लग्न पत्रिकेसाठी तसेच शुभेच्छांसाठी व्हॉटस्अॅपचा सर्वाधिक वापर केल्यास कागदाचा अपव्यय होणार नाही
लग्न ठरले की, लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी निमंत्रण पत्रिका लागतात.
निमंत्रण पत्रिकामध्ये वैविध्यता, नावीन्यपूर्णता आणि बजेटप्रमाणे निमंत्रण
पत्रिकेची छपाई करतात.आणि या पत्रिका वाटपात वधू-वर पक्षाची धावपळ होते.
पण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियातील नवनवीन माध्यमांमुळे ही
लग्नपत्रिका इतिहासजमा होत आहेत.
इंटरनेटने मोबाईल आणि संगणक
सोशल मीडियाला जोडल्या गेल्याने आॅनलाईन लग्नपत्रिकांना सर्वाधिक पसंती
मिळत आहे. त्यामुळे छापील लग्नपत्रिकांची मागणी कमालीची मंदावली आहे.
त्यातच व्हॉट्स अॅप, फेसबूक आदी माध्यमांतून स्वस्तात व काही क्षणात
लग्नपत्रिका कुणालाही पाठविता येते. लांबवर राहणाऱ्या मित्रांना , नातलग
यांना पत्रिका देण्याकरिता तर खूपच हाल होतात हे टाळण्यासाठी नागरिकांनी
बैठक घेवून जवळील नातेवाईकांना ,मित्रांना इमेल , मोबाइल, फेसबुक,
एसएमएस'च्या हायटेक पद्धतीने लग्न आमंत्रण देण्याकरिता प्रोत्साहन
देण्याचा ठराव करून लग्न पत्रिकेला हद्दपार करण्याचा प्रयत्न करावा .
लग्न पत्रिकेसाठी तसेच शुभेच्छांसाठी व्हॉटस्अॅपचा सर्वाधिक वापर
केल्यास कागदाचा अपव्यय होणार नाही
ह्या
विधायक उपक्रमात सहभागी होऊन अनेकांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण
देण्याकरिता लग्नपत्रिका छापल्या नव्हत्या ,फक्त जवळच्या भावकीसाठी
१००-२०० पत्रिका छापल्या होत्या . आणि इतरांना व्हॉटस्अॅप,तसेच एस एम एस व
मोबाईल वरून निमंत्रण देवून वेळ आणि कागद वाचविला होता
सोशल मीडियामुळे वाढदिवस तसेच सणांची शुभेच्छापत्रेहि झाली नामशेष
पूर्वी
सणानिमित्त तसेच आप्तस्वकीय, मित्र-मैत्रिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
ह्या विविध नावीन्यपूर्ण शुभेच्छापत्रांनी दिल्या जायच्या त्यसाठी
शुभेच्छापत्रांच्या दुकानात ग्राहकांची कमालीची गर्दी असायची आणि विविधांगी
शुभेच्छापत्रांची खरेदी करून ती आप्तस्वकीय, मित्र-मैत्रिणींना पाठविण्यात
येत होती. आता मोबाईलच्या वापरामुळे, आगमनामुळे शुभेच्छापत्रांचीहि क्रेझ
कमी होताना दिसत आहे. .शहरातीत नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी
शुभेच्छांसाठी व्हॉटस्अॅपचा ,इमेल , फेसबुक .... सोशल मीडिया या हायटेक
पध्दतीचा वापर करण्याचे ठरविलेले आहे.
कारण सोशल
मीडियाद्वारे सहज व तात्काळ संदेश पाठविता येतात. त्यामुळे सर्वांचीच सोशल
मीडियातील माध्यमांना पसंती मिळत आहे. आहे. इंटरनेट पॅक मारून जास्त जणांना
दिवाळीच्या तसेच इतर सणांच्या शुभेच्छा देता येतात.
इंटरनेट पॅक मारल्यानंतर एसएमएसचे दर लागत नसल्याने नाममात्र दरात अनेकांना शुभेच्छा देता येतात .
पूर्वी
पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या जायच्या. काही दिवसांपूर्वीपासून पत्रे
लिहिली जायची. आता सोशल मीडियाचाच अधिक वापर होतो . यामुळे कागदाचा अपव्यय
होत नाही
ह्या उपक्रमाचे महत्वाचे फायदे
-दरवर्षी उपक्रम राबवून वेळ ,पैसा आणि कागद वाचविला जातो
- सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देवून कागदाचा वापर करत नाही
-मोबाईल संदेश आणि सोशल मेडिया ----मोबाईल संदेश,व्हाट्साप फेसबुक यांचा वापर स्वस्त पडतो
--कागदाची बचत होवून वृक्ष संवर्धन होते (वृक्ष तोड होत नाही )
----लांबचा प्रवास टाळला जातो आणि वेळ आणि प्रवास खर्च वाचतो तसेच उन्हाळ्यात प्रवासाची दगदग टाळता येते
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
No comments:
Post a Comment