Tuesday, 3 October 2017

इंटरनेट वापरकरत्यांनो सावधान !... सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे .

इंटरनेट वापरकरत्यांनो सावधान !... सायबर गुन्ह्यांचे प्रमाण   वाढले  आहे .सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेल्या जगातील अव्वल पाच देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.  नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
भारतात व्हायरसच्या सॉफ्टवेअरमधून डेटा चोरी किंवा पैशांसाठी धमकी देण्याचे  आणि व्यक्तीची माहिती चोरणे व फिशिंगचे प्रकार वाढल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सायबर गुन्ह्यांना बळी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.  सायबर गुन्हेगार नवनवीन क्‍लृप्त्यांचा वापर करून अधिकाधिक पैशांची लूट करीत असल्याचे सर्वेक्षणात आढळले. सध्या भारतीयांचे इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाच्या कामांसाठी 66 टक्के भारतीय मोबाईल वापरतात. त्यामुळे सायबर हल्ल्यांचा धोका अधिकाधिक वाढत आहे. काही महिन्यांमध्ये बऱ्याच इंटरनेट मोबाईल युजर्सना सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागले.
भारतीय इंटरनेटचा वापर कशासाठी करतात? 
सोशल नेटवर्किंग साईट्‌स- 63 टक्के
ऑनलाईन शॉपिंग- 42 टक्के
बॅंक अकाऊंट- 44 टक्के
पासवर्ड शेअर करणारे- 15 टक्के
लॉग आऊट न करणारे- 20 टक्के
अनोळखी लोकांशी कनेक्‍ट होणारे- 19 टक्के


इंटरनेटचा वापर ही भारतासारख्या देशात आजही ख-या अर्थाने शहरीभागात अधिक केला जातो. हे माध्यम देशातील छोट्या आणि ग्रामीण भागात तितकेच खोलवर पोहचले आहे. मात्र त्याच्या वापरासंदर्भातील एक भयानक वास्तव आकडेवारीतून समोर आले आहे. हॅकिंग करणे आणि समाजात तेढ निर्माण करणारी माहिती प्रसिद्ध करणे असे प्रकार मोठ्या शहरांपेक्षा लहान शहरे आणि ग्रामीण भागातून अधिक होत असल्याचे समोर आले आहे.

देशात झालेल्या एकूण हॅकिंगच्या घटनांपैकी ५५ टक्के हॅकिंग हे छोट्या शहरातून आणि ग्रामीण भागातून झाले आहे. तसेच समाज तेढ निर्माण करणारी माहिती प्रसिद्ध करण्यासंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण ग्रामीण भागात ६० टक्के इतके असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

 आर्थिक फायदा हा  हेतू सायबर गुन्ह्यांमागे आहे. हॅकिंगच्या सर्वाधिक घटना कर्नाटक राज्यात झाल्या आहेत. तर त्यानंतर आंध्र प्रदेशचा  क्रामांक लागतो.


हॅकिंगच्या गुन्ह्यांमध्ये कर्नाटक आंध्र प्रदेशनंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा क्रमांक लागतो. तर तर बदनामी अथवा अश्लील गोष्टी वेबसाइट अथवा सोशल मिडियावर टाकण्यामध्ये आंध्र प्रदेश, केरळ नंतर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि आसाम या राज्यांचा क्रमांक लागतो.

सायबर गुन्ह्यांमुळे चिंता

अलिकडेच मोठमोठ्या शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून खातेदारांच्या खात्यावरून परस्पर पैसे काढण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये  हे प्रमाण चिंताजनक आहे़ मोठमोठ्या ठिकाणी होत असलेल्या गुन्ह्यांचा प्रसार गावांमध्येही होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


 दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. मोबाईलवरून खोटे नाव सांगणे, बँकेच्या अधिकाऱ्याचे नाव सांगून एटीएमचा नंबर मिळवणे, त्याद्वारे परस्पर पैसे काढले जातात. काही  महिन्यात अशा प्रकारच्या घटना सलग घडल्याने  चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे ग्राहकांकडून वेळोवेळी पालन होत नाही. तसेच पोलिसांकडूनही सावधगिरीचे उपाय सुचवण्यात येतात़ त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. .

सोशल मिडियाचा  सायबर गुन्हेगारीसाठी वापर 
संगणकाचा वापर करून प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा अगदी जवळच्या आणि सातासमुद्र पार असणाऱ्या आपल्या मित्राशी,  मैत्रिणीशी,  नातेवाईकांशी, सहकाऱ्यांशी  सामाजिक माध्यमांच्या मदतीने बोलता येते

फेसबुक, ट्वीटर, ऑर्कुट अथवा स्वतःचा ब्लॉग या सामाजिक माध्यमांचा वापर करून आज जगातील करोडो लोक एकमेकांच्या संपर्कात आहेत. अत्याधुनिक  तंत्राज्ञानाच्या सहायाने भ्रमणध्वनीद्वारे (मोबाईल) देखील सामाजिक माध्यमांच्या मदतीने आपण समाजाच्या संपर्कात राहू शकतो.

नाण्याला जशा दोन बाजू असतात तसे या माध्यमांचे तोटे देखील आहेत. माणूस-माणसापासून तोडला जाणे (प्रत्यक्ष भेटी पेक्षा या माध्यमातून संपर्कात राहणे), फेसबुक अथवा ऑर्कुट वरील आपल्या प्रोफेलचा गैरवापर किंव्हा हेक होणे (विशेषतः मुलींचे) यांसारखे धोके पत्करण्याची तयारी या माध्यमांचा वापर करताना आपल्याला ठेवावी लागते. आधुनिक युगाच्या बरोबरीने जायचे असेल तर सामाजिक मध्यामंचा वापर करावाच लागेल, परंतु आपल्या वैयक्तिक गोष्टी समाजासमोर किती मांडायचा याचा देखील विचार करणे आवश्यक आहे.


इंटरनेट वापरतांना महत्वाच्या सूचना 
सायबर कॅफेमधून किंवा ऑफिसमध्ये असताना इंटरनेटवर आपली वैयक्तिक माहिती, पत्ता, फोन नंबर देऊ नका, चॅट विंडोवर अशी माहिती टाकू नका, पासवर्ड बदलत रहा, तुमच्या किंवा तुमच्या नवऱ्याचा/ बायकोचा /मुलाचा/टोपणनावाचा पासवर्ड ठेवू नका, सर्व अकाऊंट्ससाठी एकच पासवर्ड ठेवू नका.

.काही सायबर गुन्ह्यांचे प्रकार 
केडिट कार्ड-डेबिट कार्डचा पासवर्ड हॅक करून पैसे लुटणे, बक्षिसांच्या बनावट मेल्स पाठवून लुबाडणे अशा आथिर्क गुन्ह्यांपासून सोशल नेटवकिर्ंग साइटच्या माध्यमातून बनावट अश्लील प्रोफाइल्स तयार करणे, अश्लील एमएमएस पाठवणे अशा अनेक गुन्ह्यांचा सुळसुळाट  झाला आहे.
 क्रेडिट कार्ड विषयक माहिती काढून घेणं, अनेक बँकांतील पैसे स्वत:च्या खात्यात वळवून घेणं. काहीवेळा चोरलेल्या माहितीचा ब्लॅकमेल करण्यासाठीही हॅकर्स गैरवापर करतात
एखाद्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळवणे, त्या माहितीच्या आधारे त्याचा ऑनलाईन बॅंकिंगचा पासवर्ड हॅक करून त्याच्या अकाऊंटमधून पैसे लुबाडणे, सरकारी/ खाजगी संकेतस्थळावर सायबर हल्ला करून महत्त्वाचा डेटा मिळवणे आणि त्या माहितीचा उपयोग देशविघातक कृत्ये करण्यासाठी करणे.
क्रेडिट कार्ड, अश्लिल संदेश, हॅकिंग आणि लॉटरी गैरप्रकार या गुन्ह्यांचासुद्धा समावेश आहे.

ई-मेल, एसएमएस याव्दारे फसवणूक

You have won 5500000 dollars,Amir   wants to have a dinner with you, make charity. Lottery अशा प्रकारचे मेल किंवा एसएमएस आपल्याला वारंवार येतात. हा नायजेरियन सायबर फ्रॉड समजला जातो. यामध्ये संबंधितास लॉटरी किंवा मोठे बक्षिस मिळाल्याचे कळवून त्यापोटी प्रोसेसिंग फी किंवा नवीन अकाऊंट उघडण्यासाठी ५० हजार ते २ लाखापर्यंतची रक्कम संबंधिताकडून उकळली जाते. एवढय़ावर न थांबता संबंधिताच्या नेट बँकींग खात्यातून रक्कम काढणे किंवा मोठय़ाप्रमाणात खरेदीचे प्रकार घडले आहेत

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment