मोबाइल अॅप्सची न्यारी दुनिया !
देशात मोठया प्रमाणात अॅप्लिकेशन डेव्हलपर्सची आवश्यकता आहे
भारत देशात स्मार्टफोन वापरकर्त्यांची लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे देश जगातील चौथी सर्वात मोठी मोबाइल अॅप इकॉनॉमी बनलेला आहे.
आयएएमएआयच्या अनुसार २०२०च्या शेवटापर्यंत देशात मोठया प्रमाणात अॅप्लिकेशन डेव्हलपर्सची आवश्यकता असेल. यामुळे भारतीय युवकांसाठी मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट हे एक चांगले रोजगाराचे माध्यम बनू शकते
देशात स्मार्टफोन वापरकर्त्यांचा वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाइल अॅप्लिकेशनचा उपयोग वाढलेला आहे अगदी ऑनलाइन शॉपिंगपासून ते ऑनलाइन पेमेंट, रिचार्ज करणे, गेम खेळण्यापर्यंत मोबाइल अॅप्लिकेशनचा उपयोग होत आहे. ह्या कारणामुळे काही वर्षांत मोबाइल अँप च्या बाजारात वेगाने वाढ झाली आहे. यामुळेच मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत आहेत.
.
जगभरात
स्मार्टफोन वापरणार्यांची संख्या वाढल्यामुळे अॅपची बाजारपेठ वाढू
लागली आहे. जगभरातील अनेक नामांकित कंपन्या वेगवेगळे अॅप्लीकेशन्स तयार
करतात. प्रत्येक क्षेत्रात मोबाइल अॅप्लीकेशन्सची मागणी वाढलेली आहे .
कॅशलेस साठी अनेक बँकांनी त्यांचे बँकिंग अॅप ग्राहकांना उपलब्ध करून दिलेले आहे, मुळेच देशात मोबाईल कॉमर्स आनि मोबाईल बँकिंग
यांचा
वापर झपाट्याने वाढलेला आहे. ई-कॉमर्स कंपन्या आपल्या व्यवसायाला चालना
देण्यासाठी मोबाइल ऍप्लिकेशन्सवर जास्त लक्ष केंद्रीत करीत आहेत. मोबाइल
कॉमर्स बाजारावर पकड मजबूत करण्यासाठी फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, स्नॅपडील आणि
क्वीकर यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्या देशातील लहान ‘स्टार्ट अप्स’ची खरेदी
करताना दिसत आहेत. तसेच मोबाइल तंत्रज्ञानावरही मोठी गुंतवणूक केली जात
आहे. कारण येणाऱया काळात मोबाइल शॉपिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग बनणार
आहे. कारण सर्वात जास्त ऑर्डर मोबाइलद्वारे येत आहेत.
मोबाईल
फोनवर इंटरनेट वापरणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईल फोनच्या
किमतीमध्ये सतत घसरण होत आहे. तसेच इंटरनेट वापरण्यासाठी अतिशय कमी पैसे
मोजावे लागत असल्याने मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येतही मोठी वाढ झालेली
आहे आणि या पुढेही होणार आहे.
भारतीय
स्टेट बँकेने एसबीआय बडी हे मोबाइल वॉलेट अॅप लाँच केले आहे. एसबीआयचे
मोबाइल वॉलेट फक्त एसबीआयच्या ग्राहकांसाठी नसून इतर सर्व बँकेच्या
ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. स्टेट बँकेने हे वॉलेट फक्त अँड्रॉईड
यूजर्ससाठी ठेवले आहे. अॅक्सेंचर आणि मास्टर कार्ड यांच्या सहकार्याने,
‘बडी मोबाइल वॉलेट’ तयार केले आहे. हे अॅप १३ भाषांत उपलब्ध असून कोणतेही
कार्ड वापरणाऱ्या ग्राहकाला कोणत्याही बँकेशी व्यवहार करण्यासाठी ते वापरता
येईल.तसेच ऑक्सिजन वॉलेट, पेटीएम, सायट्रस पे, पेयुमनी, चिल्लर,
फ्रीचार्ज, मोबीक्विक, एमपेसा ही व इतर अॅप्स म्हणजे मोबाइल वॉलेट.
रिक्षा
व टॅक्सी भाडे, हॉटेलची बिले इ. भरण्याचे काम मोबाइलमधून होत आहे. क्रेडिट
कार्डचे धोके वाढलेले आहेत, त्यामुळे अनेक ग्राहक आज मोबाइल वॉलेट्सकडे
वळलेले आहेत. वापरकर्त्यांना विविध ऑफर्सही मिळत आहेत. शिवाय अनेक खाजगी
उद्योगसमूह ,सरकारी विभाग यांनी सुद्धा त्याच्या कामकाजात वेग आण्यासाठी
सुधारणा करण्यासाठी मोबाइल अॅप्स लाँच केले आहे.
अॅप्समुळे
स्मार्ट फोन वापरणार्यांच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. त्यांना या
अॅप्सद्वारे अनेक अत्याधुनिक सुविधा क्षणार्धात मिळू लागल्या आहेत.
काही
दूरसंचार व इतर कंपन्यांनीही अशी अॅप्स आणली आहेत. त्याच्या मदतीनं
मोबाइलच्या माध्यमातून बिल भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे.
नुकतेच
देशात कॅशलेस अर्थव्यवसंस्थेच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असे नवे पाऊल
केंद्र सरकारने उचलले आहे , ते म्हणजे आता चक्क आधार कार्डच्या सहाय्याने
बँक व्यवहार करता येतील. आधार कार्डशी संलग्न बँक खात्यातून हे व्यवहार
होऊ शकतील.नुकतेच कॅशलेस सुविधा सुलभ करण्यासाठी आईडीएफसी बँक आणि नॅशनल
पमेंट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तरित्या आधार अॅप
विकसीत केले आहे.
मोबाईल,
डिजिटल असिस्टंटस्,टॅब्लेट, स्मार्ट वॉचेस, यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स
डिव्हायसेस करता बनविलेल्या सॉफ्टवेअरला अॅप्स म्हणतात .
विविध
अॅप्सची गरज सगळ्यांनाच जाणवतेय.सर्व क्षेत्रात मोबाईल अॅप्सची संख्या
वाढू लागली आहे. त्यामुळे अॅप डेव्हलपमेंट या क्षेत्रात रोजागाराच्या अनेक
संधी उपलब्ध होत आहेत . आयओएस आणि इतर अँड्रॉइड बेस्ड डिव्हायसेससाठी
विविध अॅपस बनवण्याचं काम मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपर करतो
अॅप्लीकेशन मेकर्सची मागणी खूप वाढली आहे. त्यांना मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपर्स म्हणून नियुक्ती दिली जाते.
अॅन्ड्रॉइड
प्लॅट्फॉर्मवर काम करणाऱ्या देशात भारत हा या क्षेत्रातील प्रमुख मानला
जातो. ब्लॅकबेरी व आयओएस यांचा प्रसार इथे त्या तुलनेत कमी आहे
मनुष्यबळाची
अल्प उपलब्धता व इंडस्ट्रीच्या कायम ‘ अप टू डेट स्टेट्स ‘ मुळे भविष्यात
अॅप्लीकेशन डेव्हलपर्सला चांगलीच मागणी राहणार आहे. देशात मोठया प्रमाणात अॅप्लिकेशन डेव्हलपर्सची आवश्यकता आहे
भारत देशात स्मार्टफोन वापरकर्त्यांची लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे देश जगातील चौथी सर्वात मोठी मोबाइल अॅप इकॉनॉमी बनलेला आहे.
आयएएमएआयच्या अनुसार २०२०च्या शेवटापर्यंत देशात मोठया प्रमाणात अॅप्लिकेशन डेव्हलपर्सची आवश्यकता असेल. यामुळे भारतीय युवकांसाठी मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट हे एक चांगले रोजगाराचे माध्यम बनू शकते
देशात स्मार्टफोन वापरकर्त्यांचा वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाइल अॅप्लिकेशनचा उपयोग वाढलेला आहे अगदी ऑनलाइन शॉपिंगपासून ते ऑनलाइन पेमेंट, रिचार्ज करणे, गेम खेळण्यापर्यंत मोबाइल अॅप्लिकेशनचा उपयोग होत आहे. ह्या कारणामुळे काही वर्षांत मोबाइल अँप च्या बाजारात वेगाने वाढ झाली आहे. यामुळेच मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत आहेत.
.
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment