इंटरनेटवर खाजगीपणाचा मुलभूत हक्क ठेवा अबाधित हल्लीचे जग हे इंटर्नेट सॅव्ही झालेले आहे आणि बरेचसे महत्वाचे व्यवहार हे इंटरनेट वर होतात म्हणून हे व्यवहार करतांना काळजी घेतली पाहिजे
अलीकडच्या दहशतवादी घटनांमधला आधुनिक तंत्रज्ञानाचा सफाईदार वापर महत्वाचा ठरला आहे. उत्तर अमेरिकेतल्या व्हरमाँटमधल्या ‘व्हॅली न्यूज’मध्ये मॅथ्यू स्कोफील्ड यांनी पॅरिसवरच्या हल्ल्यात झालेल्या तंत्रज्ञानाच्या वापराच्या चांगल्या आणि वाईट बाजूंचा विचार केला आहे. दहशतवाद्यांनी या हल्ल्यात केलेला आॅनलाईन चॅटींग, गेमींग, सोशल मीडिया आणि जीपीएसचा केलेला वापर त्यांची योजना अंमलात आणण्यासाठी महत्वाचा ठरला होता. जी तंत्रे त्यांच्या विरोधात लढताना उपयोगी ठरणारी आहेत ती त्यांना देखील उपलब्ध होत आहेत.
एखादी ऑन लाइन एयर इंडिया किंवा इंडियन रेल्वे ची वेब साइट हॅक झाली .....? सगळ्या क्रेडीट कार्ड्स ची,डेबिट कार्डचे डीटेल्स, वैयक्तिक माहिती इत्त्यादी वर त्या सायबर दहशतवाद्याचा चा ताबा जाइल.
आणि जर कधी बँकिंग क्षेत्रात जर असा हल्ला झाला तर कुठल्याही देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील .
जगभरातील सायबर हल्ल्याचे/वैयक्तिक,खाजगी माहिती चोरीचे काही उदाहरण
१ हॅकर्सनी अमेरिकेच्या सरकारी संगणकातील माहिती चोरली आहे. आताच्या व माजी अशा मिळून ४० लाख सरकारी कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती चोरण्यात आली असून आतापर्यंत अमेरिकी संगणकावर हॅकर्सनी केलेला हा सर्वात मोठा हल्ला होता .
२ एखादा सायबर हल्ला क्षणार्धात ही गुप्तता धोक्यात आणत असल्याच्या घटनाही समोर येत असतात. अमेरिकेतील ऑफिस ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (ओपीएम)वर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये तब्बल ५६ लाख जणांचे फिंगरप्रिन्ट्स चोरीला गेले होते .
३ काही दिवसांपूर्वी भारतात रेल्वेचं तिकीट बुक करण्यासाठी वापरण्यात येणारी इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरशन अर्थात ईकॉमर्स साईट IRCTC ची वेबसाईट हॅक करण्यात आली होती वेबसाईट हॅक करुन 1 कोटी लोकांची वैयक्तिक माहिती चोरीला गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती
त्या वृत्तानुसार भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट आयआरसीटीसी ज्यावरुन दिवसाला लाखो लोक व्यवहार करतात हॅक करण्यात आली होती . या वेबसाईटवर प्रवासी आपली वैयक्तिक माहिती स्टोर करत असतात. ज्यामध्ये पॅनकार्ड चा नंबर कारण तिकीटाचं आरक्षण करायचं असेल तर ऑनलाइन अर्ज भरतेवेळी वैयक्तिक माहिती देणं बंधनकारक असतं. 'चोरी केल्या गेलेल्या माहितीवरुन बोगस कागदपत्रे तयार केली जाऊ शकतात', अशी भीती व्यक्त करण्यात आली होती . या 'वेबसाईटवरील माहिती अत्यंत महत्वाची असते . या माहितीवरून कंपन्यांना हवे असलेले ग्राहक मिळवता येतात त्यामुळे त्यांना हा डाटा विकला जाऊ शकतो' अशी शक्यता व्यक्त होत होती .
सध्या इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ‘ऑनलाइन सुरक्षा’ अतिशय महत्त्वाची आहे . फेसबुकसारख्या सोशल मीडिया साइटच्या माध्यमातून तुमची माहिती विविध जाहिरात कंपन्या किंवा उत्पादन कंपन्यांकडे जमा होते. या माहितीचा गैरवापर होण्याची भीती नाकारता येत नाही इंटरनेटवर वापरकर्त्यांची माहिती चोरली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे इंटरनेटवर आपली माहिती सार्वजनिक होत सुरक्षित ठेवण्याकरिता खबरदारी घेणे आवश्यक आहे.इतरांना कुणाच्याही खाजगी आयुष्यात नाक खुपसण्याचा काहीही अधिकार नाही.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा अन्य देशांबरोबर भारतातील टेलिफोन, इंटरनेट सेवेवरही नजर ठेवत असल्याचे उघड झाले होते . सीआयए या अमेरिकन गुप्तचर यंत्रणेमध्ये तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या तरुणाने "द गार्डियन' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेची ही हेरगिरी जगासमोर उघड केलेली होती . या संस्थेत काम करताना त्याला सरकारकडून नागरिकांवर करण्यात येत असलेल्या हेरगिरीचा सुगावा लागला होता . नागरिकांच्या फोनकॉल्सवर लक्ष ठेवणे, फोेनकॉल्स रेकॉर्ड करणे, ऑनलाइन महिती गोळा करणे असे या हेरगिरीचे स्वरूप होते. अमेरिकी गुप्तहेर यंत्रणांकडून इंटरनेटवरील महिती गोळा करताना देशांतर्गत कायद्याचे उल्लंघन होते आहे. शिवाय अंतर्गत बाबी दुसऱ्या देशाच्या गुप्तहेर यंत्रणेच्या हाती लागणे आपल्यासाठी धोकादायक आहे. तेव्हा काळजी घ्या
इंटरनेटवरील खाजगी माहितीच्या सुरक्षितेसाठी उपाय :
>>ब्राऊजर्सवर ‘अॅडऑन’ किंवा ‘एक्स्टेन्शन’ आपण वापरतो. यातून तुमच्या नकळत तुमची माहिती हाताळली जाते. त्यामुळे अशा ‘अॅडऑन’चा वापर कमी करावा किंवा टाळावाच
>> इंटरनेटवर ब्राऊजिंग करताना तुमची ओळख अदृश्य ठेवण्याकरिता , अनेक ब्राऊजर्सवर सुविधा असते.
- गुगल क्रोममध्ये ‘इनकॉग्निटो’,
- फायरफॉक्समध्ये ‘प्रायव्हेट ब्राऊजिंग मोड’
- मायक्रोसॉफ्टच्या ब्राऊजरवर ‘इनप्रायव्हेट’
अशा सुविधा आहे. हे पर्याय तुमच्या संगणकामध्ये शिरू बघणाऱ्या हेरगिरी करणाऱ्या कूकीजना रोखते. त्याचप्रमाणे या सुविधेमुळे तुमचे ब्राऊजर्स अनोळख्या संकेतस्थळांच्या ‘कूकीज’ना ‘ब्लॉक’ करतात.
>>इंटरनेट वापरानंतर संगणक तसेच स्मार्टफोनवरील ‘कूकीज’, ‘कॅश’, ‘टेम्पररी फाइल्स’ हटवून टाका. कारण काही ‘कूकीज’ तुमच्या माहितीचा माग काढण्याचे काम करतात.
>> इंटरनेटच्या विविध खात्यांचे पासवर्ड सुरक्षित ठेवा .
>>इंटरनेट वापरताना नेट बँकींग अकाऊंट क्रमांक, आपला आयडी क्रमांक, पासवर्ड, क्रेडीट किंवा डेबीट पासवर्ड क्रमांक अथवा उघड करताना सावधानता बाळगावी. ऑन लाईन खरेदी करताना सुरक्षिततेचे उपाय योजावेत. स्पॅम मेल, फसवे मेल यावर डबल क्लिक करुन उघडण्याचा प्रयत्न करु नये. अशा मेल मधून व्हायरसची एक्झीक्युटेबल फाईल आपल्या नकळत डाऊन लोड होते. आपण जेव्हा संगणकावर काम करतो तेव्हा केलेल्या कामाची एक डुप्लीकेट फाईल तयार होऊन ती हार्ड डिक्सवर सेव्ह होते. जेव्हा आपण इंटरनेट चालू करतो तेव्हा अलगदपणे ही माहिती हॅकरला मेल व्दारे प्राप्त होते. .त्यामुळे फसगत टाळण्यासाठी अशा प्रकारचे फसवे मेल डीलीट करावे आपली संगणक सिस्टीम ऍन्टी व्हायरस, फायर वॉलने सुरक्षित ठेवावी.
खबरदारी घ्या
सायबर क्षेत्रात दक्षिण कोरियासारखे छोटे देशही आपल्यापेक्षा प्रगत आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. सायबरमध्ये चीनची भीती अमेरिकेला आहे. म्हणून भारताने अमेरिकेबरोबर सहकार्याची भूमिका घ्यायला हवी. भारतात तयार होणा-या संगणकतज्ज्ञांना काही वर्ष देशात राहून सेवा करायला हवी.
सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून, संगणकाचा वापर होऊन तिसरे महायुद्धही होऊ शकते हे भारताने लक्षात घेतले पाहिजे आणि तातडीने त्यावर उपाय योजना केल्या पाहिजे .
आज भारतासमोरच नाही तर जगासमोर आणि प्रत्येक माणसासमोर ‘सायबर युद्धाचे ’चं भयावह संकट उभं आहे
तिसरं महायुद्ध हे पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवं, असं थोडंच आहे. कारण युद्धाची पद्धत बदलली आहे . महायुद्धे आता कुठही होतात, त्याचं ठिकाण त्याचं ठिकाण व्हर्च्युअल म्हणजे आभासी जग असतं असू शकत आणि हे विश्व आहे, इंटरनेटचं…
अलीकडच्या दहशतवादी घटनांमधला आधुनिक तंत्रज्ञानाचा सफाईदार वापर महत्वाचा ठरला आहे. उत्तर अमेरिकेतल्या व्हरमाँटमधल्या ‘व्हॅली न्यूज’मध्ये मॅथ्यू स्कोफील्ड यांनी पॅरिसवरच्या हल्ल्यात झालेल्या तंत्रज्ञानाच्या वापराच्या चांगल्या आणि वाईट बाजूंचा विचार केला आहे. दहशतवाद्यांनी या हल्ल्यात केलेला आॅनलाईन चॅटींग, गेमींग, सोशल मीडिया आणि जीपीएसचा केलेला वापर त्यांची योजना अंमलात आणण्यासाठी महत्वाचा ठरला होता. जी तंत्रे त्यांच्या विरोधात लढताना उपयोगी ठरणारी आहेत ती त्यांना देखील उपलब्ध होत आहेत.
एखादी ऑन लाइन एयर इंडिया किंवा इंडियन रेल्वे ची वेब साइट हॅक झाली .....? सगळ्या क्रेडीट कार्ड्स ची,डेबिट कार्डचे डीटेल्स, वैयक्तिक माहिती इत्त्यादी वर त्या सायबर दहशतवाद्याचा चा ताबा जाइल.
आणि जर कधी बँकिंग क्षेत्रात जर असा हल्ला झाला तर कुठल्याही देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील .
जगभरातील सायबर हल्ल्याचे/वैयक्तिक,खाजगी माहिती चोरीचे काही उदाहरण
१ हॅकर्सनी अमेरिकेच्या सरकारी संगणकातील माहिती चोरली आहे. आताच्या व माजी अशा मिळून ४० लाख सरकारी कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती चोरण्यात आली असून आतापर्यंत अमेरिकी संगणकावर हॅकर्सनी केलेला हा सर्वात मोठा हल्ला होता .
२ एखादा सायबर हल्ला क्षणार्धात ही गुप्तता धोक्यात आणत असल्याच्या घटनाही समोर येत असतात. अमेरिकेतील ऑफिस ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (ओपीएम)वर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये तब्बल ५६ लाख जणांचे फिंगरप्रिन्ट्स चोरीला गेले होते .
३ काही दिवसांपूर्वी भारतात रेल्वेचं तिकीट बुक करण्यासाठी वापरण्यात येणारी इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरशन अर्थात ईकॉमर्स साईट IRCTC ची वेबसाईट हॅक करण्यात आली होती वेबसाईट हॅक करुन 1 कोटी लोकांची वैयक्तिक माहिती चोरीला गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती
त्या वृत्तानुसार भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट आयआरसीटीसी ज्यावरुन दिवसाला लाखो लोक व्यवहार करतात हॅक करण्यात आली होती . या वेबसाईटवर प्रवासी आपली वैयक्तिक माहिती स्टोर करत असतात. ज्यामध्ये पॅनकार्ड चा नंबर कारण तिकीटाचं आरक्षण करायचं असेल तर ऑनलाइन अर्ज भरतेवेळी वैयक्तिक माहिती देणं बंधनकारक असतं. 'चोरी केल्या गेलेल्या माहितीवरुन बोगस कागदपत्रे तयार केली जाऊ शकतात', अशी भीती व्यक्त करण्यात आली होती . या 'वेबसाईटवरील माहिती अत्यंत महत्वाची असते . या माहितीवरून कंपन्यांना हवे असलेले ग्राहक मिळवता येतात त्यामुळे त्यांना हा डाटा विकला जाऊ शकतो' अशी शक्यता व्यक्त होत होती .
सध्या इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ‘ऑनलाइन सुरक्षा’ अतिशय महत्त्वाची आहे . फेसबुकसारख्या सोशल मीडिया साइटच्या माध्यमातून तुमची माहिती विविध जाहिरात कंपन्या किंवा उत्पादन कंपन्यांकडे जमा होते. या माहितीचा गैरवापर होण्याची भीती नाकारता येत नाही इंटरनेटवर वापरकर्त्यांची माहिती चोरली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे इंटरनेटवर आपली माहिती सार्वजनिक होत सुरक्षित ठेवण्याकरिता खबरदारी घेणे आवश्यक आहे.इतरांना कुणाच्याही खाजगी आयुष्यात नाक खुपसण्याचा काहीही अधिकार नाही.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा अन्य देशांबरोबर भारतातील टेलिफोन, इंटरनेट सेवेवरही नजर ठेवत असल्याचे उघड झाले होते . सीआयए या अमेरिकन गुप्तचर यंत्रणेमध्ये तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या तरुणाने "द गार्डियन' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेची ही हेरगिरी जगासमोर उघड केलेली होती . या संस्थेत काम करताना त्याला सरकारकडून नागरिकांवर करण्यात येत असलेल्या हेरगिरीचा सुगावा लागला होता . नागरिकांच्या फोनकॉल्सवर लक्ष ठेवणे, फोेनकॉल्स रेकॉर्ड करणे, ऑनलाइन महिती गोळा करणे असे या हेरगिरीचे स्वरूप होते. अमेरिकी गुप्तहेर यंत्रणांकडून इंटरनेटवरील महिती गोळा करताना देशांतर्गत कायद्याचे उल्लंघन होते आहे. शिवाय अंतर्गत बाबी दुसऱ्या देशाच्या गुप्तहेर यंत्रणेच्या हाती लागणे आपल्यासाठी धोकादायक आहे. तेव्हा काळजी घ्या
इंटरनेटवरील खाजगी माहितीच्या सुरक्षितेसाठी उपाय :
>>ब्राऊजर्सवर ‘अॅडऑन’ किंवा ‘एक्स्टेन्शन’ आपण वापरतो. यातून तुमच्या नकळत तुमची माहिती हाताळली जाते. त्यामुळे अशा ‘अॅडऑन’चा वापर कमी करावा किंवा टाळावाच
>> इंटरनेटवर ब्राऊजिंग करताना तुमची ओळख अदृश्य ठेवण्याकरिता , अनेक ब्राऊजर्सवर सुविधा असते.
- गुगल क्रोममध्ये ‘इनकॉग्निटो’,
- फायरफॉक्समध्ये ‘प्रायव्हेट ब्राऊजिंग मोड’
- मायक्रोसॉफ्टच्या ब्राऊजरवर ‘इनप्रायव्हेट’
अशा सुविधा आहे. हे पर्याय तुमच्या संगणकामध्ये शिरू बघणाऱ्या हेरगिरी करणाऱ्या कूकीजना रोखते. त्याचप्रमाणे या सुविधेमुळे तुमचे ब्राऊजर्स अनोळख्या संकेतस्थळांच्या ‘कूकीज’ना ‘ब्लॉक’ करतात.
>>इंटरनेट वापरानंतर संगणक तसेच स्मार्टफोनवरील ‘कूकीज’, ‘कॅश’, ‘टेम्पररी फाइल्स’ हटवून टाका. कारण काही ‘कूकीज’ तुमच्या माहितीचा माग काढण्याचे काम करतात.
>> इंटरनेटच्या विविध खात्यांचे पासवर्ड सुरक्षित ठेवा .
>>इंटरनेट वापरताना नेट बँकींग अकाऊंट क्रमांक, आपला आयडी क्रमांक, पासवर्ड, क्रेडीट किंवा डेबीट पासवर्ड क्रमांक अथवा उघड करताना सावधानता बाळगावी. ऑन लाईन खरेदी करताना सुरक्षिततेचे उपाय योजावेत. स्पॅम मेल, फसवे मेल यावर डबल क्लिक करुन उघडण्याचा प्रयत्न करु नये. अशा मेल मधून व्हायरसची एक्झीक्युटेबल फाईल आपल्या नकळत डाऊन लोड होते. आपण जेव्हा संगणकावर काम करतो तेव्हा केलेल्या कामाची एक डुप्लीकेट फाईल तयार होऊन ती हार्ड डिक्सवर सेव्ह होते. जेव्हा आपण इंटरनेट चालू करतो तेव्हा अलगदपणे ही माहिती हॅकरला मेल व्दारे प्राप्त होते. .त्यामुळे फसगत टाळण्यासाठी अशा प्रकारचे फसवे मेल डीलीट करावे आपली संगणक सिस्टीम ऍन्टी व्हायरस, फायर वॉलने सुरक्षित ठेवावी.
खबरदारी घ्या
सायबर क्षेत्रात दक्षिण कोरियासारखे छोटे देशही आपल्यापेक्षा प्रगत आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. सायबरमध्ये चीनची भीती अमेरिकेला आहे. म्हणून भारताने अमेरिकेबरोबर सहकार्याची भूमिका घ्यायला हवी. भारतात तयार होणा-या संगणकतज्ज्ञांना काही वर्ष देशात राहून सेवा करायला हवी.
सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून, संगणकाचा वापर होऊन तिसरे महायुद्धही होऊ शकते हे भारताने लक्षात घेतले पाहिजे आणि तातडीने त्यावर उपाय योजना केल्या पाहिजे .
आज भारतासमोरच नाही तर जगासमोर आणि प्रत्येक माणसासमोर ‘सायबर युद्धाचे ’चं भयावह संकट उभं आहे
तिसरं महायुद्ध हे पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवं, असं थोडंच आहे. कारण युद्धाची पद्धत बदलली आहे . महायुद्धे आता कुठही होतात, त्याचं ठिकाण त्याचं ठिकाण व्हर्च्युअल म्हणजे आभासी जग असतं असू शकत आणि हे विश्व आहे, इंटरनेटचं…
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment