नवरात्रोत्सव :इव्हेंट नको, सण हवा.....
आदी शक्तीची मनोभावे तिची प्रार्थना करून स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याकरिता जनजागृती करु या नवरात्रोत्सव हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.
पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो.
नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.
नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.
दुर्गादेवीचे नऊ अवतार मानले जातात. 1) शैलपुत्री, सामाजिक अधोगती2) ब्रह्मचारिणी, 3) चंद्रघटा, 4) कुष्मांडा, 5) स्कंदमाता, 6) कात्यायनी, 7) कालरात्री, 8) महागौरी, 9) सिद्धीदात्री. या नऊ अवतारांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हणतात. या नवदुर्गेची अनेक कुटुंबांत पूजा केली जाते.
नवरात्रोत्सव या धार्मिक परंपरेचे स्वरूप आता बदलले आहे..
आजकाल नवरात्रोत्सवात सर्वीकडे गरबा खेळाला जातो आणि काही दांडिया मंडळे हे या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्रींना बोलावतात आणि
फिल्मी गाण्यांवर कानठळ्या बसणा-या डीजेच्या तालावर ‘आयला रे आयला हात्तीच्या मायला’,‘बिजली’, ‘शीला’ आणि आता ‘हलकट जवानी’ तसेच ‘वाट माझी बघतोय् रिक्षावाला,’ आणि ‘मुन्नी’,अशा गाण्यावर धुंद होऊन मध्यरात्रीपर्यंत गरबा खेळला जातो. हा गरबा ऊर्जेचा, उत्साहाचा आणि नवचैतन्याचा प्रतीक असला तरीही काही वेळा दांडियासाठी येणाऱ्या महिला आणि मुलींची छेड काढल्या जाण्याच्या घटना घडतात म्हणूनच शांततेतच आणि नियमांच्या बंधनातच हा महोत्सव साजरा करण्यात यावा
सध्या भारतीयांनी पाश्चिमात्यांच्या चंगळवादी राहणीमानाचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानल्याचे महाविद्यालयात साज-या केल्या जाणा-या ‘डेज’वरून दिसते. शिक्षण संपल्यावर डेज्ची जागा सण घेतात. आणि बरेचसे नेते मंडळी आणि राजकीय कार्यकर्ते स्वत:ची प्रसिद्धीची हाव भागवण्यास सण इव्हेंटच्या पद्धतीने साजरे करण्यास प्रोत्साहन देतात. यामध्ये सुरक्षा यंत्रणांवर पडणारा ताण, व्यापा-यांचे खिसे भरणे, ध्वनिप्रदूषणात वाढ, पर्यावरणाचा -हास आदी तोटे अनुभवायला मिळत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी दांडियाच्या मंडळाने पुढाकार घेऊन धर्माचार्य व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक सणाचे महत्त्व सांगणारा व साजरा करण्याची धर्मशास्त्रीय पद्धत शिकवणारा कार्यक्रम बनवून तो जनतेपर्यंत पोचवावा. तसेच काही सामाजिक कार्यक्रमही या निमित्ताने राबवावे .
-नागरिकांमध्ये सुसंवाद निर्माण होण्यासाठी या सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा उद्देश असावा . ही जाणीव सर्व नवरात्रोत्सव मंडळांनी सदैव ठेवावी आणि सर्वांचा हा आवडता सण हा सणच राहावा. तो इव्हेंट बनू नये, हीच अपेक्षा आहे.
-आज आपण आपला प्रत्येक सण सेलिब्रिट करतो. नवरात्रौला दांडियामार्फत उघडा धांगडधिंगा घातला जातो. प्रत्येक सण भावना विरहित, संवेदनशून्य व केवळ बाजारू स्वरूपातच ‘सेलिब्रिट’ होतात. गटारी अमावस्या व थर्टीफस्टच हे खरेखुरे आपले राष्ट्रीय सण होऊन बसले आहेत. सामाजिक अधोगती म्हणतात ती हीच तर नव्हे? हे चित्र बदलले पाहिजे
नवरात्रोत्सवात काय करावे
दांडियाच्या कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले स्वयंसेवक तैनात ठेवावेत, कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अथवा विघातक शक्तीला संधी मिळेल, असे कुठलेही कृत्य करू नये, याची काळजी घेतली पाहिजे . दांडियासाठी येणाऱ्या महिला आणि मुलींची छेड काढली जाणार नाही. यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे. दांडियाच्या ठिकाणी बाहेरच्या बाजूने मंडळातर्फे पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात यावा
जनतेसाठी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांसह समाजप्रबोधनाचे किंवा स्वावलंबनासह बौद्धिक व आर्थिक प्रगती साधण्यासाठीची उत्तमोत्तम विद्वान वक्त्यांची व्याख्याने आयोजित करून सुखमयरित्या जीवन जगण्याचे मार्गदर्शन त्यांना द्यायला हवे
-नवरात्रोत्सवात स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याकरिता जनजागृती करावी
मुली या मुलांपेक्षा चांगल्या असतात. त्यांना आई-वडिलांचा खूप लळा असतो. मुलांपेक्षा मुलीच त्यांची जास्त काळजी वाहतात. त्या लक्ष्मी असतात, अशाप्रकारचा बडेजाव मिरविणारा आपला समाज स्त्रीभ्रूणहत्येच्या संकटात सापडलेला आहे. अगदी पूर्वीपासून! पूर्वी मुलगी जन्मली की लगेच तिचा गळा दाबून तिला मारले जायचे. मग गर्भपाताचे फॅड आले व कुटुंबनियोजनाच्या निमित्ताखाली गर्भजलचिकित्सा करून गर्भावस्थेतच त्यांना नष्ट करण्यात येऊ लागले. सध्या जेनेटिक्स या नव्या विज्ञानशाखेतील संशोधक नाविन्याच्या आविष्काराच्या नावाखाली मातेच्या उदरात गर्भनिर्माण होत असताना एक्स-एक्स या स्त्री-जेनुकाचे एक्स-वाय या पुरुषी जेनुकात रुपांतर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारे विज्ञान प्रगत होत आहे. पण आपली मानसिकता मात्र बदललेली नाही.
आपल्या लाडक्या लेकींना तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवायला हवे. परक्याचं धन मानूनही त्यांच्या आरोग्याकडे नि शिक्षणाच्या प्रगतीकडे डोळ्यात तेल घालून जपायला हवे. पोर शिकली, स्वतःच्या पायावर उभी राहिली की तिच्यातला स्वाभिमान जागृत होत जातो. मग तिचा छळ करण्याची कुणाची बिशाद होणार नाही
मुली असतात प्रत्येक आईबापांच्या काळजाचा तुकडा! ज्यांना मुली नसतात, अशा आईबापांचे दुःख `जावे त्यांच्या वंशा’ तेव्हाच कळते.
झाशीची राणी लक्ष्मीबाई,सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून किरण बेदी, मीरा बोरवणकर, सानिया मिर्झा आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. तसेच पोलिस, लष्करी दल याबरोबरच रिक्षा, ट्रक चालविणे, पेट्रोल पंपावर काम करणे, पत्रकारिता ही कामे महिला करु लागल्या आहेत
आजच्या परिस्थितीचा विचार केला तर स्त्रियांचे कर्तृत्व मोठे असल्याचे दिसत आहे. असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही, ज्याचे स्त्रियांनी नेतृत्व स्वीकारलेले नाही. अगदी दहावी-बारावीच्या परीक्षांमध्येही मुलीच आघाडीवर आहेत. असे असताना मुली नको म्हणणारे आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत, याची जाणीव त्यांना आलेलीच नाही. समाज रुढीला चिकटून, समाजाला घाबरून मुलाच्या प्रतीक्षेत स्त्री भ्रूण हत्या करणार्या पालकांना सामाजिक संस्थांनी, कार्यकर्त्यांनी बळ देण्याची आवश्यकता आहे. गरीब घरातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अशा संस्थांनी घेतल्यास या प्रकाराला बर्याच प्रमाणात आळा बसेल
लेखक : प्रा योगेश अशोकराव हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)
पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो.
नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.
नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.
दुर्गादेवीचे नऊ अवतार मानले जातात. 1) शैलपुत्री, सामाजिक अधोगती2) ब्रह्मचारिणी, 3) चंद्रघटा, 4) कुष्मांडा, 5) स्कंदमाता, 6) कात्यायनी, 7) कालरात्री, 8) महागौरी, 9) सिद्धीदात्री. या नऊ अवतारांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हणतात. या नवदुर्गेची अनेक कुटुंबांत पूजा केली जाते.
नवरात्रोत्सव या धार्मिक परंपरेचे स्वरूप आता बदलले आहे..
आजकाल नवरात्रोत्सवात सर्वीकडे गरबा खेळाला जातो आणि काही दांडिया मंडळे हे या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्रींना बोलावतात आणि
फिल्मी गाण्यांवर कानठळ्या बसणा-या डीजेच्या तालावर ‘आयला रे आयला हात्तीच्या मायला’,‘बिजली’, ‘शीला’ आणि आता ‘हलकट जवानी’ तसेच ‘वाट माझी बघतोय् रिक्षावाला,’ आणि ‘मुन्नी’,अशा गाण्यावर धुंद होऊन मध्यरात्रीपर्यंत गरबा खेळला जातो. हा गरबा ऊर्जेचा, उत्साहाचा आणि नवचैतन्याचा प्रतीक असला तरीही काही वेळा दांडियासाठी येणाऱ्या महिला आणि मुलींची छेड काढल्या जाण्याच्या घटना घडतात म्हणूनच शांततेतच आणि नियमांच्या बंधनातच हा महोत्सव साजरा करण्यात यावा
सध्या भारतीयांनी पाश्चिमात्यांच्या चंगळवादी राहणीमानाचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानल्याचे महाविद्यालयात साज-या केल्या जाणा-या ‘डेज’वरून दिसते. शिक्षण संपल्यावर डेज्ची जागा सण घेतात. आणि बरेचसे नेते मंडळी आणि राजकीय कार्यकर्ते स्वत:ची प्रसिद्धीची हाव भागवण्यास सण इव्हेंटच्या पद्धतीने साजरे करण्यास प्रोत्साहन देतात. यामध्ये सुरक्षा यंत्रणांवर पडणारा ताण, व्यापा-यांचे खिसे भरणे, ध्वनिप्रदूषणात वाढ, पर्यावरणाचा -हास आदी तोटे अनुभवायला मिळत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी दांडियाच्या मंडळाने पुढाकार घेऊन धर्माचार्य व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक सणाचे महत्त्व सांगणारा व साजरा करण्याची धर्मशास्त्रीय पद्धत शिकवणारा कार्यक्रम बनवून तो जनतेपर्यंत पोचवावा. तसेच काही सामाजिक कार्यक्रमही या निमित्ताने राबवावे .
-नागरिकांमध्ये सुसंवाद निर्माण होण्यासाठी या सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा उद्देश असावा . ही जाणीव सर्व नवरात्रोत्सव मंडळांनी सदैव ठेवावी आणि सर्वांचा हा आवडता सण हा सणच राहावा. तो इव्हेंट बनू नये, हीच अपेक्षा आहे.
-आज आपण आपला प्रत्येक सण सेलिब्रिट करतो. नवरात्रौला दांडियामार्फत उघडा धांगडधिंगा घातला जातो. प्रत्येक सण भावना विरहित, संवेदनशून्य व केवळ बाजारू स्वरूपातच ‘सेलिब्रिट’ होतात. गटारी अमावस्या व थर्टीफस्टच हे खरेखुरे आपले राष्ट्रीय सण होऊन बसले आहेत. सामाजिक अधोगती म्हणतात ती हीच तर नव्हे? हे चित्र बदलले पाहिजे
नवरात्रोत्सवात काय करावे
दांडियाच्या कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले स्वयंसेवक तैनात ठेवावेत, कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अथवा विघातक शक्तीला संधी मिळेल, असे कुठलेही कृत्य करू नये, याची काळजी घेतली पाहिजे . दांडियासाठी येणाऱ्या महिला आणि मुलींची छेड काढली जाणार नाही. यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे. दांडियाच्या ठिकाणी बाहेरच्या बाजूने मंडळातर्फे पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात यावा
जनतेसाठी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांसह समाजप्रबोधनाचे किंवा स्वावलंबनासह बौद्धिक व आर्थिक प्रगती साधण्यासाठीची उत्तमोत्तम विद्वान वक्त्यांची व्याख्याने आयोजित करून सुखमयरित्या जीवन जगण्याचे मार्गदर्शन त्यांना द्यायला हवे
-नवरात्रोत्सवात स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याकरिता जनजागृती करावी
मुली या मुलांपेक्षा चांगल्या असतात. त्यांना आई-वडिलांचा खूप लळा असतो. मुलांपेक्षा मुलीच त्यांची जास्त काळजी वाहतात. त्या लक्ष्मी असतात, अशाप्रकारचा बडेजाव मिरविणारा आपला समाज स्त्रीभ्रूणहत्येच्या संकटात सापडलेला आहे. अगदी पूर्वीपासून! पूर्वी मुलगी जन्मली की लगेच तिचा गळा दाबून तिला मारले जायचे. मग गर्भपाताचे फॅड आले व कुटुंबनियोजनाच्या निमित्ताखाली गर्भजलचिकित्सा करून गर्भावस्थेतच त्यांना नष्ट करण्यात येऊ लागले. सध्या जेनेटिक्स या नव्या विज्ञानशाखेतील संशोधक नाविन्याच्या आविष्काराच्या नावाखाली मातेच्या उदरात गर्भनिर्माण होत असताना एक्स-एक्स या स्त्री-जेनुकाचे एक्स-वाय या पुरुषी जेनुकात रुपांतर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारे विज्ञान प्रगत होत आहे. पण आपली मानसिकता मात्र बदललेली नाही.
आपल्या लाडक्या लेकींना तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवायला हवे. परक्याचं धन मानूनही त्यांच्या आरोग्याकडे नि शिक्षणाच्या प्रगतीकडे डोळ्यात तेल घालून जपायला हवे. पोर शिकली, स्वतःच्या पायावर उभी राहिली की तिच्यातला स्वाभिमान जागृत होत जातो. मग तिचा छळ करण्याची कुणाची बिशाद होणार नाही
मुली असतात प्रत्येक आईबापांच्या काळजाचा तुकडा! ज्यांना मुली नसतात, अशा आईबापांचे दुःख `जावे त्यांच्या वंशा’ तेव्हाच कळते.
झाशीची राणी लक्ष्मीबाई,सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून किरण बेदी, मीरा बोरवणकर, सानिया मिर्झा आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. तसेच पोलिस, लष्करी दल याबरोबरच रिक्षा, ट्रक चालविणे, पेट्रोल पंपावर काम करणे, पत्रकारिता ही कामे महिला करु लागल्या आहेत
आजच्या परिस्थितीचा विचार केला तर स्त्रियांचे कर्तृत्व मोठे असल्याचे दिसत आहे. असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही, ज्याचे स्त्रियांनी नेतृत्व स्वीकारलेले नाही. अगदी दहावी-बारावीच्या परीक्षांमध्येही मुलीच आघाडीवर आहेत. असे असताना मुली नको म्हणणारे आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत, याची जाणीव त्यांना आलेलीच नाही. समाज रुढीला चिकटून, समाजाला घाबरून मुलाच्या प्रतीक्षेत स्त्री भ्रूण हत्या करणार्या पालकांना सामाजिक संस्थांनी, कार्यकर्त्यांनी बळ देण्याची आवश्यकता आहे. गरीब घरातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अशा संस्थांनी घेतल्यास या प्रकाराला बर्याच प्रमाणात आळा बसेल
लेखक : प्रा योगेश अशोकराव हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)

No comments:
Post a Comment