यासाठी अनामत रक्कम म्हणून १०००० रुपये विशिष्ट बँकखात्यात तातडीने भरा....'...अशा आशयाचे 'ई मेल' आल्यास हुरळून जाऊ नका,जास्त आनंदी होवू नका कारण सावधान! तुमची फसवणूक होत आहे.आजकाल बऱ्याच तरुणांना बरेच असे ईमेल येत असतात . कोणत्याही कंपनीत अर्ज न करताच बड्या समूहाच्या नावाने बनावट 'ई मेल' पाठविण्यात येत आहे. यामध्ये या समूहासह त्यातील विविध कंपन्यांच्या माहितीचा; तसेच त्यामध्ये भरण्यात येणाऱ्या पदांच्या माहितीचा समावेश असतो. या पदांमध्ये इंजिनीअर, दंतवैद्यकीय; तसेच वैद्यकीय अधिकारी, पायलट, फॅशन डिझायनर, मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह आदी पदांचा समावेश आहे.त्या मेलमध्ये परदेशातली मोठया पगाराची नामांकितकंपनीची नोकरी राहाण्या-खाण्याची सोय. ईमेलसोबत ऑफर लेटरही येतं. आमच्या कंपनीतर्फे वार्षिक ऑनलाइन पाहणीतून तुमच्या अर्जाची निवड झाली आहे. तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, विशिष्ट प्रकल्पांसाठी तुम्ही केलेले काम या आधारे तुमची थेट मुलाखतीसाठी निवड झाली आहे. कंपनीच्या रिक्रूटमेंट मॅनेजरने कंपनीच्या निवड समितीला तुमच्या नावाची शिफारस केली आहे. तुम्हाला महिन्याला सुमारे 50 हजार रुपयांपासून पुढे वेतन दिले जाईल,' अशा माहितीचा या 'ई-मेल'मध्ये समावेश असतो.
मात्र, मुलाखतीसाठी १०००० रुपये मात्र अनामत रक्कम फक्त राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत कंपनीच्या अकाउंट्स मॅनेजरच्या खात्यात भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 'बोगस उमेदवार टाळण्यासाठी कंपनीच्या धोरणानुसार हे पैसे घेण्यात येतील; तसेच मुलाखत झाल्यानंतर बँकेत पैसे भरल्याचे चलन दाखविल्यानंतर उमेदवारांना हे पैसे परत देण्यात येतील. उमेदवाराची नोकरीसाठी निवड न झाल्यासही हे पैसे परत मिळतील
तरुणांना नोकर्या देण्याचं आमिष दाखवून लुबाडणार्या भामट्यांनी नवीन कल्पना शोधून काढली आहे . बेकायदेशीर कॉल सेंटरच ते सुरू करतात. त्यात काही तरुण मुले- मुली नोकरीला ठेवतात. नोकरीला ठेवलेल्या त्या सर्वांच एकच काम, फोन करायचे, इमेल्स पाठवायच्या आणि बेरोजगार तरुणांना फसवायच लावायचं. असं काम करणार्या भामटयांच्या अनेक टोळया आहे हे धक्कादायक वास्तव अलिकडेच सायबर पोलिसांच्या समोर आलंय.
परदेशी नोकर्यांचं आमिष दाखवलं जायचं ,त्यात राहाण्या-खाण्याची सोय, परदेशातल्या प्रवासाचा खर्च कंपनीच करेल! असे सांगितले जायचे .तसेच भारतात असलेल्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीचं आमीष हे भामटे दाखवत आहेत . त्यासाठी हे भामटे दिल्लीच्या विविध भागात भाडयाचे ऑफिस खोलतात . तिथे काही तरुण मुले- मुली नोकरीला ठेवतात त्यांना मोबाईल फोन, कॉॅम्प्युटर दिले जातात.ते सोशल मेडिया तसेच नोकर्या देणार्या अनेक वेबसाईटवरुन माहिती शोधतात. तिथून देशभरातल्या बेरोजगार तरुणांचे मोबाईल नंबर, ईमेल अँड्रेस त्यांना मिळतात.
आणि मग ते या मुलांना फसविण्याचे प्रकार करतात .
सराईतपणे लेटरहेडवर ऑफरलेटरवर पाठवतात. संबंधीत कंपनीची ओळख सांगणारं लेटरहेड असतं. कंपनीचा लोगो असतो. खाली कंपनीच्या मोठया अधिकार्याची खरी वाटेल अशी सही असते. त्यामुळे हुशार लोकांचाही त्यावर विश्वास बसतो. ते ईमेलवर संपर्क साधतात. त्यानंतर मेडीकल टेस्ट करावी लागेल, मुलाखतीसाठी डीपोसिट भरावे लागेल ,तुमचा पासपोर्ट काढून घ्यावा लागेल अशी काहीही कारणं सांगून पैसे उकळायला सुरूवात करतात. . पैसे भरण्यासाठी बँक खात्याचे तपशील दिले जातात. पैसे भरल्यावरच पुढली प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगून पाच ते दहा हजार रूपयांपर्यंतची रक्कम उकळली जाते आणि मग संपर्क तोडून टाकतात. ईमेल येणं बंद होतं. फोन नंबर बंद होतात. तेव्हा कुठं संबंधीत तरूणाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतं.दोघांमधला संवाद ईमेल किंवा फोनवर झालेला असतो त्यामुळे त्या भामट्या टोळीला फसवणूक झाल्यानंतर शोधून काढणे अशक्य असते
लाखोंना तरुणांना थोडया थोडया पैशांना फसवण्याचा फंडा तेजीत आहे. आज जर थोडे फार रूपये गेले तरी कोणाला फारसा फरक पडत नाही. पोलीस ठाण्यातल्या चकरा मारण्यापेक्षा या फसवणुकीकडे पुढल्या वेळी जरा सांभाळून असं म्हणत दुर्लक्ष केलं जातं. याच वृत्तीचा फायदा भामटे उचलतायत आणि लाखोंना फसवून करोडो रुपये कमावतात
देशातील तसेच परदेशातील अत्यंत प्रतिष्ठित व नामांकित कंपन्यांच्या नावे फसवणूक
प्रतिष्ठित व नामांकित कंपन्यांच्या नावाने फसव्या 'ई-मेल' येत आहे. यासाठी नोकर्या देणार्या अनेक वेबसाईटवरुन माहिती शोधतात. तिथून देशभरातल्या बेरोजगार तरुणांचे मोबाईल नंबर, ईमेल अँड्रेस त्यांना मिळतात. सोशल नेटवर्किंग साइटवरील माहितीचा वापर होत असल्याची शक्यता आहे. बड्या कंपनीतर्फे स्वतःहून 'ई मेल' आल्याने हुरळून जाऊन अनेक उमेदवार फसवणुकीला बळी पडत आहेत.
विदेशात नोकरीला जातंना घ्यायची खबरदारी
१) विदेशात नोकरी ऑफर देणारा ई-मेल आल्यावर लगेच वाचूनच सावध व्हा. कुठलीही कंपनी अगदी प्लेसमेण्ट एजन्सीच्या माध्यमातून मुलाखतीचे विविध टप्पे पूर्ण न करता लगेच ऑफर लेटर पाठवत नाही. आपल शिक्षण ,कौशल्य आणि दांडगा अनुभव नसतांनाही आपणहून ही कंपनी नोकरी देणारे ई-मेल पाठवते याचा अर्थ हा आपल्या भोवती भामट्यांनी टाकलेला हा सापळा आहे, हे लक्षात घ्यायला हवं
२) कोणतीही कंपनी अर्ज केल्याशिवाय मुलाखतीसाठी स्वतःहून निवड करत नाही.
३) आपल्या स्मार्टफोनवर नोकरीची ऑफर देणारा कॉल आल्यास तो कॉल ट्र कॉलरवरून तो कुठून आला याचा शोध घेता येतो. फोनकर्त्याला कंपनीचा पोस्टल अँड्रेस विचारावा. जर विदेशातील पत्ता मिळाला तर टपालाने पत्र पाठवून खातरजमा करता येते; तसेच त्या देशात कुणी आपल्या ओळखीचं असेल तर त्याच्याकडे कंपनीची चौकशी करता येऊ शकते. कंपनी आणि ऑफर लेटरविषयी खात्री पटली तरच पुढचं पाऊल टाकायला हरकत नाही
४) कोणत्याही परिस्थितीत केवळ ई-मेलवर विसंबून बँक खात्यात रक्कम भरायची नाही, कुठलीही कंपनी मुलाखतीला येण्यासाठी डीपोसिट किंवा दुसर्या कुठल्याही कारणासाठी पैशांची मागणी करत नाही .
५ ) नोकरभरती करणारी एजन्सी प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागात नोंदणी केलेली आहे का, याबाबत खात्री करून घ्यावी. त्याची खातरजमा करायची असल्यास ते या विभागाच्या poeonline.gov.inया वेबसाइटवर पाहता येतं. त्यात सर्व एजन्सींची नावं, नोंदणी क्रमांक आणि संपर्क असा तपशील आहे. तुम्हाला नोकरीचा वायदा करणार्या कंपनीचं नाव जर या साइटवर सापडलं तरच त्यांच्याशी पुढचे बोलणे करा .
विदेशात नोकरी देणाऱ्या एजण्टची खालील माहिती तपासून पहा!
१) विदेशातील भारतीय नोकरदारांच्या संरक्षणासाठी इमिग्रेशन अँक्ट, १९८३ ची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागाचं विदेशातील नोकरभरतीवर नियंत्रण असतं.
२) भारतीय नागरिकांची विदेशात नोकरभरती करणार्या एजन्सीला प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागात रिक्रूटमेण्ट एजंट म्हणून नोंदणी लागते . त्यासाठी नोंदणी शुल्क म्हणून २५ हजार आणि वीस लाख रुपयांची बँक गॅरंटीही द्यावी लागते. त्यानंतरच इमिग्रेशन अँक्ट अन्वये ती एजन्सी कोणत्याही भारतीय नागरिकाची विदेशात नोकरभरती करू शकते. विदेशात नोकरी करणार्या इच्छुक भारतीयांनी याच नोंदणीकृत एजन्सीमार्फत विदेशात नोकरी मिळवणे आवश्यक असते.
३) नोंदणीकृत एजंटला प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागाकडे १५ कलमांचं तपशील असलेलं सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. त्यात उमेदवाराला ज्या नोकरीसाठी विदेशात नेलं जाईल त्याच ठिकाणी नोकरी देण्यापासूनच्या अनेक बाबी बंधनकारक असतात. त्यामुळे अशा एजन्सीमार्फत नोकरी मिळवणार्याला आवश्यक ते संरक्षण मिळतं. नियम तोडणार्या आणि गुन्हे करणार्या एजंटला दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूदही इमिग्रेशन अँक्टमध्ये असल्याने नोंदणीकृत एजन्सीकडून उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी असते.
गुगलवर माहिती चेक करा .
‘‘ऑनलाईन जॉब ऑफर आल्यास तरूणांनी सतर्क राहायला हवं. हा ईमेल फसवा नाही ना याची शहानिशा करायला हवी. त्यासाठी ज्या कंपनीकडून किंवा संस्थेकडून ईमेल किंवा फोन आला त्या संस्थेची माहितीगुगलवर चेक करा . खातरजमा केल्याशिवाय अशा ईमेल, फोन कॉलना प्रत्युत्तर करू नये, पैसे तर अजिबात भरु नये.
जगातील आणि भारतातील विख्यात सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगसमूहात विविध पदे तातडीने भरायची आहेत. त्यासाठी ऑनलाइन पाहणीतून तुम्ही शॉर्टलिस्ट झाला आहात. तुमची मुलाखत हैद्राबाद येथे होणार असून, त्यासाठी येण्या-जाण्याचे विमानभाडे कंपनी तुम्हाला देणार आहे. यासाठी अनामत रक्कम म्हणून १०००० रुपये विशिष्ट बँकखात्यात तातडीने भरा....'...अशा आशयाचे 'ई मेल' आल्यास हुरळून जाऊ नका,जास्त आनंदी होवू नका कारण सावधान! तुमची फसवणूक होत आहे.आजकाल बऱ्याच तरुणांना बरेच असे ईमेल येत असतात . कोणत्याही कंपनीत अर्ज न करताच बड्या समूहाच्या नावाने बनावट 'ई मेल' पाठविण्यात येत आहे. यामध्ये या समूहासह त्यातील विविध कंपन्यांच्या माहितीचा; तसेच त्यामध्ये भरण्यात येणाऱ्या पदांच्या माहितीचा समावेश असतो. या पदांमध्ये इंजिनीअर, दंतवैद्यकीय; तसेच वैद्यकीय अधिकारी, पायलट, फॅशन डिझायनर, मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह आदी पदांचा समावेश आहे.त्या मेलमध्ये परदेशातली मोठया पगाराची नामांकितकंपनीची नोकरी राहाण्या-खाण्याची सोय. ईमेलसोबत ऑफर लेटरही येतं. आमच्या कंपनीतर्फे वार्षिक ऑनलाइन पाहणीतून तुमच्या अर्जाची निवड झाली आहे. तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, विशिष्ट प्रकल्पांसाठी तुम्ही केलेले काम या आधारे तुमची थेट मुलाखतीसाठी निवड झाली आहे. कंपनीच्या रिक्रूटमेंट मॅनेजरने कंपनीच्या निवड समितीला तुमच्या नावाची शिफारस केली आहे. तुम्हाला महिन्याला सुमारे 50 हजार रुपयांपासून पुढे वेतन दिले जाईल,' अशा माहितीचा या 'ई-मेल'मध्ये समावेश असतो.
मात्र, मुलाखतीसाठी १०००० रुपये मात्र अनामत रक्कम फक्त राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत कंपनीच्या अकाउंट्स मॅनेजरच्या खात्यात भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 'बोगस उमेदवार टाळण्यासाठी कंपनीच्या धोरणानुसार हे पैसे घेण्यात येतील; तसेच मुलाखत झाल्यानंतर बँकेत पैसे भरल्याचे चलन दाखविल्यानंतर उमेदवारांना हे पैसे परत देण्यात येतील. उमेदवाराची नोकरीसाठी निवड न झाल्यासही हे पैसे परत मिळतील
तरुणांना नोकर्या देण्याचं आमिष दाखवून लुबाडणार्या भामट्यांनी नवीन कल्पना शोधून काढली आहे . बेकायदेशीर कॉल सेंटरच ते सुरू करतात. त्यात काही तरुण मुले- मुली नोकरीला ठेवतात. नोकरीला ठेवलेल्या त्या सर्वांच एकच काम, फोन करायचे, इमेल्स पाठवायच्या आणि बेरोजगार तरुणांना फसवायच लावायचं. असं काम करणार्या भामटयांच्या अनेक टोळया आहे हे धक्कादायक वास्तव अलिकडेच सायबर पोलिसांच्या समोर आलंय.
परदेशी नोकर्यांचं आमिष दाखवलं जायचं ,त्यात राहाण्या-खाण्याची सोय, परदेशातल्या प्रवासाचा खर्च कंपनीच करेल! असे सांगितले जायचे .तसेच भारतात असलेल्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीचं आमीष हे भामटे दाखवत आहेत . त्यासाठी हे भामटे दिल्लीच्या विविध भागात भाडयाचे ऑफिस खोलतात . तिथे काही तरुण मुले- मुली नोकरीला ठेवतात त्यांना मोबाईल फोन, कॉॅम्प्युटर दिले जातात.ते सोशल मेडिया तसेच नोकर्या देणार्या अनेक वेबसाईटवरुन माहिती शोधतात. तिथून देशभरातल्या बेरोजगार तरुणांचे मोबाईल नंबर, ईमेल अँड्रेस त्यांना मिळतात.
आणि मग ते या मुलांना फसविण्याचे प्रकार करतात .
सराईतपणे लेटरहेडवर ऑफरलेटरवर पाठवतात. संबंधीत कंपनीची ओळख सांगणारं लेटरहेड असतं. कंपनीचा लोगो असतो. खाली कंपनीच्या मोठया अधिकार्याची खरी वाटेल अशी सही असते. त्यामुळे हुशार लोकांचाही त्यावर विश्वास बसतो. ते ईमेलवर संपर्क साधतात. त्यानंतर मेडीकल टेस्ट करावी लागेल, मुलाखतीसाठी डीपोसिट भरावे लागेल ,तुमचा पासपोर्ट काढून घ्यावा लागेल अशी काहीही कारणं सांगून पैसे उकळायला सुरूवात करतात. . पैसे भरण्यासाठी बँक खात्याचे तपशील दिले जातात. पैसे भरल्यावरच पुढली प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगून पाच ते दहा हजार रूपयांपर्यंतची रक्कम उकळली जाते आणि मग संपर्क तोडून टाकतात. ईमेल येणं बंद होतं. फोन नंबर बंद होतात. तेव्हा कुठं संबंधीत तरूणाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतं.दोघांमधला संवाद ईमेल किंवा फोनवर झालेला असतो त्यामुळे त्या भामट्या टोळीला फसवणूक झाल्यानंतर शोधून काढणे अशक्य असते
लाखोंना तरुणांना थोडया थोडया पैशांना फसवण्याचा फंडा तेजीत आहे. आज जर थोडे फार रूपये गेले तरी कोणाला फारसा फरक पडत नाही. पोलीस ठाण्यातल्या चकरा मारण्यापेक्षा या फसवणुकीकडे पुढल्या वेळी जरा सांभाळून असं म्हणत दुर्लक्ष केलं जातं. याच वृत्तीचा फायदा भामटे उचलतायत आणि लाखोंना फसवून करोडो रुपये कमावतात
देशातील तसेच परदेशातील अत्यंत प्रतिष्ठित व नामांकित कंपन्यांच्या नावे फसवणूक
प्रतिष्ठित व नामांकित कंपन्यांच्या नावाने फसव्या 'ई-मेल' येत आहे. यासाठी नोकर्या देणार्या अनेक वेबसाईटवरुन माहिती शोधतात. तिथून देशभरातल्या बेरोजगार तरुणांचे मोबाईल नंबर, ईमेल अँड्रेस त्यांना मिळतात. सोशल नेटवर्किंग साइटवरील माहितीचा वापर होत असल्याची शक्यता आहे. बड्या कंपनीतर्फे स्वतःहून 'ई मेल' आल्याने हुरळून जाऊन अनेक उमेदवार फसवणुकीला बळी पडत आहेत.
विदेशात नोकरीला जातंना घ्यायची खबरदारी
१) विदेशात नोकरी ऑफर देणारा ई-मेल आल्यावर लगेच वाचूनच सावध व्हा. कुठलीही कंपनी अगदी प्लेसमेण्ट एजन्सीच्या माध्यमातून मुलाखतीचे विविध टप्पे पूर्ण न करता लगेच ऑफर लेटर पाठवत नाही. आपल शिक्षण ,कौशल्य आणि दांडगा अनुभव नसतांनाही आपणहून ही कंपनी नोकरी देणारे ई-मेल पाठवते याचा अर्थ हा आपल्या भोवती भामट्यांनी टाकलेला हा सापळा आहे, हे लक्षात घ्यायला हवं
२) कोणतीही कंपनी अर्ज केल्याशिवाय मुलाखतीसाठी स्वतःहून निवड करत नाही.
३) आपल्या स्मार्टफोनवर नोकरीची ऑफर देणारा कॉल आल्यास तो कॉल ट्र कॉलरवरून तो कुठून आला याचा शोध घेता येतो. फोनकर्त्याला कंपनीचा पोस्टल अँड्रेस विचारावा. जर विदेशातील पत्ता मिळाला तर टपालाने पत्र पाठवून खातरजमा करता येते; तसेच त्या देशात कुणी आपल्या ओळखीचं असेल तर त्याच्याकडे कंपनीची चौकशी करता येऊ शकते. कंपनी आणि ऑफर लेटरविषयी खात्री पटली तरच पुढचं पाऊल टाकायला हरकत नाही
४) कोणत्याही परिस्थितीत केवळ ई-मेलवर विसंबून बँक खात्यात रक्कम भरायची नाही, कुठलीही कंपनी मुलाखतीला येण्यासाठी डीपोसिट किंवा दुसर्या कुठल्याही कारणासाठी पैशांची मागणी करत नाही .
५ ) नोकरभरती करणारी एजन्सी प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागात नोंदणी केलेली आहे का, याबाबत खात्री करून घ्यावी. त्याची खातरजमा करायची असल्यास ते या विभागाच्या poeonline.gov.inया वेबसाइटवर पाहता येतं. त्यात सर्व एजन्सींची नावं, नोंदणी क्रमांक आणि संपर्क असा तपशील आहे. तुम्हाला नोकरीचा वायदा करणार्या कंपनीचं नाव जर या साइटवर सापडलं तरच त्यांच्याशी पुढचे बोलणे करा .
विदेशात नोकरी देणाऱ्या एजण्टची खालील माहिती तपासून पहा!
१) विदेशातील भारतीय नोकरदारांच्या संरक्षणासाठी इमिग्रेशन अँक्ट, १९८३ ची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागाचं विदेशातील नोकरभरतीवर नियंत्रण असतं.
२) भारतीय नागरिकांची विदेशात नोकरभरती करणार्या एजन्सीला प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागात रिक्रूटमेण्ट एजंट म्हणून नोंदणी लागते . त्यासाठी नोंदणी शुल्क म्हणून २५ हजार आणि वीस लाख रुपयांची बँक गॅरंटीही द्यावी लागते. त्यानंतरच इमिग्रेशन अँक्ट अन्वये ती एजन्सी कोणत्याही भारतीय नागरिकाची विदेशात नोकरभरती करू शकते. विदेशात नोकरी करणार्या इच्छुक भारतीयांनी याच नोंदणीकृत एजन्सीमार्फत विदेशात नोकरी मिळवणे आवश्यक असते.
३) नोंदणीकृत एजंटला प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन विभागाकडे १५ कलमांचं तपशील असलेलं सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. त्यात उमेदवाराला ज्या नोकरीसाठी विदेशात नेलं जाईल त्याच ठिकाणी नोकरी देण्यापासूनच्या अनेक बाबी बंधनकारक असतात. त्यामुळे अशा एजन्सीमार्फत नोकरी मिळवणार्याला आवश्यक ते संरक्षण मिळतं. नियम तोडणार्या आणि गुन्हे करणार्या एजंटला दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूदही इमिग्रेशन अँक्टमध्ये असल्याने नोंदणीकृत एजन्सीकडून उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी असते.
गुगलवर माहिती चेक करा .
‘‘ऑनलाईन जॉब ऑफर आल्यास तरूणांनी सतर्क राहायला हवं. हा ईमेल फसवा नाही ना याची शहानिशा करायला हवी. त्यासाठी ज्या कंपनीकडून किंवा संस्थेकडून ईमेल किंवा फोन आला त्या संस्थेची माहितीगुगलवर चेक करा . खातरजमा केल्याशिवाय अशा ईमेल, फोन कॉलना प्रत्युत्तर करू नये, पैसे तर अजिबात भरु नये.
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
Mobile: 9423077963
No comments:
Post a Comment