Tuesday, 3 October 2017

सोशल मीडिया फायदे आणि तोटे

सोशल मीडिया फायदे आणि तोटे  
फेसबुक‘ किंवा ‘ट्विटर‘चं व्यसन लागल्याने मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्याची वेळ   आपणावर येवून ठेपलीय असे वाटतेय का ?. कारण ,या सोशल मीडियाच्या वापराचा अतिरेक झालेला आहे .
या सोशल मीडियामुळे  संपूर्ण जग आपल्या हातात आलय . आपल्याला हव्या त्या पद्धतीने व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सोशल मीडियानं आपल्याला दिलं आहे. आपल्या मनातील चांगल्या  भावना सहज दुसऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी आणि त्यात त्यांनाही सहभागी करून घेण्यासाठी हे सोशल मीडियाचं व्यासपीठ खूप चांगलं आहे.. पण  याचा  वापर आपण कसा करतो, यावरच त्याचा उपयोग ठरतो.
सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे हे आपण जाणून घेवू या

सोशल मीडियावर आभासी ओळख
सोशल मीडियावर आभासी ओळख निर्माण कारण हे सोप जात आणि
सोशल मीडियावर ‘फेसलेस’  राहता येत  कारण  खोट्या नावाने  अकाउंट उघडूनआणि  टोपण नावानं टाकलेली पोस्ट पटकन कुणाला कळत नाही. या कारणांमुळे गुन्हेगार  बिनधास्त गुन्हे करतात .

व्ययक्तिक माहितीचा गैरवापर

फेसबुकवर आपण  आपल्याला काय आवडतं, आवडती  सिनेमे ,पुस्तकं , फोन आणि  पत्ता हे सारं  आपण  जगाला उघड करतो  . या माहितीचा गैरवापर करणाऱ्या अनेक टोळ्या  तयार झाल्या आहेत. त्या लहान मुलानां  पळविणे ,खंडणी मागणे असे उद्योग करतात

सोशल मीडियामुले माणुसकी हरवत चाललीय  
हे एक शस्र आहे आणि ते कसं वापरलं जातं, यावर त्याची उपयुक्तता किंवा घातकता ठरते.
 ह्या सोशिअल मेडिया ने आजची पिढी भावना हरउन बसलीय .लोकांना मदत करण्यापूर्वी ह्यांना त्या गोष्टीचे फोटो काढायचे असतात आणि ते share करायचे असतात. बर्याच वेळी असे मेसेजेस येतात  कि एखादी  व्यक्ती जळत  असते जे बघूनच एखाद्याचा थरकाप उडेल पण सोशल मीडिया व्यसनाधीन  लोक
असे हे फोटो "आज घडलेली घटना " या शीर्षकाखाली share करतात. आज लोकांना दुसर्याला मदत करण्यापेक्षा त्या घटनेचे छायाचित्रण करण्यात धन्यता वाटते.


दंगल भडकविणे आणि हिंसाचार घडविण्याचे साधन 

सोशल मीडिया आणि इंटरनेटचा गैरवापर करण्याचे प्रमाण फार वाढले आहे, प्रक्षोभक आणि अश्‍लील स्वरूपाचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होण्यापासून रोखण्यासाठी सरकारने नवा ठोस कायदा तयार करण्यावर भर द्यायला हवा. सोशल मीडियावर फिरणा-या पोस्ट्स पाहून तुमची मतं बनवू नका. सोशल मीडियाचा चांगला वापर करा, नाहीतर चीनसारख्या देशांकडे बघा, तिथं इंटरनेटच्या वापरासाठी कडक नियम आहेत.
सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या  बनावट व्हिडिओमुळे दंगल भडकल्याचे उदाहरणे आहेत .  सोशल मीडियाचा असाच वापर करून हिंसाचार घडवला गेलेला  आहे. हे रोखायचे असेल तर सोशल मीडियाचा गैरवापर थांबवण्याचे मार्ग शोधण्याची आवशकता आहे
जातीय दंगलींसाठी होणाऱ्या सोशल मीडियाच्या गैरवापर तीव्र चिंतादायक आहे . 'सोशल मीडिया हा आपल्या विचारांना बिनधास्तपणे अभिव्यक्त करण्याचे व्यासपीठ आहे. त्याची ही ओळख जपणे गरजेचे आहे. या मीडियाचा उपयोग एकात्मता आणि बंधुभाव वाढविण्यासाठी व्हायला हवा. मात्र, अलीकडे चुकीच्या पद्धतीने याचा वापर केला जात आहे असे दिसते .
खोटी प्रोफाइल
खोटी प्रोफाइल बनवून त्रास देण्याचे प्रकार फेसबुकच्या माध्यमातून घडत असतात . अनेक मुले मुलींना त्रास देण्यासाठी त्यांचे खोटे  प्रोफाइल बनवून अनेकांना  फ्रेंड बनवून अश्‍लील मजकुराची देवाणघेवाण करण्याचे गैरप्रकार करतात .
 सोशल मीडियाचा फायदा घेण्यात तरुणाई सर्वात पुढे असते. सोशल नेटवर्कमुळे या सर्वाना एकमेकांच्या संपर्कात राहणं शक्य होतं. मात्र परंतु आता  हाच सोशल मीडिया आता गुन्ह्यांचं आगर बनत चाललं आह
सोशल मीडियाचा विधायक  वापर करा
तरुणांनी सोशल मीडियाचा वापर नेहमी चांगल्या उद्देशाने, चांगल्या सामाजिक कामासाठी करावा. एखाद्या गोष्टीसाठी समाजामध्ये जागृती आणायची असेल तर तरुणांना याचा चांगला उपयोग होईल. पण त्याचा गैरवापर नक्कीच करू नका.
जाहिरात करणं, महत्त्वाची माहिती किंवा बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो.
संपूर्ण जगभरातल्या महत्त्वाच्या माहिती, घडामोडी हे सगळं अगदी कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं, त्यामुळे माहिती बातम्या पोहोचवण्यासाठी  याचा जास्तीत जास्त वापर होतो .
विशेष म्हणजे एका कॉलसाठी जितके पैसे खर्च करावे लागतात, त्यापेक्षा अगदी कमी पैशात एकमेकांशी जोडल्याचा आनंद यामुळे मिळतो
गैरवापर नक्कीच करू नका
फोटोंचं विडंबन करून टाकणं
कोणाचीही निंदा करणे . असे गैरप्रकार करू नका 
सोशल नेटवर्कमुळे  सर्वाना एकमेकांच्या संपर्कात राहणं शक्य 
कॉलेज ग्रुप एकत्र नसेल तरी कोण काय करतंय ते कळण्यासाठी फेसबुक, व्व्हॉट्सअ‍ॅप सारखी साधनं आहे . सोशल मीडियाचा फायदा घेण्यात तरुणाई सर्वात पुढे आहे या सोशल नेटवर्कमुळे  सर्वाना एकमेकांच्या संपर्कात राहणं शक्य असत मात्र त्याचा  गैरवापर  होतांना दिसते . सोशल मीडिया हा आपल्या विचारांना बिनधास्तपणे अभिव्यक्त करण्याचे व्यासपीठ आहे. या मीडियाचा उपयोग एकात्मता आणि बंधुभाव वाढविण्यासाठी व्हायला हवा. मात्र, अलीकडे चुकीच्या पद्धतीने याचा वापर केला जात आहे . 

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

7 comments: